शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

१८ ग्रापंची निवडणूक तूर्तास रद्द

By admin | Updated: March 29, 2015 00:19 IST

जिल्ह्यात मे ते आॅगस्ट दरम्यान मुदत संपणाऱ्या ५५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ५० पोटनिवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने २४ मार्चला जाहीर केला होता.

अमरावती : जिल्ह्यात मे ते आॅगस्ट दरम्यान मुदत संपणाऱ्या ५५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ५० पोटनिवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने २४ मार्चला जाहीर केला होता. परंतु पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकत नसल्याने आॅगस्ट महिन्यात कालावधी संपणाऱ्या १८ ग्रामपंचायतीच्या निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या आहे. यामुळे जिल्ह्यात ५३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक व ५० ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूक घोषित कार्यक्रमाप्रमाणेच होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मे ते आॅगस्ट दरम्यान मुदत संपणाऱ्या ५५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ५० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने जाहिर केला होता. यासाठी ३० जानेवारीला नोटीस काढण्यात येत होती. परंतु नाशिक येथे कुंभमेळा असल्याने पुरेसे पोलीस दल व अर्ध सैनिक दल उपलब्ध होणार नाहीत तसेच मे व जून महिन्यात उन्हाळी सुट्यामुळे निवडणुकांसाठी पुरेसा अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध होणार नाही. या कारणामुळे आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करू नये, असे आदेश आयोगाने २७ मार्चला बजावले आहेत. हा कार्यक्रम स्वतंत्ररित्या आयोगाकडून यथावकाश जाहिर करण्यात येणार आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात मुदत संपणाऱ्या १८ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सोमवार ३० मार्चला जाहिर होणार नाही. मात्र २४ मार्चला जाहिर केलेल्या ५० पोटनिवडणुकीचा कार्यक्रम मात्र पूर्ववतच राहणार आहे. सुधारित आदेशानुसार जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील १, नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील ७, चांदूररेल्वे तालुक्यामधील १, धामणगाव तालुक्यामधील २, अचलपूर तालुक्यामधील १, धारणी तालुक्यातील १, चिखलदरा तालुक्यामधील ५ अश्या १८ ग्रामपंचायतीच्या निवडणूक पुढे आयोगाच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आले आहे. यामुळे विविध चर्चांना उत आला आहे. (प्रतिनिधी)निवडणूक पुढे ढकललेल्या ग्रामपंचायतीभातकुली तालुक्यामधील बोरखडी (खुर्द), नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील जळू (कंझरा), बेलोरा हिरापूर, वडूरा, फुलआमला, पळसमंडळ, शिरपूर, चांदूररेल्वे तालुक्यामधील येरड, धामणगाव तालुक्यामधील नायगाव, ऊसळगव्हाण, अचलपूर तालुक्यामधील वझ्झर, धारणी तालुक्यामधील चेंडो, चिखलदरा तालुक्यामधील सोमठाणा, काकाझरी, खटकाली, अढाव, माखला या ग्रामपंचायतीच्या निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या आहे.