शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

जिल्ह्यातील नामाप्रच्या १६ जागा होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:16 IST

पुढील महिन्यात होणार ५९ सर्कल मधील आरक्षण सोडत मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुती ओबीसीचे आरक्षण सर्वोच्च ...

पुढील महिन्यात होणार ५९ सर्कल मधील आरक्षण सोडत

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे

स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुती ओबीसीचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या १६ सर्कलमधील नामाप्रच्या जागांवरील आरक्षण रद्द होणार आहे. दरम्यान मार्च २०२२ ला होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या ५९ जागांचे आरक्षण पुढील महिन्यात निघण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र सरकारच्या जिल्हा परिषद कायद्याचा कलम १२ सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केला होता. लोकसंख्यानुसार काही प्रवर्ग आरक्षित केले. आरक्षण ५० टक्क्यांच्यावर नेता येणार नाही, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. ओबीसींना २७ टक्क्यांच्यावर आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे कायदेशीर आरक्षणानुसारच झेडपी निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. ओबीसी समाजाचा रोष पहाता या निर्णयाला ठाकरे सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावत निर्णय कायम ठेवला. राज्य निवडणूक आयोगाने अकोला, धुळे, अकोला, वाशिम, नंदूरबार, नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.

नामाप्रच्या सोळा जागा होणार रद्द

अमरावती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत १४ तालुक्यात ५९ सर्कल आहेत अनुसूचित जातीसाठी ११, तर अनुसूचित जमातीसाठी १२ तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १६ राखीव, तर २० सर्कल खुल्याकरिता असताना सर्वोच न्यायालयाच्या निर्णयानंतर आता नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या १६ जागा रद्द होणार आहेत, तर खुल्या जागेची संख्या ३६ होणार आहे.

पुढील महिन्यात होणार आरक्षण सोडत

अमरावती जिल्हा परिषदेची पाच वर्षांची मुदत २० मार्च २०२२ रोजी संपत आहे. त्यामुळे राखीव जागेकरिता ऑक्टोबरमध्ये आरक्षण काढण्यात येणार आहे. सन २०११ च्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जाती व जमातीच्या एकंदरीत २३ जागांकरिता आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काढण्यात येईल.

दहा पंचायत समिती मधील आरक्षणाला बसणार फटका

आगामी वर्षात चिखलदरा ,चांदुर बाजार, मोर्शी, वरूड, अमरावती, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, भातकुली, नांदगाव खंडेश्वर या तालुके या पंचायत समितीची मुदत १३ मार्च २०२२ ला संपणार आहे. या पंचायत समितीच्या निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणाला फटका बसणार आहे.

जिल्हा परिषद तसेच दहा पंचायत समितीच्या निवडणुकीतील आरक्षण सोडतीसंदर्भात अद्याप राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतेच निर्देश आले नाहीत. प्राप्त निर्देशाप्रमाणे पुढील सोडतीची तारीख ठरविली जाईल.

- नितीन व्यवहारे,

प्रभारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी