शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

१६ भरारी पथके रोखणार बियाण्यांचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:11 IST

अमरावती : आठ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीला वेग आलेला आहे. अद्याप बियाणे बाजारात ...

अमरावती : आठ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीला वेग आलेला आहे. अद्याप बियाणे बाजारात शुकशुकाट असला तरी बियाण्यांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी कृषी विभागाद्वारा १६ भरारी पथकांचे गठन करण्यात आले आहे. याशिवाय ३१ संनियत्रण कक्षदेखील स्थापित करण्यात आलेला आहे.

येत्या २५ तारखेला रोहिणी नक्षत्राला सुरुवात होत आहे व सध्या वातावरण बदलामुळे २२ तारखेपर्यंत जिल्ह्यासह विभागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रोहिनी नक्षत्रात जिल्ह्यात किमान पाच हजार हेक्टरमध्ये मान्सूनपूर्व पेरणी होण्याचा अंदाज आहे. १ जूनपर्यंत बीटी बियाण्यांच्या विक्रीला प्रतिबंध घातल्या गेला आहे. मात्र, पेरणीपूर्व मशागतीला वेग आलेला आहे. जिल्ह्यात कठोर संचारबंदी असलीतरी खरिपाच्या पार्श्वभूमीवर शेतीविषयक कुठल्याच कामांना आडकाठी नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

पेरणीच्या काळात बियाण्यांचा तुटवडा, काळाबाजार होऊ नये याकरिता कृषी विभाग सरसावला आहे. यामध्ये विभाग व जिल्हास्तरावर प्रत्येकी एक व तालुकास्तरावर प्रत्येकी एक अशा १६ भरारी पथकांचे गठन करण्यात आले आहे. याशिवाय विभागस्तर एक, जिल्हास्तर दोन व तालुकास्तरावर प्रत्येकी दोन अशा ३१ संनियत्रण कक्षांची स्थापना केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.

बॉक्स

अशी आहे भरारी पथकाची रचना

* जिल्हास्तरीय भरारी पथकाचे कृषी विकास अधिकारी पथकप्रमुख आहेत. याशिवाय संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी मोहीम अधिकारी (जिप), निरीक्षक वजन-मापे हे सदस्य तर जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक हे पथकाचे सचिव आहेत.

* तालुकास्तरीय पथकाचे तालुका कृषी अधिकारी पथकप्रमुख, कृषी अधिकारी, निरीक्षक वजन-मापे, संबंधित कार्यक्षेत्राचे मंडळ अधिकारी सदस्य, पंचायत समितीचे कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक) पथकाचे सचिव आहेत.

बॉक्स

तक्रारीत नमूद निविष्ठांचे नमुने घेणार

कक्षाला प्राप्त तक्रारींच्या आधारे नमुद प्रत्येक निविष्ठांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. याशिवाय तालुकानिहाय लक्षांक दिलेले आहेत. त्यानुसार नमुने घेणे बंधनकारक आहे. नमुने काढताना हलर्गजीपणा झाल्यास त्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष लाभ विक्रेत्याला होत असल्याने नमुने घेताना काळजी घेण्याचे निर्देश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत.

बॉक्स

तक्रार निवारण समिती

शेतकऱ्याच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीसाठी तक्रार निवारण समितीचे गठन करण्यात आलेले आहे. या समितीत संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी अध्यक्ष, तालुका कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठ किंवा कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, महाबीज प्रतिनिधी हे सदस्य, तर पंचायत समितीचे कृषी अधिकारी हे सचिव आहेत.

पाईंटर

खरीप पिकाचे क्षेत्र : ७.८१ लाख हेक्टर

शेरतकरी संख्या : ४,१५,८१८

सरासरी जमीन धारणा : १.८८ लाख हेक्टर

कपाशीचे क्षेत्र : २,४४,००२ हेक्टर

सोयाबीनचे क्षेत्र : २,६९,६५९ हेक्टर

तुरीचे क्षेत्र : १,०६,१३४ हेक्टर