शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

अवकाळीसह गारपिटीने १५ हजार हेक्टर बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्ह्यात १८ ते २० मार्च या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १४,९९४ हेक्टर ७० आर क्षेत्रामधील ...

अमरावती : जिल्ह्यात १८ ते २० मार्च या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १४,९९४ हेक्टर ७० आर क्षेत्रामधील शेती व फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. एका व्यक्तीसह चार गुरे दगावली. २० घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. यामध्ये सर्वाधिक ११,६८८ हेक्टरवरील संत्र्याच्या मृग बहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याशिवाय २,६२७ हेक्टरवरील उभा गहू झोपला.

जिल्ह्यातील १० तालुक्यांत १८ ते २० मार्च दरम्यान वादळासह अवकाळी पाऊस व गारपिटीने गहू, हरभरा, भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अमरावती तालुक्यातील ११ गावांत ६९ हेक्टरवरील गहू, १३ हेक्टरवरील कांदा, चांदूर रेल्वे तालुक्यात २८ गावांत ३३३ हेक्टरवरील गहू, ६४ हेक्टरवरील कांदा, , धामणगाव तालुक्यातील १३ गावांत ३३६ हेक्टरवरील गहू, २ हेक्टरवरील आंबा, धारणी तालुक्यात ६ गावांत ३५ हेक्टरवरील गहू, २७ हेक्टरवरील हरभरा, चिखलदरा तालुक्यात २ गावांत ८ हेक्टरवरील गहू, १ हेक्टरवरील हरभरा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ४ गावांत ५५ हेक्टरवरील गहू, मोर्शी तालुक्यात ४३ गावांमधील ५३० हेक्टरवरील गहू, १०४ हेक्टरवरील हरभरा, ३ हेक्टरवरील कांदा, २२ हेक्टरवरील भाजीपाला व २२ हेक्टरवरील इतर पिके, तिवसा तालुक्यात २४ गावांत ६५ हेक्टरवरील गहू, १ हेक्टरवरील कांदा, अचलपूर तालुक्यात ४३ गावांमध्ये ५८८ हेक्टरवरील गहू, ३ हेक्टरवरील हरभरा, ९४ हेक्टरवरील कांदा, ५५ हेक्टरवरील केळी तसेच चांदूर बाजार तालुक्यात ४९ गावांत ६०७ हेक्टरवरील गहू, २ हेक्टरवरील हरभरा व ७ हेक्टरवरील केळीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे.

बॉक्स

संत्रा मृग बहराचे नुकसान

चांदूरबाजार तालुक्यात संत्र्याच्या मृग बहराची सर्वाधिक ५,१२७ हेक्टरमध्ये फळगळ झाली. अचलपूर तालुक्यात २९६९ हेक्टर, मोर्शी ३१८०, धामणगाव रेल्वे ३७, चांदूर रेल्वे ३४७ व अमरावती तालुक्यातील २८ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर संत्राबागांचे नुकसान झाले.

बॉक्स

१० तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान

दहा तालुक्यांतील २२३ गावांमध्ये १४,९९४ हेक्टरवरील रबी पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक ६,००० हेक्टर चांदूर बाजार तालुक्यात आहे. मोर्शी ३८६१, अचलपूर ३७०९, चांदूर रेल्वे ७४५, धामणगाव रेल्वे ३७५, अमरावती ११०, तिवसा ६६.१०, धारणी ६३.२०, नांदगाव खंडेश्वर ५५, तर चिखलदरा तालुक्यात ९ हेक्टरमध्ये नुकसान नोंदविले गेले.