शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

अवकाळीसह गारपिटीने १५ हजार हेक्टर बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्ह्यात १८ ते २० मार्च या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १४,९९४ हेक्टर ७० आर क्षेत्रामधील ...

अमरावती : जिल्ह्यात १८ ते २० मार्च या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १४,९९४ हेक्टर ७० आर क्षेत्रामधील शेती व फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. एका व्यक्तीसह चार गुरे दगावली. २० घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. यामध्ये सर्वाधिक ११,६८८ हेक्टरवरील संत्र्याच्या मृग बहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याशिवाय २,६२७ हेक्टरवरील उभा गहू झोपला.

जिल्ह्यातील १० तालुक्यांत १८ ते २० मार्च दरम्यान वादळासह अवकाळी पाऊस व गारपिटीने गहू, हरभरा, भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अमरावती तालुक्यातील ११ गावांत ६९ हेक्टरवरील गहू, १३ हेक्टरवरील कांदा, चांदूर रेल्वे तालुक्यात २८ गावांत ३३३ हेक्टरवरील गहू, ६४ हेक्टरवरील कांदा, , धामणगाव तालुक्यातील १३ गावांत ३३६ हेक्टरवरील गहू, २ हेक्टरवरील आंबा, धारणी तालुक्यात ६ गावांत ३५ हेक्टरवरील गहू, २७ हेक्टरवरील हरभरा, चिखलदरा तालुक्यात २ गावांत ८ हेक्टरवरील गहू, १ हेक्टरवरील हरभरा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ४ गावांत ५५ हेक्टरवरील गहू, मोर्शी तालुक्यात ४३ गावांमधील ५३० हेक्टरवरील गहू, १०४ हेक्टरवरील हरभरा, ३ हेक्टरवरील कांदा, २२ हेक्टरवरील भाजीपाला व २२ हेक्टरवरील इतर पिके, तिवसा तालुक्यात २४ गावांत ६५ हेक्टरवरील गहू, १ हेक्टरवरील कांदा, अचलपूर तालुक्यात ४३ गावांमध्ये ५८८ हेक्टरवरील गहू, ३ हेक्टरवरील हरभरा, ९४ हेक्टरवरील कांदा, ५५ हेक्टरवरील केळी तसेच चांदूर बाजार तालुक्यात ४९ गावांत ६०७ हेक्टरवरील गहू, २ हेक्टरवरील हरभरा व ७ हेक्टरवरील केळीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे.

बॉक्स

संत्रा मृग बहराचे नुकसान

चांदूरबाजार तालुक्यात संत्र्याच्या मृग बहराची सर्वाधिक ५,१२७ हेक्टरमध्ये फळगळ झाली. अचलपूर तालुक्यात २९६९ हेक्टर, मोर्शी ३१८०, धामणगाव रेल्वे ३७, चांदूर रेल्वे ३४७ व अमरावती तालुक्यातील २८ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर संत्राबागांचे नुकसान झाले.

बॉक्स

१० तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान

दहा तालुक्यांतील २२३ गावांमध्ये १४,९९४ हेक्टरवरील रबी पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक ६,००० हेक्टर चांदूर बाजार तालुक्यात आहे. मोर्शी ३८६१, अचलपूर ३७०९, चांदूर रेल्वे ७४५, धामणगाव रेल्वे ३७५, अमरावती ११०, तिवसा ६६.१०, धारणी ६३.२०, नांदगाव खंडेश्वर ५५, तर चिखलदरा तालुक्यात ९ हेक्टरमध्ये नुकसान नोंदविले गेले.