शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

पीककर्जाच्या रकमेत १५ टक्क्यांनी वाढ

By admin | Updated: October 8, 2016 00:08 IST

पुढील वर्षीच्या खरीप व रबी हंगामात पीककर्जाच्या रकमेत सरासरी १५ टक्के वाढ करण्यात येणार आहे.

दिलासा : राज्य समितीचे दर जिल्हा समितीला बंधनकारकअमरावती : पुढील वर्षीच्या खरीप व रबी हंगामात पीककर्जाच्या रकमेत सरासरी १५ टक्के वाढ करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पीककर्ज आढावा समितीत हा निर्णय झाल्याची माहीती सूत्रांनी दिली. याविषयीचा शासन अध्यादेश लवकरच जाहीर होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आगामी खरीप व रबी हंगामात विविध पिकांची कर्जमर्यादा ठरविण्यासाठी राज्यस्तर पीककर्ज आढावा समितीची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये येत्या हंगामात शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या अडचणी, विविध पिकांचा वाढलेला उत्पादन खर्च व हेक्टरी सरासरी उत्पादन आणि बाजारभावावर आधारित विविध पिकांची कर्जमर्यादा ठरविण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात पुढील वर्षासाठी पीककर्जाचे दर ठरविण्यासाठी राज्यस्तर पीककर्ज आढावा समितीची बैठक होते. एप्रिलपासून कर्ज वाटपाला सुरूवात अमरावती : त्यानंतर सर्व जिल्हा बँकांच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत जिल्हा पीककर्ज आढावा समितीची बैठक घेण्यात येते. यामध्ये पीक पद्धतीनुसार संबंधित बँकांना राज्यस्तर समितीने ठरवून दिलेल्या पीककर्ज मर्यादेच्या १५ टक्क्यापर्यंत पीककर्जात वाढ करण्याचे अधिकार आहेत. मात्र, राज्यस्तर समितीने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कर्जाचे दर जिल्हा समित्यांना कमी करता येणार नाहीत, प्रतिहेक्टरी खर्च व उत्पादन, सध्याचे बाजारभाव, सरासरी पीकक्षेत्र अशा सर्व बाबी गृहित धरून पीककर्ज दर ठरविण्यात येतो. यामध्ये खरीप, रबी, उन्हाळी पिके, भाजी, फळे व फुले यासर्व पिकांचा विचार केला जातो व कर्जवाटपाला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरूवात करण्यात येते. (प्रतिनिधी)