शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

पिकविम्यात १.२५ लाख शेतकऱ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:11 IST

अमरावती : कोरोना संसर्गाच्या अडचणीमुळे काही शेतकरी पीक विम्यात सहभागी होऊ न शकल्याने आता २३ जुलैपर्यंत सहभाग घेता येणार ...

अमरावती : कोरोना संसर्गाच्या अडचणीमुळे काही शेतकरी पीक विम्यात सहभागी होऊ न शकल्याने आता २३ जुलैपर्यंत सहभाग घेता येणार आहे. यापूर्वी ही मुदत १५ जुलै होती. तसे आदेश कृषी विभागाचे सहायक आयुक्तांनी गुरुवारी जारी केले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १,२५,११२ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे.

हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास तसेच सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रात पेरणी न झाल्यास, पिकांच्या हंगामध्ये पावसात खंड, पूर दुष्काळ आदींमुळे सरासरी उत्पादनात सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल, तर विमा देय राहणार आहे. याशिवाय पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात घट येणार असल्यास पिकांना विमा संरक्षण दिले जाते. यासाठी भरपाई वैयक्तिक स्तरावर पंचनामे करण्यात येऊन निश्चित करण्यात येणार आहे.

काढणीपश्चात नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करण्यात येऊन नुकसानभरपाई देय राहणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी ७२ तासांपूर्वी याची माहिती कंपनी किंवा कृषी विभागाला कळविणे महत्त्वाचे असल्याचे कृषी विभागाने सांगितले. मुदतवाढ झाल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.

बॉक्स

- तर आत दिवस अगोदर घोषणापत्र आवश्यक

कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होणे किंवा न होणे यासाठी पर्याय उपलब्ध आहे. जे कर्जदार शेतकरी विम्यात सहभागी होण्यास ईच्छूक नाहीत त्यांनी अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर तसे घोषणापत्र बँकाना देणे महत्वाचे आहे. जे शेतकरी घोषणापत्र देणार नाहीत, त्यांच्या खात्यातून विमा हप्ता कपात करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.