शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

‘अमृत’साठी १२२ कोटी मंजूर

By admin | Updated: May 4, 2016 00:24 IST

केंद्र सरकारच्या अटल मिशन रेजीव्हेशन अ‍ॅन्ड अर्बन (अमृत) योजनेत अमरावती महापालिका आणि अचलपूर नगरपरिषदेचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्हास्तरीय समितीचे गठन : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा प्रस्तावअमरावती : केंद्र सरकारच्या अटल मिशन रेजीव्हेशन अ‍ॅन्ड अर्बन (अमृत) योजनेत अमरावती महापालिका आणि अचलपूर नगरपरिषदेचा समावेश करण्यात आला आहे. नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीचे गठन करण्यात आले असून अमरावतीत पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी १२२ कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या अनुषंगाने नागरिकांना पायाभूत सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्राने अमरावतीसह अचलपूर शहराचा ‘अमृत’ योजनेत समावेश केला. राज्यानेदेखील ही योजना यशस्वीपणे राबविली जावी, याकरिता बैठकांचे सत्र चालविले आहे. अमरावती शहरात पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, यासाठी १२२ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला. जीवन प्राधिकरणाने पाणी पुरवठा योजनेशी निगडित बाबींचा समावेश करून सदर प्रस्ताव राज्य शासनाक डे १६ एप्रिल रोजी सादर केला आहे. मजीप्राचा २५ टक्के स्वहिस्साअमरावती : ‘अमृत’ योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षस्थानी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे सहअध्यक्ष खा. आनंदराव अडसूळ तर सदस्य म्हणून महापौर, आयुक्त, आमदार, पाणी पुरवठा अधीक्षक अभियंता, नगरसेवकांचा समावेश करण्यात आला आहे. १२२ कोटींच्या प्रस्तावाद्वारे अमरावतीत पाणी पुरवठ्याशी निगडीत समस्या मार्गी लावल्या जाणार आहे. ‘अमृत’ योजनेत जीवन प्राधिकरणाला २५ टक्के स्वहिस्सा अदा करावा लागणार आहे. ही रक्कम ३० कोटींच्या घरात राहणार आहे. योजनेतून पाणी पुरवठ्याशी निगडि तकामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.‘अमृत’मधून ही कामे होतील पूर्णसिंभोरा येथे सहा पंप बदलविणेतपोवन येथे ६१ दशलक्ष मीटरचे शुद्धीकरण केंद्र निर्मितीशहरात नवे १३ जलकुंभ निर्माण करणेजुन्या २६३ कि. मी. लांबीच्या जलवाहिनी बदलविणेशहरात नवीन २६५ कि.मी. जलवाहिन्या टाकणेतपोवन येथील पंप बदलविण्यासह किरकोळ कामेतपोवन येथे ११.५० लाख रुपयांचे सोलर पंप बसविणेजिल्ह्यात ‘अमृत’ योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शन तत्त्वानुसार जिल्हास्तरीय समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीच्या दोन बैठका घेण्यात आल्या आहेत.- किरण गीत्ते,जिल्हाधिकारी, अमरावतीकेंद्र सरकारने ९६.५० कोटींच्या प्रस्तावाला मान्यता दिली. मात्र कामे वाढल्यामुळे हा प्रस्ताव १२२ कोटींवर पोहोचला. राज्य शासनाने मंजुरी दिली असून निविदा प्रक्रिया राबविली जाईल.- प्रशांत भामरे, कार्यकारी अभियंता (मजिप्रा)