शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

१२ ग्रामपंचायती, ४३४ सदस्य अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:36 IST

अमरावती : एकही उमेदवारी अर्ज नसल्याने जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायती व ४३४ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय १६ जागांवर ...

अमरावती : एकही उमेदवारी अर्ज नसल्याने जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायती व ४३४ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय १६ जागांवर निवडणूक अर्ज दाखल न झाल्याने तेथील सदस्यपद रिक्त राहिले आहे.

जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. यामध्ये १२ ग्रामपंचायती अविरोध निवडून आल्याने प्रत्यक्षात ५४१ ग्रामपंचायतींमध्ये आता निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात नांदसावंगी, सातरगाव, पिंपरी निपाणी, सुलतानपूर, तिवसा तालुक्यात ठाणाठुणी, चांदूर रेल्वे तालुक्यात येरड, धामणगाव रेल्वे तालुक्यात काशीखेड, निंबोरा बोडखा, मोर्शी तालुक्यात लिहिदा, पाळा, चांदूर बाजार तालुक्यातील वडुरा व अचलपूर तालुक्यात दर्याबाद या ग्रामपंचायती अविरोध झाल्या आहेत.

निवडणुकीसाठी एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे दर्यापूर तालुक्यात पाच, अचलपूर चार व धारणी तालुक्यात सात अशा एकूण १६ जागा प्रभाग रिक्त असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले. ४३४ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. यामध्ये अमरावती तालुक्यातील ३०, भातकुली ३६, नांदगाव खंडेश्वर ५६, दर्यापूर २२, अंजनगाव सुर्जी ३२, तिवसा १५, चांदूर रेल्वे १६, धामणगाव रेल्वे २६, अचलपूर ३८, चांदूर बाजार ४१, मोर्शी ३४.वरुड १०, धारणी ४३ व चिखलदरा तालुक्यातील ३५ सदस्यांचा समावेश आाहे.

बॉक्स

४४५२ जागांसाठी निवडणूक

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या ४४५२ सदस्यपदांसाठी आता १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यातील ३८६, भातकुली २७६, नांदगाव खंडेश्वर ३६३, दर्यापूर ४१७, अंजनगाव सुर्जी २८०, तिवसा २४६, चांदूर रेल्वे २१९, धामणगाव रेल्वे ४३१, अचलपूर ३६४, चांदूर बाजार ३४०, मोर्शी ३१४, वरुड ३६९, धारणी २८३ व चिखलदरा तालुक्यात १६४ जागांचा समावेश आाहे.