शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
2
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
3
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
4
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
5
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
6
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!
7
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
8
अंगठी विकता विकता कोट्यधीश बनला, दुबईहून यायचे मौलाना; गरीब युवतींना 'असं' जाळ्यात अडकवायचे, मग...
9
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
10
हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून
11
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
12
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
13
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
14
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
15
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
16
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
17
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
18
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
19
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
20
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार

११ शेतकऱ्यांनी परत केला अतिवृष्टीचा मदतनिधी

By admin | Updated: January 28, 2015 23:07 IST

अडीच वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णानगर येथील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे खरीप पीक नष्ट झाले होते. त्याची नुकसान भरपाई म्हणून ५०० रुपये शेतकऱ्यांच्या बँक

अमरावती : अडीच वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णानगर येथील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे खरीप पीक नष्ट झाले होते. त्याची नुकसान भरपाई म्हणून ५०० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जानेवारी २०१५ मध्ये जमा करण्यात आले. त्यामुळे दुष्काळातही शासनाला थट्टा सुचते, असा आरोप करीत ११ शेतकऱ्यांनी एकत्रितपणे ५ हजार ९०० रूपयांचा डी. डी. (धनादेश) शासनाला परत केला आहे.४ ते ५ सप्टेंबर २०१२ रोजी अतिवृष्टी होऊन भातकुली तालुक्याताील पूर्णानगर येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपाशी, तूर, मूग व उडीद पिकांचे प्रचंड नुकसान झाले.अतिवृष्टीमुळे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी संयुक्त पाहणी व पंचनामे केलेत. शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. अहवालही अधिकाऱ्यांना दिला. मदतनिधीची रक्कम पाहिल्यावर शेतकऱ्यांना धक्का बसला. शेतकऱ्यांना एकाच मापात तोलण्यात आलेले आहे. अतिवृष्टीच्या शासन मदतीच्या निकषापेक्षाही कितीतरी पटीने कमी केले आहे.मदतीचा निकष कोणता, संतप्त शेतकऱ्यांचा सवालनैसर्गिक आपत्तीमध्ये हेक्टरी ४५०० रूपयांची मदत मिळते. अतिवृष्टीदेखील नैसर्गिक आपत्तीच असल्याने प्रचलित निकषानुसार शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे. प्रत्यक्षात ३ ते ८ एकर शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५०० ते ६०० रूपयांची शासन मदत देण्यात आल्याने मदतीचा निकष कोणता, असा संतप्त शेतकऱ्यांचा सवाल आहे.