शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

११ शेतकऱ्यांनी परत केला अतिवृष्टीचा मदतनिधी

By admin | Updated: January 28, 2015 23:07 IST

अडीच वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णानगर येथील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे खरीप पीक नष्ट झाले होते. त्याची नुकसान भरपाई म्हणून ५०० रुपये शेतकऱ्यांच्या बँक

अमरावती : अडीच वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णानगर येथील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे खरीप पीक नष्ट झाले होते. त्याची नुकसान भरपाई म्हणून ५०० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जानेवारी २०१५ मध्ये जमा करण्यात आले. त्यामुळे दुष्काळातही शासनाला थट्टा सुचते, असा आरोप करीत ११ शेतकऱ्यांनी एकत्रितपणे ५ हजार ९०० रूपयांचा डी. डी. (धनादेश) शासनाला परत केला आहे.४ ते ५ सप्टेंबर २०१२ रोजी अतिवृष्टी होऊन भातकुली तालुक्याताील पूर्णानगर येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपाशी, तूर, मूग व उडीद पिकांचे प्रचंड नुकसान झाले.अतिवृष्टीमुळे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी संयुक्त पाहणी व पंचनामे केलेत. शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. अहवालही अधिकाऱ्यांना दिला. मदतनिधीची रक्कम पाहिल्यावर शेतकऱ्यांना धक्का बसला. शेतकऱ्यांना एकाच मापात तोलण्यात आलेले आहे. अतिवृष्टीच्या शासन मदतीच्या निकषापेक्षाही कितीतरी पटीने कमी केले आहे.मदतीचा निकष कोणता, संतप्त शेतकऱ्यांचा सवालनैसर्गिक आपत्तीमध्ये हेक्टरी ४५०० रूपयांची मदत मिळते. अतिवृष्टीदेखील नैसर्गिक आपत्तीच असल्याने प्रचलित निकषानुसार शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे. प्रत्यक्षात ३ ते ८ एकर शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५०० ते ६०० रूपयांची शासन मदत देण्यात आल्याने मदतीचा निकष कोणता, असा संतप्त शेतकऱ्यांचा सवाल आहे.