शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

११ शेतकऱ्यांनी परत केला अतिवृष्टीचा मदतनिधी

By admin | Updated: January 28, 2015 23:07 IST

अडीच वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णानगर येथील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे खरीप पीक नष्ट झाले होते. त्याची नुकसान भरपाई म्हणून ५०० रुपये शेतकऱ्यांच्या बँक

अमरावती : अडीच वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णानगर येथील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे खरीप पीक नष्ट झाले होते. त्याची नुकसान भरपाई म्हणून ५०० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जानेवारी २०१५ मध्ये जमा करण्यात आले. त्यामुळे दुष्काळातही शासनाला थट्टा सुचते, असा आरोप करीत ११ शेतकऱ्यांनी एकत्रितपणे ५ हजार ९०० रूपयांचा डी. डी. (धनादेश) शासनाला परत केला आहे.४ ते ५ सप्टेंबर २०१२ रोजी अतिवृष्टी होऊन भातकुली तालुक्याताील पूर्णानगर येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपाशी, तूर, मूग व उडीद पिकांचे प्रचंड नुकसान झाले.अतिवृष्टीमुळे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी संयुक्त पाहणी व पंचनामे केलेत. शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. अहवालही अधिकाऱ्यांना दिला. मदतनिधीची रक्कम पाहिल्यावर शेतकऱ्यांना धक्का बसला. शेतकऱ्यांना एकाच मापात तोलण्यात आलेले आहे. अतिवृष्टीच्या शासन मदतीच्या निकषापेक्षाही कितीतरी पटीने कमी केले आहे.मदतीचा निकष कोणता, संतप्त शेतकऱ्यांचा सवालनैसर्गिक आपत्तीमध्ये हेक्टरी ४५०० रूपयांची मदत मिळते. अतिवृष्टीदेखील नैसर्गिक आपत्तीच असल्याने प्रचलित निकषानुसार शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे. प्रत्यक्षात ३ ते ८ एकर शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५०० ते ६०० रूपयांची शासन मदत देण्यात आल्याने मदतीचा निकष कोणता, असा संतप्त शेतकऱ्यांचा सवाल आहे.