शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

१०५ सुपूत्र करतात भारतमातेचे रक्षण

By admin | Updated: August 15, 2015 00:41 IST

शविवारी आपण देशाच्या स्वातंत्र्याचा ६८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत.

स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान : सर्वाधिक सैनिक निंबोलीचे, धामणगाव तालुक्याचा स्वातंत्र्य लढ्यात सहभागधामणगाव रेल्वे : शविवारी आपण देशाच्या स्वातंत्र्याचा ६८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. स्वातंत्र्याचे हे फळ चाखताना यासाठी बऱ्याच लोकांनी मोजलेली किंमत विस्मरणात जाऊ नये, असे वाटते. लाखोंनी दिलेल्या बलिदानाच्या पायाभरणीवर स्वातंत्र्याची इमारत उभी आहे. अनेक देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली़ विद्यानगरी म्हणून लौकिकप्राप्त धामणगावनगरीदेखील यात मागे नव्हती. आजही या नगरीतील १०५ सुपुत्र भारतमातेचे रक्षण करीत आहेत.सुगनचंद लुनावत, अंबादास भेंडे, बाबासाहेब अंदुरकर, अमरसिंह ठाकूर, गुलाबराव झाडे यांच्यासह अनेक माजी सैनिक या नगरीत होऊन गेलेत. सुगनचंद लुनावत हे महात्मा गांधी यांच्यासोबत अहिंसेच्या मार्गाने लढा उभारत असताना सन १९४१ मध्ये त्यांना अटक करुन नागपूर येथील तुरुंगात सहा महिने ठेवण्यात आले. त्यावेळी त्यांना तेथे अंबाडीचे बेत तयार करण्याचे काम देण्यात आले होते. लुनावत हे महात्मा गांधी यांच्या म्हणण्याप्रमाणे आमदारकीचा राजीनामा देऊन स्वतंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्यासोबतीने स्वातंत्र्याकरिता लढा दिला होता़ आजही तालुक्याचे या राष्ट्रीय कामात मोठे योगदान आहे़ आजपर्यंत झालेल्या विविध युध्दात तसेच सीमेपलीकडून झालेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. जन्म देणाऱ्या आईपेक्षा भारतमातेला अधिक सन्मान देणारे १०५ सैनिक तालुक्यात आहेत़ उत्तरपूर्व, सागरी सीमा असलेल्या त्रिकोणी भागात व भारतीय संरक्षण खात्यातील तीनही विभागांत धामणगावातील सैनिक कार्यरत आहेत. सावळा व निंबोली ही गावे आजही सैनिकांची गावे म्हणून ओळखली जातात. सावळा येथील चिकटे कुटुंबातील दोन सदस्य सैन्य दलात तैनात आहेत. निंबोली येथील विशाल प्रशांत वैरागडे यांच्यासह याच गावांतील सहा सैनिक देशसेवेचे कर्तव्य बजावत आहेत. धामणगाव शहरातील तब्बल अकरा तर मंगरूळ दस्तगीर येथील आठ सैनिकांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी अर्पण केले आहे़ शेंदुरजना खुर्द, काशीखेड, आसेगाव, निंभोरा बोडका, वरूड बगाजी, ढाकुलगाव, रायपूर कासरखेड, वकनाथ, नारगावंडी, बोरगाव निस्ताने, पिंपळखुटा, झाडगाव, वाढोणा येथील अनेक जवान सैन्यदलात सामील होऊन भारतमातेची सेवा करीत आहेत.१४ विरपूत्र झाले शहीद आजपर्यंत सीमेपलिकडून झालेला हल्ला, भारत-पाकिस्तानमध्ये झालेले युध्द, कारगीलचे युध्द यात जिल्ह्यातील १४ तर धामणगाव तालुक्यातील आजनगाव व पिंपळखुटा येथील दोन जवान यापूर्वी शहीद झाले आहेत. आजही अशा शहीद जवानांच्या वीर नारी, वीर माता, वीर पित्यांचा सन्मान १६ आॅगस्ट रोजी अमरावती जिल्हा सैनिक कार्यालयाच्यावतीने करण्यात आल्याची माहिती जिल्हा सैनिक विभागाचे अधिकारी रत्नाकर चरडे व जनमाहिती अधिकारी दिनेश गोवारे यांनी दिली़