शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

१०० कोटींत 'स्मार्ट सिटी' ?

By admin | Updated: June 19, 2016 23:54 IST

महापालिकेसह राज्यातील आठ महापालिकांमध्ये राज्यस्तरावर 'स्मार्ट सिटी अभियान' राबविले जाणार आहे.

महापालिकेत अंमलबजावणी : सिडकोकडे निधीची जबाबदारीअमरावती : महापालिकेसह राज्यातील आठ महापालिकांमध्ये राज्यस्तरावर 'स्मार्ट सिटी अभियान' राबविले जाणार आहे. या आठ महापालिकांना राज्य शासनाच्या महामंडळाकडून प्रत्येकी १०० कोटींचा निधी देण्यात येईल.केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानातील पहिल्या फेरीत निवड न झालेल्या नवी मुंबई, नाशिक, बृहमुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती, कल्याण डोंबीवली आणि औरंगाबाद या आठ महापालिकांमध्ये स्मार्ट सिटी अभियान राबविले जाईल. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षापासून हे अभियान राबविण्याच्या सूचना नगरविकास विभागाने दिल्या आहेत. स्मार्ट सिटी अभियानात पहिल्या टप्प्यात राज्यस्तरीय उच्चधिकार समितीने दहा शहरांची शिफारस केली होती. त्यापैकी पुणे आणि सोलापूर या दोनच महापालिकांची पहिल्या टप्प्यात निवड झाली. निवडलेल्या आठ शहरांमध्ये स्मार्ट सिटी अभियान राबविण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. यासंदर्भात १८ जून रोजी शासन निर्णय काढण्यात आला. पुणे आणि सोलापूरशिवाय उर्वरित आठ महानगरपालिकांचा समावेश पुढच्या फेरीमध्ये होणे शासनाला अपेक्षित आहे. या महापालिकांना निधी देऊन स्मार्ट सिटी अभियान राबविण्याचा संकल्प सत्ताधीशांनी सोडला आहे. पहिल्या वर्षी बृहन्मुंबई व नवी मुंबई वगळता अन्य ६ महापालिकांना प्रत्येकी ५० कोटी रुपयांचाच निधी मिळणार आहे.नंबर गेम हुकणार ?अमरावतीसह राज्यातील आठ महापालिकांची स्मार्ट सिटी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात निवड झाली नाही. त्यानंतर 'फास्ट ट्रॅक'मध्येही या महापालिकांचा समावेश झाला नाही. दुसऱ्या टप्प्यात समावेश करून घेण्यासाठी या महापालिकांकडून फेर प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरू आहे. तथापि, केंद्रस्तरावर असलेली ६७ शहरांमधील स्पर्धा पाहता दुसऱ्या टप्प्यातही अमरावतीसह बहुतांश महापालिकांचा नंबर हुकण्याचीच अधिक शक्यता आहे. त्या अनुषंगाने राज्यस्तरावर स्मार्ट सिटी अभियानाच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.अमरावतीची जबाबदारी अप्पर मुख्य सचिवांवरआठ महापालिकांमध्ये स्मार्ट सिटी अभियानाकरिता विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही) चे गठन केले जाईल. कंपनी अधिनियम २०१३ अन्वये नव्याने गठित 'एसपीव्ही' ही शासकीय कंपनी असेल. एसपीव्हीवर शासनाचे प्रतिनिधी व अन्य सदस्य राहतील. अभियानाकरिता नियुक्त मार्गदर्शक एसपीव्हीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष असतील. अमरावतीसाठी ही जबाबदारी नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोटवाल यांच्यावर तर सदस्यांमध्ये पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागाचे नगररचना सहसंचालकांचा समावेश आहे. सिडको देईल १०० कोटींचा निधी अमरावतीसह नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर शहराला सिडको प्रति महानगरपालिका १०० कोटी रुपये देईल, केंद्रनिधीऐवजी सिडको आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे या निधीची जबाबदारी निध ीस्रोत म्हणून देण्यात आली आहे.