शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

पाणी टंचाईसाठी १० कोटींचा आराखडा

By admin | Updated: January 19, 2016 00:12 IST

यावर्षीही पावसाने दडी मारल्यामुळे उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही तालुक्यात पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेता...

प्रक्रिया पूर्ण : जिल्हाधिकारी देणार मंजुरीअमरावती : यावर्षीही पावसाने दडी मारल्यामुळे उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही तालुक्यात पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ सुमारी १० कोटी रूपयाचा कृती आराखडा तयार केला आहे. हा आराखडा मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. मंगळवारी कृती आराखडयास जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम मान्यता दिली जाण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने यावर्षी तयार केलेल्या संभाव्य पाणी टंचाईच्या कृती आराखडयात जिल्ह्यातील ७०८ गावात ७३६ पाणी टंचाईच्या उपाय योजना प्रस्तावित केल्या आहे. यासाठी जवळपास १० कोटी रूपयाचा खर्च अपेक्षित आहे. दरवर्षी आॅक्टोंबर ते डिसेंबर २०१५ या कालावधीत पाणी टंचाईच्या पहिल्या टप्यात जिल्ह्यात कुठेही पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली नाही. दुसऱ्या टप्यात जानेवारी ते मार्च २०१६ या कालावधीत जिल्ह्यातील ४०१ गावे व वाड्यांमध्ये मागणी नुसार पाणी टंचाईसाठी उपाय योजना प्रस्तावित करण्यात येणार आहेत. तर पाणी टंचाईच्या तिसऱ्या टप्यातील एप्रिल ते जून २०१६ या कालवधीत जिल्ह्यातील काही गावात तीव्र पाणी टंचाईची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने ३०७ गावात पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. संभाव्य कृती आराखडयात नवीन विंधन विहीर ३०७, नळ योजनांची विशेष दुरूस्ती १९१, तात्पुरत्या पूरक नळयोजना ५३, टँकर अथवा बैलजोडीने पाणी पुरवठा करणे १५ गावे, विहिरींचे अधिग्रहण करणे १७० यासोबतच वेळेवर उद्भवणाऱ्या परिस्थिती नुसार विहिंरीचे खोलीकरण, गाळ काढणे, विंधन विहिरींची दुरूस्ती आदी उपाययोजना करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने संभाव्य पाणी टंचाईची कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पाणी टंचाईचा आराखडा अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी गित्ते यांची मंजुरात मिळताच त्यानुसार अंलबजावणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)