शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

पाणी टंचाईसाठी १० कोटींचा आराखडा

By admin | Updated: January 19, 2016 00:12 IST

यावर्षीही पावसाने दडी मारल्यामुळे उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही तालुक्यात पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेता...

प्रक्रिया पूर्ण : जिल्हाधिकारी देणार मंजुरीअमरावती : यावर्षीही पावसाने दडी मारल्यामुळे उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही तालुक्यात पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ सुमारी १० कोटी रूपयाचा कृती आराखडा तयार केला आहे. हा आराखडा मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. मंगळवारी कृती आराखडयास जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम मान्यता दिली जाण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने यावर्षी तयार केलेल्या संभाव्य पाणी टंचाईच्या कृती आराखडयात जिल्ह्यातील ७०८ गावात ७३६ पाणी टंचाईच्या उपाय योजना प्रस्तावित केल्या आहे. यासाठी जवळपास १० कोटी रूपयाचा खर्च अपेक्षित आहे. दरवर्षी आॅक्टोंबर ते डिसेंबर २०१५ या कालावधीत पाणी टंचाईच्या पहिल्या टप्यात जिल्ह्यात कुठेही पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली नाही. दुसऱ्या टप्यात जानेवारी ते मार्च २०१६ या कालावधीत जिल्ह्यातील ४०१ गावे व वाड्यांमध्ये मागणी नुसार पाणी टंचाईसाठी उपाय योजना प्रस्तावित करण्यात येणार आहेत. तर पाणी टंचाईच्या तिसऱ्या टप्यातील एप्रिल ते जून २०१६ या कालवधीत जिल्ह्यातील काही गावात तीव्र पाणी टंचाईची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने ३०७ गावात पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. संभाव्य कृती आराखडयात नवीन विंधन विहीर ३०७, नळ योजनांची विशेष दुरूस्ती १९१, तात्पुरत्या पूरक नळयोजना ५३, टँकर अथवा बैलजोडीने पाणी पुरवठा करणे १५ गावे, विहिरींचे अधिग्रहण करणे १७० यासोबतच वेळेवर उद्भवणाऱ्या परिस्थिती नुसार विहिंरीचे खोलीकरण, गाळ काढणे, विंधन विहिरींची दुरूस्ती आदी उपाययोजना करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने संभाव्य पाणी टंचाईची कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पाणी टंचाईचा आराखडा अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी गित्ते यांची मंजुरात मिळताच त्यानुसार अंलबजावणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)