शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

झोननिहाय डम्पिंग ग्राउंडचे नियोजन कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:17 IST

कचरा साठवणुकीसाठी नायगावस्थित ‘डम्पिंग ग्राउंड’ची जागा अपुरी पडत असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी घाण व कचर्‍याचे ढीग साचले आहेत. शहराचा विस्तार व कचर्‍याची समस्या लक्षात घेता, साचलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी मध्यंतरी मनपा प्रशासनाने झोननिहाय ‘डम्पिंग ग्राउंड’चे नियोजन केले होते. कचर्‍याच्या समस्येमुळे अक ोलेकर त्रस्त झाले असताना सत्ताधारी व प्रशासनाचे नियोजन अद्यापही कागदावर असल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देकचर्‍याच्या समस्येमुळे अकोलेकर त्रस्तसत्ताधारी-प्रशासनाचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कचरा साठवणुकीसाठी नायगावस्थित ‘डम्पिंग ग्राउंड’ची जागा अपुरी पडत असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी घाण व कचर्‍याचे ढीग साचले आहेत. शहराचा विस्तार व कचर्‍याची समस्या लक्षात घेता, साचलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी मध्यंतरी मनपा प्रशासनाने झोननिहाय ‘डम्पिंग ग्राउंड’चे नियोजन केले होते. कचर्‍याच्या समस्येमुळे अक ोलेकर त्रस्त झाले असताना सत्ताधारी व प्रशासनाचे नियोजन अद्यापही कागदावर असल्याचे चित्र आहे. नायगाव परिसरात महापालिकेच्या मालकीच्या सुमारे १२ एकर जागेवर ‘डम्पिंग ग्राउंड’ निर्माण करण्यात आले. या ठिकाणी साठवणूक होणार्‍या कचर्‍यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे कचर्‍याचे ढीग साचले आहेत. परिसरात प्रचंड दुर्गंंधी पसरली असून, स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. कचर्‍यामुळे परिसरातील पाण्याचे जलस्रोतदेखील दूषित झाले आहेत. शिवाय, स्थानिक अतिक्रमकांनी मनपाच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा सपाटा लावल्यामुळे समस्येत अधिकच भर पडली आहे. शहरातील कचरा घेऊन जाणार्‍या मनपाच्या घंटागाडी चालकांना शिवीगाळ करणे, धमकाविण्यासह मारहाण करण्यापर्यंत अतिक्रमकांनी मजल गाठली आहे. एकूणच ही समस्या ध्यानात घेता नायगावातील ‘डम्पिंग ग्राउंड’वरील कचर्‍यावर प्रक्रिया करण्याची नितांत गरज आहे. कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प उभारणे आवश्यक असताना महापालिका झोननिहाय ‘डम्पिंग ग्राउंड’ निर्माण करण्याच्या तयारीत असून, त्यानुषंगाने जागेचा शोध घेतला जात आहे. डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवणूक करण्यास स्थानिकांचा विरोध होत असल्यामुळे घंटागाडी चालक शहरात जागा दिसेल त्या ठिकाणी कचरा टाकून मोकळे होत आहेत. परिणामी, शहरात साथीचे आजार डोके वर काढू लागले आहेत. एकूणच, कचर्‍याची बिकट समस्या ध्यानात घेता प्रशासनासह सत्ताधारी भाजपाने तातडीने तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. 

जागेसाठी शोधाशोध पण..घनकचर्‍याची समस्या निकाली काढण्यासाठी मनपा आयुक्त अजय लहाने प्रयत्नरत असले, तरी ठोस उपाय निघत नसल्याची परिस्थिती आहे. मध्यंतरी आयुक्त लहाने यांनी मनपात सामील झालेल्या नवीन प्रभागांमधील शासकीय जमिनींची पाहणी केली होती. त्यामध्ये शिलोडा, गुडधी, शिवणी, शिवर परिसरातील ‘ई-क्लास’ जमिनीचा समावेश होता. २0 ते २५ एकर जमिनीवर एकाच ठिकाणी कचरा साठवणूक करून त्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे.

मनपाचा प्रयोग धोक्याची घंटा?मनपाने झोननिहाय डम्पिंग ग्राउंड निर्माण करून कचरा साठविल्यास शहराच्या चारही बाजूंनी दुर्गंंधीची समस्या निर्माण होऊन जलस्रोत दूषित होतील, यात दुमत नाही. त्यामुळे मनपाचा हा प्रयोग अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा मानल्या जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार तयार केलेल्या मैदानावर कचरा साठवल्यास प्रदूषणाची तीव्रता काहीअंशी कमी होईल, असे मैदान तयार करण्याची प्रशासनाची तयारी आहे का, यासंदर्भात सत्ताधारीच नव्हे, तर सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारण्याची गरज आहे.