शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

जिल्हा परिषदेत अडकला पाणीटंचाई निवारणाचा आराखडा! ............................ (पाणीटंचा‘ई’ असेच वापरावे इ नको)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:31 IST

अकोला : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या दोन टप्प्यांतील कृती आराखडा तयार ...

अकोला : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या दोन टप्प्यांतील कृती आराखडा तयार करण्याकरिता पंचायत समित्यांकडून उपाययोजनांचे प्रस्ताव सादर करण्यास विलंब झाल्याने जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा अद्याप तयार करण्यात करण्यात आला नाही. त्यामुळे पाणीटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांचा जिल्हा परिषदेत अडकलेला आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी केव्हा सादर करण्यात येणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या कालाधीकरिता दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कृती आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश १८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांचे तालुकानिहाय प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्राद्वारे देण्यात आल्या होत्या; परंतु जिल्ह्यातील जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांकडून ३ फेब्रुवारीपर्यंत पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्यात आले. उपाययोजनांचे प्रस्ताव सादर करण्यास पंचायत समित्यांकडून विलंब झाल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत अद्यापही तयार करण्यात आला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत अडकलेला पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजुरीसाठी केव्हा सादर करण्यात येणार आणि पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उपाययोजनांचा आराखडा

तयार करण्याची प्रक्रिया सुरू!

जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांकडून ३ फेब्रुवारीपर्यंत पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी तालुकानिहाय गावे, प्रस्तावित उपाययोजना आणि अपेक्षित खर्चाच्या रकमेसह जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार करण्याची प्रक्रिया ४ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सुरू करण्यात आली.

पहिल्या टप्प्यातील

मंजूर कामेही रखडलेली!

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीकरिता पहिल्या टप्प्यातील कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून १८ डिसेंबर रोजी मंजुरी दिली. पहिल्या टप्प्यातील कृती आराखड्यात जिल्ह्यातील २५ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी ३६ उपाययोजनांची कामे प्रस्तावित आहेत, परंतु पहिल्या टप्प्यात मंजूर कृती आराखड्यातील २ कोटी १४ लाख १६ हजार रुपयांची कामेदेखील जिल्हा परिषदेत रखडली आहेत.