शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

जिल्हा परिषदेचा फौजदारी कारवाईकडेही काणाडोळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:32 IST

अकोला : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये विविध योजनांच्या कामांत अपहारांच्या ६०२ प्रकरणांत सात कोटी २२ लाख ५८ रुपयांच्या रकमेची वसुली गेल्या ...

अकोला : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये विविध योजनांच्या कामांत अपहारांच्या ६०२ प्रकरणांत सात कोटी २२ लाख ५८ रुपयांच्या रकमेची वसुली गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असतानाच फौजदारी कारवाई करण्याकडेही जिल्हा परिषद प्रशासनाने काणाडोळा केल्याचे वास्तव समोर येत आहे.

ग्रामपंचायतींचा सामान्य निधी, जवाहर रोजगार योजना, जवाहर ग्रामीण संपूर्ण योजना आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना इत्यादी योजनांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना उपलब्ध झालेल्या निधीतून करण्यात आलेल्या विविध कामांमध्ये २००५ ते २०१५ या दहा वर्षांच्या कालावधीत निधी खर्चात अपहार झाल्याची ६०२ प्रकरणे सिद्ध झाली. दहा वर्षांचा कालावधी उलटून गेला; मात्र अपहारांच्या प्रकरणांतील सात कोटी २२ लाख ५८ हजार रुपयांची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्याची प्रक्रिया अद्यापही जिल्हा परिषद प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली नाही. अपहारांची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया प्रलंबित असतानाच, अपहारांच्या प्रकरणांत फौजदारी कारवाई करण्याच्या कामातही जिल्हा परिषद प्रशासनाकडून काणाडोळा करण्यात आल्याचे वास्तव आहे.

जिल्हा परिषद प्रशासन

कारवाई करणार तरी केव्हा?

ग्रामविकास विभागाने ४ जानेवारी २०१७ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या अपहारांच्या प्रकरणांत अपहार सिद्ध झाल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु २००५ ते २०१५ या दहा वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात ६०२ अपहारांची प्रकरणे सिद्ध झाल्यानंतर या प्रकरणांमध्ये जिल्हा परिषद प्रशासनामार्फत अद्यापही अपहाराच्या रकमेची वसुली आणि फौजदारी कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन कारवाई करणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कारवाईच्या कामात ‘बीडीओं’ची कुचराई !

ग्रामपंचायती अंतर्गत कामांमध्ये अपहार सिद्ध झाल्याच्या प्रकरणांत संबंधितांकडून अपहाराची रक्कम वसूल करण्यासह फौजदारी कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांची (बीडीओ) आहे; मात्र २००५ ते २०१५ या कालावधीत जिल्ह्यात अपहारांची ६०२ प्रकरणे सिद्ध झाल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांकडून अपहाराची रक्कम वसूल करण्यासह फौजदारी कारवाई अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे यासंदर्भात कारवाई करण्याच्या कामात जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांकडून कुचराई करण्यात आल्याची बाब समोर येत आहे.

योजनानिहाय अपहारांच्या

प्रकरणांची अशी आहे संख्या!

ग्रामपंचायत सामान्य निधी : ३७४

जवाहर रोजगार योजना : १०७

जवाहर ग्रामीण संपूर्ण योजना : ४८

संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना : ७३

........................................................

एकूण : ६०२