शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

युवक काँग्रेसच्यावतीने कॅँ डल मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2017 01:20 IST

मृत्युमुखी झालेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने मंगळवारी सायंकाळी शहरात कॅँ डल मार्च काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद हल्ल्यात सहा भाविकांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी झालेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने मंगळवारी सायंकाळी शहरात कॅँ डल मार्च काढण्यात आला. अमरनाथ यात्रेदरम्यान दर्शन करून परतणाऱ्या भाविक भक्तांच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. अंदाधुंद गोळीबारात सहा भाविकांचा मृत्यू झाला. तर गोळीबारामुळे अनेक भाविक जखमी झाले. अमरनाथला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर हल्ला चढविणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करावा, अशा भावना सर्व स्तरातून उमटत आहेत. युवक काँग्रेसच्यावतीने मंगळवारी सायंकाळी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या भाविकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महाराणा प्रताप बाग ते राजराजेश्वर मंदिरापर्यंत कॅँ डल मार्च काढण्यात आला. यावेळी काँगे्रसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, माजी महापौर मदन भरगड, युवक काँग्रेसचे पदाधिकारी महेश गणगणे, माजी नगरसेविका तथा महिला काँग्रेस कमिटीच्या महानगराध्यक्ष सुषमा निचळ, राजेश मते पाटील, नगरसेवक पराग कांबळे, मनीष हिवराळे, राजेश पाटील, कपिल रावदेव, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष आकाश कवडे, गणेश कटारे आदींसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची सुरक्षा व्यवस्था करण्यात मोदी सरकार कुचकामी ठरल्याचा निषेध यावेळी नोंदविण्यात आला. रामनवमी शोभायात्रा समितीतर्फे श्रद्धांजलीहिंदी भाषिकांच्या पहिल्याच श्रावण सोमवारी अमरनाथ यात्रेकरूंवर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सहा जण मृत्युमुखी पडले असून, बसमधील हल्ल्यात अनेकांना जखमी करून दहशत निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांचा तातडीने खात्मा करावा, अशी संतप्त भावना आ. शर्मा यांनी व्यक्त करीत मृतकांना ताातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी रामनवमी शोभायात्रा समितीतर्फे करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्यांना आ. गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कैलाश मामा अग्रवाल, डॉ. संजय सोनवणे, अशोक गुप्ता, ब्रिजमोहन चितलांगे, गिरीश जोशी, गिरीराज तिवारी, संदीप वाणी, अनिल थानवी, बाळकृष्ण बिडवाई, अनिल गावीत, नितीन जोशी, राम ठाकूर, रोहित खोवाल, शंकर खोवाल, सागर भारुका, भावना भिरड, पुष्प वानखेडे, संजय जिरापुरे, रेखा नालट, वंदना राऊत, वसुधा बिडवाई, सोनाल ठाकूर, सुनीता अग्रवाल, सागर शेगोकार, अजय शर्मा आदी उपस्थित होते.