शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

यंदा तिळाचा गोडवा कमी होणार!

By admin | Updated: December 26, 2014 01:23 IST

लागवडीचे क्षेत्र घटल्याचा परिणाम.

अकोला : मकर संक्रांतीचा सण जवळ आला आहे. या सणाला तीळ व गुळाच्या लाडूचे व इतर पदार्थांचे अधिक महत्त्व असते. तथापि, बाजारपेठेत तिळाची आवकच कमी असल्याने संक्रांतीपूर्वीच भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे यंदा संक्रांतीला तिळाचा गोडवा कमी होणार असल्याचे संकेत आहेत.विदर्भात तेलबिया लागवडीच्या क्षेत्रात सातत्याने घट झाली आहे. कापूस आणि ज्वारीच्या पिकास आंतरपीक म्हणून तिळाचे उत्पादन घेणारा शेतकरी आता सोयाबीनच्या पेर्‍याकडे वळला आहे. तेलबीयांना सातत्याने मिळत असलेल्या कमी भावामुळे यंदा विदर्भातील तीळ लागवडीचे क्षेत्र केवळ ९४00 हेक्टरवर येऊन थांबले. हेक्टरी उत्पादनही ३.७७ क्विंटलपर्यंत खाली घसरल्याने बाजारपेठेत तिळाची आवक यंदा कमी आहे. परिणामी मकर संक्रांतीला अद्याप तीन आठवडे अवकाश असताना कृषिउत्पन्न बाजार समितीत तीळ प्रतिक्विंटल १२३00 रुपये आणि किरकोळ दर १२0 ते १५0 रुपये प्रतिकिलोपर्यंत येऊन पोहोचला आहे. मकरसंक्रांतीपर्यंत या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे मत धान्य व्यापारी दिनेश राठी यांनी व्यक्त केले. संपूर्ण राज्यातच तिळाचे उत्पादन कमी असल्याने अकोल्यातील व्यापारी आंध्र आणि कर्नाटकमधून तीळ मागवित असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.काळा आणि पांढरा अशा दोन सहज ओळखल्या जाणार्‍या तिळाच्या जाती असून, खरीप आणि रब्बी अशी दोन पिके तिळाची घेतली जातात. ऑलिव्ह ऑइलप्रमाणे गुणधर्म असल्याने तीळाचा उपयोग आरोग्य संवर्धनासाठीदेखील केला जातो. मुख्यत्वेकरून पांढर्‍या तिळाचा उपयोग मिठाई निर्मितीसाठी केला जातो, तर साबण, अत्तर व इतर गोष्टींसाठी काळय़ा तिळाचे तेल वापरले जाते. यंदा अत्यल्प झालेल्या पावसामुळे बहुतांश विदर्भातील शेतकर्‍यांनी तिळाची लागावडच केली नाही. अनेक कास्तकारांना फटका बसला आहे. परिणास्वरूप डिसेंबर, जानेवारीमध्ये बाजार समित्यांमध्ये दाखल होणार्‍या तिळाची आवक घटली असल्याची माहिती ज्येष्ठ तेलबिया संशोधक डॉ. एस. एन. देशमुख यांनी दिली.