शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

बेताल वक्तव्याचा हिशेब चुकता करण्याची संधी भाजप घेईल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:21 IST

वृत्त विश्लेषण राजेश शेगाेकार अकाेला : नारायण राणे यांच्या अटकेच्या निमित्ताने रंगलेल्या राजकीय नाट्यात मंगळवारी अकाेल्यात झालेल्या आंदाेलनात ...

वृत्त विश्लेषण

राजेश शेगाेकार

अकाेला : नारायण राणे यांच्या अटकेच्या निमित्ताने रंगलेल्या राजकीय नाट्यात मंगळवारी अकाेल्यात झालेल्या आंदाेलनात शिवसेनेेचे आमदार व जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी नारायण राणे यांच्यावर चांगलेच ताेंडसुख घेतले. दरम्यान, यासंदर्भात भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारणा केली असता कायदेशीर बाजू तपासून भूमिका घेण्याची जबाबदारी त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्यावर देत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे बेताल वक्तव्याचा हिशेब चुकता करण्याची संधी भाजप घेईल का? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या बेताल वक्तव्याबाबत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकारामुळे राज्यभरात चांगलेच राजकारण तापले असून, शिवसेना व भाजप हे दाेन्ही पक्ष रस्त्यावर आले आहेत. शिवसेनेेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख हे आमदार झाल्यापासून अधिक आक्रमक झाले असून, त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात संख्येने मजबूत असलेल्या भाजपाला थेट शिंगावर घेण्याची भूमिका घेतली आहे. जिल्हा नियाेजन समितीमधील निधीची फिरवाफिरव असाे की महानगरपालिकेतील भाजपाचा कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी आपल्या शिलेदारांना दिलेले पाठबळ असाे. आ. देशमुखांनी भाजपाला काेंडीत पकडण्याची एकही संधी साेडलेली नाही. त्यांच्या हा आक्रमकपणा मंगळवारी सेनेने काढलेल्या माेर्चातही चांगलाच समाेर आला. त्यांनी नारायण राणे यांच्यावर शेलक्या भाषेत ताेंडसुख घेतले. राणे यांच्या उंचीपासून तर थेट त्यांना प्राण्याची उपमा देण्यापर्यंत ते आक्रमक हाेते. आंदाेलनात त्यांनी काढलेले अनुद्गार आता चांगलेच व्हायरल झाले आहे. एकीकडे राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विराेधात केलेल्या वक्तव्यावरून थेट अटक करून कायदेशीर मार्ग स्वीकारल्याचे शिवसेनेने प्रथम दर्शनी दाखवून दिले आहे, त्यामुळे आता इतर पक्षांसाठी हाच मार्ग खुला झाला आहे. बुधवारी भाजपाचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबतच छेडले असता त्यांनी सदर विधाने तपासून रीतसरपणे कायदेशीर सल्ला घेण्यात आल्यावर कारवाई केली जाईल, त्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर पुढाकार घेतील, असे स्पष्ट केल्याने जिल्हाध्यक्ष म्हणून आ. रणधीर सावरकर यांची जबाबदारी वाढली आहे. आ. सावरकर हे सध्या अकाेल्यातील भाजपाचा आक्रमक चेहरा आहेत. जिल्हाध्यक्ष म्हणून संपूर्ण जिल्ह्यात पक्षबांधणी करताना ते सामान्य कार्यकर्त्यांसाठी काेणत्याही सरकारी अधिकाऱ्यासाेबत थेट भिडतात. त्यामुळे त्यांचा आक्रमकपणा सेनेच्या बाबतीत कितपत प्रखर हाेताे, यावर पुढचे राजकारण रंगणार आहे. राजकारणात टीका करताना अनेकांचा ताेल सुटल्याची उदाहरणे आहेत. मात्र, अशा वक्तव्याबाबत थेट अटकेची कारवाई करण्याची सुरुवात सेनेने केली असल्याचे विधान भाजपाच्या सर्वच नेत्यांकडून प्रसारित हाेत आहे. त्यामुळे सेनेच्या कारवाईचा हिशेब अकाेल्यात चुकता करण्याची संधी भाजपा घेईल का? हा प्रश्न या निमित्ताने समाेर आला आहे.

युतीची शक्यता धूसरच

गेल्या विधानसभा निवडणुकी भाजप शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवत अकाेल्यात शतप्रतिशत यश मिळविले. पाचपैकी चार मतदारसंघ भाजपाने तर एक शिवसेनेने जिंकला. युतीची एकत्रित मते विभाजित न झाल्याचा फायदा भाजप, सेना या दाेन्ही पक्षांना झाला. मात्र, महाविकास आघाडीच्या निमित्ताने या दाेन पक्षांतील मतभेद वाढतच गेले असले तरी सामान्य कार्यकर्त्यांना युती हाेईल, असे वाटत हाेते. राणे प्रकरणानंतर आता सेना-भाजपातील दरी आणखी रुंदावली असून, या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याची संधी दाेन्ही पक्ष साेडणार नाहीत. त्यामुळे युतीची शक्यता आता धूसरच असल्याची चर्चा आहे.