शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

बेताल वक्तव्याचा हिशेब चुकता करण्याची संधी भाजप घेईल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:21 IST

वृत्त विश्लेषण राजेश शेगाेकार अकाेला : नारायण राणे यांच्या अटकेच्या निमित्ताने रंगलेल्या राजकीय नाट्यात मंगळवारी अकाेल्यात झालेल्या आंदाेलनात ...

वृत्त विश्लेषण

राजेश शेगाेकार

अकाेला : नारायण राणे यांच्या अटकेच्या निमित्ताने रंगलेल्या राजकीय नाट्यात मंगळवारी अकाेल्यात झालेल्या आंदाेलनात शिवसेनेेचे आमदार व जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी नारायण राणे यांच्यावर चांगलेच ताेंडसुख घेतले. दरम्यान, यासंदर्भात भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारणा केली असता कायदेशीर बाजू तपासून भूमिका घेण्याची जबाबदारी त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्यावर देत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे बेताल वक्तव्याचा हिशेब चुकता करण्याची संधी भाजप घेईल का? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या बेताल वक्तव्याबाबत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकारामुळे राज्यभरात चांगलेच राजकारण तापले असून, शिवसेना व भाजप हे दाेन्ही पक्ष रस्त्यावर आले आहेत. शिवसेनेेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख हे आमदार झाल्यापासून अधिक आक्रमक झाले असून, त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात संख्येने मजबूत असलेल्या भाजपाला थेट शिंगावर घेण्याची भूमिका घेतली आहे. जिल्हा नियाेजन समितीमधील निधीची फिरवाफिरव असाे की महानगरपालिकेतील भाजपाचा कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी आपल्या शिलेदारांना दिलेले पाठबळ असाे. आ. देशमुखांनी भाजपाला काेंडीत पकडण्याची एकही संधी साेडलेली नाही. त्यांच्या हा आक्रमकपणा मंगळवारी सेनेने काढलेल्या माेर्चातही चांगलाच समाेर आला. त्यांनी नारायण राणे यांच्यावर शेलक्या भाषेत ताेंडसुख घेतले. राणे यांच्या उंचीपासून तर थेट त्यांना प्राण्याची उपमा देण्यापर्यंत ते आक्रमक हाेते. आंदाेलनात त्यांनी काढलेले अनुद्गार आता चांगलेच व्हायरल झाले आहे. एकीकडे राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विराेधात केलेल्या वक्तव्यावरून थेट अटक करून कायदेशीर मार्ग स्वीकारल्याचे शिवसेनेने प्रथम दर्शनी दाखवून दिले आहे, त्यामुळे आता इतर पक्षांसाठी हाच मार्ग खुला झाला आहे. बुधवारी भाजपाचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबतच छेडले असता त्यांनी सदर विधाने तपासून रीतसरपणे कायदेशीर सल्ला घेण्यात आल्यावर कारवाई केली जाईल, त्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर पुढाकार घेतील, असे स्पष्ट केल्याने जिल्हाध्यक्ष म्हणून आ. रणधीर सावरकर यांची जबाबदारी वाढली आहे. आ. सावरकर हे सध्या अकाेल्यातील भाजपाचा आक्रमक चेहरा आहेत. जिल्हाध्यक्ष म्हणून संपूर्ण जिल्ह्यात पक्षबांधणी करताना ते सामान्य कार्यकर्त्यांसाठी काेणत्याही सरकारी अधिकाऱ्यासाेबत थेट भिडतात. त्यामुळे त्यांचा आक्रमकपणा सेनेच्या बाबतीत कितपत प्रखर हाेताे, यावर पुढचे राजकारण रंगणार आहे. राजकारणात टीका करताना अनेकांचा ताेल सुटल्याची उदाहरणे आहेत. मात्र, अशा वक्तव्याबाबत थेट अटकेची कारवाई करण्याची सुरुवात सेनेने केली असल्याचे विधान भाजपाच्या सर्वच नेत्यांकडून प्रसारित हाेत आहे. त्यामुळे सेनेच्या कारवाईचा हिशेब अकाेल्यात चुकता करण्याची संधी भाजपा घेईल का? हा प्रश्न या निमित्ताने समाेर आला आहे.

युतीची शक्यता धूसरच

गेल्या विधानसभा निवडणुकी भाजप शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवत अकाेल्यात शतप्रतिशत यश मिळविले. पाचपैकी चार मतदारसंघ भाजपाने तर एक शिवसेनेने जिंकला. युतीची एकत्रित मते विभाजित न झाल्याचा फायदा भाजप, सेना या दाेन्ही पक्षांना झाला. मात्र, महाविकास आघाडीच्या निमित्ताने या दाेन पक्षांतील मतभेद वाढतच गेले असले तरी सामान्य कार्यकर्त्यांना युती हाेईल, असे वाटत हाेते. राणे प्रकरणानंतर आता सेना-भाजपातील दरी आणखी रुंदावली असून, या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याची संधी दाेन्ही पक्ष साेडणार नाहीत. त्यामुळे युतीची शक्यता आता धूसरच असल्याची चर्चा आहे.