शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

राज्यात वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो कागदावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST

राजेश शेगाेकार अकाेला : वन्यजिवांच्या शिकारी, अवैध व्यापार व अपराधांची वाढती संख्या, आंतरराष्ट्रीय शिकाऱ्यांच्या सक्रिय टोळ्या व होणारे व्यापार ...

राजेश शेगाेकार

अकाेला : वन्यजिवांच्या शिकारी, अवैध व्यापार व अपराधांची वाढती संख्या, आंतरराष्ट्रीय शिकाऱ्यांच्या सक्रिय टोळ्या व होणारे व्यापार पाहता, यावर राज्य पातळीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यांनी पूर्णवेळी समर्पित असे वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो स्थापन करावे, असे निर्देश केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने १४ नाेव्हेंबर २०१४ मध्ये सर्व राज्यांना दिले हाेते. मिझाेराम वगळता एकाही राज्याने अशा प्रकारे ब्युराेची स्थापना केलेली नाही. त्यामुळे राज्यभरात वन्यजिवांची तस्करी फाेफावली आहे. भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत भारतातील सगळ्या वन्यजिवांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. मात्र ,वन्यजिवांच्या शिकारी, अवैध व्यापार व अपराधांची वाढती संख्या, आंतरराष्ट्रीय शिकाऱ्यांच्या सक्रिय टोळ्या व होणारे व्यापार पाहता, यावर राज्य पातळीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे ही काळाची गरज आहे. सद्य:स्थितीत कार्यान्वित प्रशासकीय यंत्रणेमध्ये कमतरता असल्याने, वन्यजीव अपराध नियंत्रण प्रभावीपणे करणे शक्य नाही. त्यामुळे राज्य वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युराेची आवश्यकता अधारेखीत हाेत आहे.

बाॅक्स....

सद्य:स्थितीत काय आहे व्यवस्था

सध्या वाढते वन्यजीव अपराध नियंत्रित करण्यासाठी वन विभागाकडे वन व पोलीस यंत्रणा एकत्रित काम करणारी एकसंघ व्यवस्था नाही. तसेच वन व पोलीस विभाग या वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणा असल्याने एकत्रित कामकाज करायला बऱ्याच मर्यादा आहेत. त्यामुळे संसाधनांनी सुसज्ज व परिपूर्ण असलेली स्वतंत्र यंत्रणा स्थापन करणे अनिवार्य आहे.

बाॅक्स....

केंद्रीय वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोच्या मर्यादा

केंद्रीय वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय मुंबई येथे असून, या कार्यालयांतर्गत महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्य आणि दिव व दमन हा केंद्रशासित प्रदेश मिळून ३ राज्य व १ केंद्रशासित प्रदेश येतो. यासाठी केवळ १ प्रादेशिक संचालक, २ पोलीस निरीक्षक व ३ शिपाई आहेत. तीन राज्ये व एक केंद्रशासित प्रदेश इतके मोठे कार्यक्षेत्र पाहता, केवळ पाच मनुष्यबळावर कामकाजाची धुरा आहे. या व्यतिरिक्त इतरही कामे त्यांच्याकडे असल्याने वन्यजीव अपराध नियंत्रण करण्यास मर्यादा येतात.

बाॅक्स

राज्यात माेठ्या प्रमाणात हाेतात शिकारी

महाराष्ट्र हे नैसर्गिकदृष्ट्या जैवसंपन्न राज्य आहे. राज्यातील ६ व्याघ्र प्रकल्प, ६ राष्ट्रीय उद्याने व तब्बल ५० हून अधिक अभयारण्ये व संवर्धन राखीव क्षेत्रात, तसेच प्रादेशिक वन विभागांतर्गत राखीव जंगल असलेल्या वनात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळते. मात्र आजही वाघ, बिबटे व इतर वन्यजिवांच्या शिकारी व अवैध व्यापाराचा धोका आहे. वाघ, बिबटे, अस्वल, खवले मांजर, घोरपड, हरीण वर्गीय प्राणी जसे काळवीट, चितळ यांच्यासह राष्ट्रीय पक्षी मोर, राज्य पक्षी हरोळी, तितर, बटेर व स्थालांतरित पक्षी, आदींची शिकार मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते

काेट...

वाघ व इतर वन्यजिवांच्या शिकार व व्यापार विरोधी मोहिमेत वन विभागाबरोबर बऱ्याच कारवाया केल्या आहेत. हा अनुभव व प्रत्यक्ष गरज लक्षात घेता स्वतंत्र 'राज्य वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो' निर्माण करण्याची तातडीने आवश्यकता आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. वाघ व वन्यजिवांच्या बाबतीत संवेदनशील असलेले हे सरकार नक्कीच याचा सकारात्मक विचार करील हा विश्वास आहे.

- यादव तरटे पाटील

सदस्य - राज्य वन्यजीव मंडळ