शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो कागदावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST

राजेश शेगाेकार अकाेला : वन्यजिवांच्या शिकारी, अवैध व्यापार व अपराधांची वाढती संख्या, आंतरराष्ट्रीय शिकाऱ्यांच्या सक्रिय टोळ्या व होणारे व्यापार ...

राजेश शेगाेकार

अकाेला : वन्यजिवांच्या शिकारी, अवैध व्यापार व अपराधांची वाढती संख्या, आंतरराष्ट्रीय शिकाऱ्यांच्या सक्रिय टोळ्या व होणारे व्यापार पाहता, यावर राज्य पातळीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यांनी पूर्णवेळी समर्पित असे वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो स्थापन करावे, असे निर्देश केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने १४ नाेव्हेंबर २०१४ मध्ये सर्व राज्यांना दिले हाेते. मिझाेराम वगळता एकाही राज्याने अशा प्रकारे ब्युराेची स्थापना केलेली नाही. त्यामुळे राज्यभरात वन्यजिवांची तस्करी फाेफावली आहे. भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत भारतातील सगळ्या वन्यजिवांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. मात्र ,वन्यजिवांच्या शिकारी, अवैध व्यापार व अपराधांची वाढती संख्या, आंतरराष्ट्रीय शिकाऱ्यांच्या सक्रिय टोळ्या व होणारे व्यापार पाहता, यावर राज्य पातळीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे ही काळाची गरज आहे. सद्य:स्थितीत कार्यान्वित प्रशासकीय यंत्रणेमध्ये कमतरता असल्याने, वन्यजीव अपराध नियंत्रण प्रभावीपणे करणे शक्य नाही. त्यामुळे राज्य वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युराेची आवश्यकता अधारेखीत हाेत आहे.

बाॅक्स....

सद्य:स्थितीत काय आहे व्यवस्था

सध्या वाढते वन्यजीव अपराध नियंत्रित करण्यासाठी वन विभागाकडे वन व पोलीस यंत्रणा एकत्रित काम करणारी एकसंघ व्यवस्था नाही. तसेच वन व पोलीस विभाग या वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणा असल्याने एकत्रित कामकाज करायला बऱ्याच मर्यादा आहेत. त्यामुळे संसाधनांनी सुसज्ज व परिपूर्ण असलेली स्वतंत्र यंत्रणा स्थापन करणे अनिवार्य आहे.

बाॅक्स....

केंद्रीय वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोच्या मर्यादा

केंद्रीय वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे प्रादेशिक कार्यालय मुंबई येथे असून, या कार्यालयांतर्गत महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्य आणि दिव व दमन हा केंद्रशासित प्रदेश मिळून ३ राज्य व १ केंद्रशासित प्रदेश येतो. यासाठी केवळ १ प्रादेशिक संचालक, २ पोलीस निरीक्षक व ३ शिपाई आहेत. तीन राज्ये व एक केंद्रशासित प्रदेश इतके मोठे कार्यक्षेत्र पाहता, केवळ पाच मनुष्यबळावर कामकाजाची धुरा आहे. या व्यतिरिक्त इतरही कामे त्यांच्याकडे असल्याने वन्यजीव अपराध नियंत्रण करण्यास मर्यादा येतात.

बाॅक्स

राज्यात माेठ्या प्रमाणात हाेतात शिकारी

महाराष्ट्र हे नैसर्गिकदृष्ट्या जैवसंपन्न राज्य आहे. राज्यातील ६ व्याघ्र प्रकल्प, ६ राष्ट्रीय उद्याने व तब्बल ५० हून अधिक अभयारण्ये व संवर्धन राखीव क्षेत्रात, तसेच प्रादेशिक वन विभागांतर्गत राखीव जंगल असलेल्या वनात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळते. मात्र आजही वाघ, बिबटे व इतर वन्यजिवांच्या शिकारी व अवैध व्यापाराचा धोका आहे. वाघ, बिबटे, अस्वल, खवले मांजर, घोरपड, हरीण वर्गीय प्राणी जसे काळवीट, चितळ यांच्यासह राष्ट्रीय पक्षी मोर, राज्य पक्षी हरोळी, तितर, बटेर व स्थालांतरित पक्षी, आदींची शिकार मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते

काेट...

वाघ व इतर वन्यजिवांच्या शिकार व व्यापार विरोधी मोहिमेत वन विभागाबरोबर बऱ्याच कारवाया केल्या आहेत. हा अनुभव व प्रत्यक्ष गरज लक्षात घेता स्वतंत्र 'राज्य वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो' निर्माण करण्याची तातडीने आवश्यकता आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. वाघ व वन्यजिवांच्या बाबतीत संवेदनशील असलेले हे सरकार नक्कीच याचा सकारात्मक विचार करील हा विश्वास आहे.

- यादव तरटे पाटील

सदस्य - राज्य वन्यजीव मंडळ