शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

लसीकरणानंतर ॲण्टीबॉडीज तपासणी करायची कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 10:56 IST

Why test antibodies after vaccination : विविध लॅबमध्ये दिवसाला सुमारे १० ते १५ जण अशा प्रकारे तपासणी करीत असल्याची माहिती आहे.

अकोला : यापूर्वी झालेल्या कोरोनाचा संसर्ग किंवा लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर काही नागरिक आपल्या शरीरामध्ये कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिपिंड (अँटीबॉडी) तयार झाले आहेत का, याची तपासणी करीत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. विविध लॅबमध्ये दिवसाला सुमारे १० ते १५ जण अशा प्रकारे तपासणी करीत असल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे त्यांच्या वावरण्यात काहीसा बिनधास्तपणा दिसून येत आहे.

कोरोनातून मुक्त झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात काही प्रमाणात कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यास अँटीबॉडीज तयार होतात. याशिवाय लसीकरणाच्या दोन्ही डोसनंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात, हे एक प्रकारचे कवच आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व नियमांचे पालन करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. यामध्ये ज्या नागरिकांना संसर्ग झालेला नाही, अशा व्यक्तींद्वारा त्यांना कोरोना तर होऊन गेलेला नाही, या शंकेने अँटीबॉडीजची तपासणी केली जात असल्याची माहिती आहे. शहरातील खासगी पॅथॉलॉजीमध्ये मागील काही दिवसांपासून अशा प्रकारच्या तपासणीसाठी नागरिकांचा कल दिसून येत आहे. प्रत्येक नागरिकांनी अशा प्रकारच्या चाचण्यांची काहीच आवश्यकता नसते. लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्यास यामध्ये गंभीर होण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

जिल्ह्यात लसीकरण पहिला डोस - ३,७५,२६३

 

दुसरा डोस - १,२०,४१५

उद्दिष्टाच्या तुलनेत प्रमाण -

 

अँटीबॉडीज तपासणीच्या प्रमाणात वाढ

शहरात अँटीबॉडी तपासणीच्या प्रमाणात वाढ झाली का, यासंदर्भात येथील हेडगेवार पॅथॉलॉजीशी संपर्क साधला असता, काही लोक उत्सुकता म्हणून तर काहींना डॉक्टरांनी सांगितले म्हणून अँटीबाॅडीज तपासणीसाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

तरुणाईसह ज्येष्ठांनाही उत्सुकता

लसीचा दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यांत शरीरातील अँटीबॉडीज वाढतात. त्यामुळे अशा प्रकारच्या तपासण्यांची काहीच आवश्यकता नाही. काही जण तर केवळ उत्सुकतेपोटी या चाचण्या करीत आहेत. यामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही आढळून येत आहेत. लसीकरणानंतर संसर्ग जरी झाला तरी गंभीर होण्याची शक्यता कमी असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बाेलताना सांगितले.

कोरोना होऊन गेला काय किंवा झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडी तयार झाल्यात का यासाठी कोरोनाकाळात सिरोलॉजी सर्वेक्षण करण्यात आले होते. संशोधनाचा भाग म्हणून हे सर्वेक्षण करण्यात आले होते. लस घेतल्यानंतर अशा प्रकारच्या सर्वेक्षणाची गरज नाही. त्यामुळे नागरिकांनी या तपासण्या करण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियमित मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करावे.

- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAkolaअकोला