शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता कोणामुळे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 15:07 IST

Katepurna Barrage Project मान्यतेसाठी आपणच प्रयत्न केले असल्याचे श्रेय लाटण्यासाठी आता रस्सीखेच सुरू आहे.

- संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यातील २००७ रखडलेला काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पास अलिकडेच सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मिळालेल्या मान्यतेसाठी आपणच प्रयत्न केले असल्याचे श्रेय लाटण्यासाठी आता रस्सीखेच सुरू आहे. यामुळे या प्रकल्पाता श्रेय वादाचे ग्रहण लागले आहे. यासाठी सोशल मिडीयावर प्रचंड पत्रकबाजी व जाहीराती सुरु आहे.             तालुक्यातील मंगरुळ कांबे प्रकल्प उभारणीसाठी ३१ अॉगष्ट २००७ प्रस्ताव पाठविण्यात आला होता तो मंजूर होऊन त्यासाठी ९६ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला होता. तेव्हापासून हा प्रकल्प अर्धवट अवस्थेत असून आता पुन्हा २४ मार्च रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीत ५३३ कोटी ८१ लाख रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प पुर्णत्वास गेल्यास १३ गावांमधील ४ हजार २८१ शेत जमिन सिंचनाखाली येणार आहे. केवळ प्रकल्प पुर्णत्वास जाऊन शेतकऱ्यांचे भले व्हावे एवढी अपेक्षा न ठेवता प्रकल्पा सुधारीत प्रशासकीय मान्यता आम्हीच मिळवून दिली याचे श्रेय घेण्यासाठी नेत्यांमध्ये रस्खेच सुरु असल्याचे चित्र आहे.               जलसंपदा मंत्री जयंत पाटील ६ फेब्रुवारी रोजी आले असता या प्रकल्पा बाबत त्यांना काही स्थानिक नेत्यांनी अवगत करुन दिले होते, त्यावेळी प्रकल्प पूर्ण करुन घेण्यासाठी आपण जातीने लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले होते. तेच आश्वासन पाळल्या गेल्याचे स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांचे म्हणणे आहे, तर विदर्भातील अनेक प्रकल्पासाठी आपण शर्तीचे प्रयत्न केले असल्याचे काटेपूर्णा बॅरेज सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी आपण विशेष प्रयत्न केल्यामुळेच सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली असे पालकमंत्री बच्चु कडु म्हणतात. याच बरोबर अमरावती जिल्ह्य़ातील वरूड तालुक्यातील पंढरी प्रकल्प, गर्गा मध्यम प्रकल्प, धारणी तालुक्यातील मान्सूधावडी प्रकल्प यांनाही आपल्याच प्रयत्नाने सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तर मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी या शर्यतीत उडी घेतली असून, यासाठी केलेला पत्र व्यवहार कारणीभूत ठरला असून आपण दिनांक २९ अॉगष्ट २०१९ रोजी नियामक मंडळाचे ७६ बैठकीत प्रशाकिय मान्यता प्रस्ताव मंजूर करुन घेतला व मंत्रीमंडळाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात आला असल्याचा दावा केला आहे. परंतू या सुधारीत प्रशासकीय मान्यतेच्या श्रेय वादाचे प्रकल्पा सुरुवातीलाच ग्रहण लागले असले तरी प्रकल्प पूर्ण करुन घेण्यासाठी खरे श्रेय कोण घेतो हे औत्सुक्याचे ठरेल.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाPoliticsराजकारण