शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता कोणामुळे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 15:07 IST

Katepurna Barrage Project मान्यतेसाठी आपणच प्रयत्न केले असल्याचे श्रेय लाटण्यासाठी आता रस्सीखेच सुरू आहे.

- संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यातील २००७ रखडलेला काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पास अलिकडेच सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मिळालेल्या मान्यतेसाठी आपणच प्रयत्न केले असल्याचे श्रेय लाटण्यासाठी आता रस्सीखेच सुरू आहे. यामुळे या प्रकल्पाता श्रेय वादाचे ग्रहण लागले आहे. यासाठी सोशल मिडीयावर प्रचंड पत्रकबाजी व जाहीराती सुरु आहे.             तालुक्यातील मंगरुळ कांबे प्रकल्प उभारणीसाठी ३१ अॉगष्ट २००७ प्रस्ताव पाठविण्यात आला होता तो मंजूर होऊन त्यासाठी ९६ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला होता. तेव्हापासून हा प्रकल्प अर्धवट अवस्थेत असून आता पुन्हा २४ मार्च रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीत ५३३ कोटी ८१ लाख रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प पुर्णत्वास गेल्यास १३ गावांमधील ४ हजार २८१ शेत जमिन सिंचनाखाली येणार आहे. केवळ प्रकल्प पुर्णत्वास जाऊन शेतकऱ्यांचे भले व्हावे एवढी अपेक्षा न ठेवता प्रकल्पा सुधारीत प्रशासकीय मान्यता आम्हीच मिळवून दिली याचे श्रेय घेण्यासाठी नेत्यांमध्ये रस्खेच सुरु असल्याचे चित्र आहे.               जलसंपदा मंत्री जयंत पाटील ६ फेब्रुवारी रोजी आले असता या प्रकल्पा बाबत त्यांना काही स्थानिक नेत्यांनी अवगत करुन दिले होते, त्यावेळी प्रकल्प पूर्ण करुन घेण्यासाठी आपण जातीने लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले होते. तेच आश्वासन पाळल्या गेल्याचे स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांचे म्हणणे आहे, तर विदर्भातील अनेक प्रकल्पासाठी आपण शर्तीचे प्रयत्न केले असल्याचे काटेपूर्णा बॅरेज सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी आपण विशेष प्रयत्न केल्यामुळेच सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली असे पालकमंत्री बच्चु कडु म्हणतात. याच बरोबर अमरावती जिल्ह्य़ातील वरूड तालुक्यातील पंढरी प्रकल्प, गर्गा मध्यम प्रकल्प, धारणी तालुक्यातील मान्सूधावडी प्रकल्प यांनाही आपल्याच प्रयत्नाने सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तर मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी या शर्यतीत उडी घेतली असून, यासाठी केलेला पत्र व्यवहार कारणीभूत ठरला असून आपण दिनांक २९ अॉगष्ट २०१९ रोजी नियामक मंडळाचे ७६ बैठकीत प्रशाकिय मान्यता प्रस्ताव मंजूर करुन घेतला व मंत्रीमंडळाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात आला असल्याचा दावा केला आहे. परंतू या सुधारीत प्रशासकीय मान्यतेच्या श्रेय वादाचे प्रकल्पा सुरुवातीलाच ग्रहण लागले असले तरी प्रकल्प पूर्ण करुन घेण्यासाठी खरे श्रेय कोण घेतो हे औत्सुक्याचे ठरेल.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाPoliticsराजकारण