शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता कोणामुळे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 15:07 IST

Katepurna Barrage Project मान्यतेसाठी आपणच प्रयत्न केले असल्याचे श्रेय लाटण्यासाठी आता रस्सीखेच सुरू आहे.

- संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यातील २००७ रखडलेला काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पास अलिकडेच सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मिळालेल्या मान्यतेसाठी आपणच प्रयत्न केले असल्याचे श्रेय लाटण्यासाठी आता रस्सीखेच सुरू आहे. यामुळे या प्रकल्पाता श्रेय वादाचे ग्रहण लागले आहे. यासाठी सोशल मिडीयावर प्रचंड पत्रकबाजी व जाहीराती सुरु आहे.             तालुक्यातील मंगरुळ कांबे प्रकल्प उभारणीसाठी ३१ अॉगष्ट २००७ प्रस्ताव पाठविण्यात आला होता तो मंजूर होऊन त्यासाठी ९६ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला होता. तेव्हापासून हा प्रकल्प अर्धवट अवस्थेत असून आता पुन्हा २४ मार्च रोजी मंत्रीमंडळाच्या बैठकीत ५३३ कोटी ८१ लाख रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प पुर्णत्वास गेल्यास १३ गावांमधील ४ हजार २८१ शेत जमिन सिंचनाखाली येणार आहे. केवळ प्रकल्प पुर्णत्वास जाऊन शेतकऱ्यांचे भले व्हावे एवढी अपेक्षा न ठेवता प्रकल्पा सुधारीत प्रशासकीय मान्यता आम्हीच मिळवून दिली याचे श्रेय घेण्यासाठी नेत्यांमध्ये रस्खेच सुरु असल्याचे चित्र आहे.               जलसंपदा मंत्री जयंत पाटील ६ फेब्रुवारी रोजी आले असता या प्रकल्पा बाबत त्यांना काही स्थानिक नेत्यांनी अवगत करुन दिले होते, त्यावेळी प्रकल्प पूर्ण करुन घेण्यासाठी आपण जातीने लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले होते. तेच आश्वासन पाळल्या गेल्याचे स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांचे म्हणणे आहे, तर विदर्भातील अनेक प्रकल्पासाठी आपण शर्तीचे प्रयत्न केले असल्याचे काटेपूर्णा बॅरेज सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी आपण विशेष प्रयत्न केल्यामुळेच सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली असे पालकमंत्री बच्चु कडु म्हणतात. याच बरोबर अमरावती जिल्ह्य़ातील वरूड तालुक्यातील पंढरी प्रकल्प, गर्गा मध्यम प्रकल्प, धारणी तालुक्यातील मान्सूधावडी प्रकल्प यांनाही आपल्याच प्रयत्नाने सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तर मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी या शर्यतीत उडी घेतली असून, यासाठी केलेला पत्र व्यवहार कारणीभूत ठरला असून आपण दिनांक २९ अॉगष्ट २०१९ रोजी नियामक मंडळाचे ७६ बैठकीत प्रशाकिय मान्यता प्रस्ताव मंजूर करुन घेतला व मंत्रीमंडळाच्या मान्यतेस्तव सादर करण्यात आला असल्याचा दावा केला आहे. परंतू या सुधारीत प्रशासकीय मान्यतेच्या श्रेय वादाचे प्रकल्पा सुरुवातीलाच ग्रहण लागले असले तरी प्रकल्प पूर्ण करुन घेण्यासाठी खरे श्रेय कोण घेतो हे औत्सुक्याचे ठरेल.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाPoliticsराजकारण