शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

अकोट-नांदेडदरम्यान रेल्वे सेवाला ग्रीन सिग्नल केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

उत्तर भारताला दक्षिणेशी जोडणारा सर्वात जवळचा रेल्वेमार्ग असलेल्या खंडवा-अकोला-नांदेड रेल्वेमार्गावर अकोला ते खंडवामार्गे महूपर्यंत मीटरगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम ...

उत्तर भारताला दक्षिणेशी जोडणारा सर्वात जवळचा रेल्वेमार्ग असलेल्या खंडवा-अकोला-नांदेड रेल्वेमार्गावर अकोला ते खंडवामार्गे महूपर्यंत मीटरगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. या मीटरगेज रूपांतरणाच्या कामात अकोला ते अकोटदरम्यान रूपांतरणाचे काम पूर्ण झाले असून, २०१९ मध्ये रेल्वेमार्गाची पाहणी केल्यानंतर रेल्वे विभागाने १९ मे २०१९ रोजी वेगात इंजिन चालवून ट्रॅकच्या सुरक्षिततेची तपासणी केली होती. ज्यामध्ये रेल्वेमार्ग वाहतुकीस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र रेल्वे सुरक्षा विभागाकडूनही देण्यात आले होते. सुरक्षा विभागाने वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर नियमांनुसार पहिल्या टप्प्यात अकोट ते अकोलादरम्यान मालगाड्या धावू लागल्या. गेल्या अनेक महिन्यांपासून अकोला ते अकोटदरम्यान अनेक मालगाड्यांची ये-जा झाली. मात्र दोन वर्षांपासून केवळ मालवाहू गाड्यांची वाहतूक सुरू असून, दक्षिण मध्य रेल्वेने आजवर प्रवासी गाड्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे अकोला ते अकोटमार्गे तुकईथळ, अमला खुर्द अशा १४ रेल्वेस्थानकांवर एकंदरीत प्रवास करणाऱ्या सुमारे दहा लाख रेल्वे प्रवासी गेल्या चार वर्षांपासून प्रवासी गाड्यांपासून वंचित राहिले आहेत. अकोला-खंडवा मीटरगेज ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यासाठी १ जानेवारी २०१७ पासून अकोला ते खंडवादरम्यानची रेल्वे वाहतूक बंद होती.

गेज रूपांतरणाचे काम तीन टप्प्यात

अकोला ते खंडवादरम्यान १७४ किमीचे गेज रूपांतरणाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जात आहे. या मार्गावर खंडवा ते अमला खुर्ददरम्यान ५३ किमी आणि अमला खुर्द ते अकोटदरम्यान ७७ किमी प्रगतिपथावर आहे. पहिल्या टप्प्यात अकोला ते अकोटदरम्यान ४४.७९ किमीचे गेज रूपांतरण झाले होते. रेल्वे सुरक्षा विभागाने दोन वर्षांपूर्वी सुरक्षा तपासणी केली आणि सुरक्षा प्रमाणपत्रही दिले. तेव्हापासून बऱ्याच मालगाड्या चालविण्यात आल्या आहेत. मात्र प्रवासी रेल्वे नसल्याने दहा लाख नागरिक प्रवासापासून वंचित राहिले आहेत.

रेल्वे सुरू करा

अकोला रेल्वेस्थानकात अनेक गाड्या थांबतात. ज्यामध्ये अकोला आणि अकोला-काचीगुडा इंटरसिटीकडे जाणारे प्रवासी अकोटपर्यंत सहज नेता येतात. शिवाय अकोटहुन अकोला-वाशिम-हिंगोली-नांदेडपर्यंत रेल्वे वाहतूक सुरू करण्याची मागणी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, विजय जितकर, रामदास काळे, लकी इंगळे, विजय शिंदे, मुकुंद कोरडे, मंगेश लोणकर, विजय जितकर यांच्यासह अमोल इंगळे, ठाकूर, गोयनका, वाशिम येथील डीआरयूसीसी सदस्य गुलाटी, जुगलकिशोर कोठारी, हिंगोली येथील राकेश भट, शोएब वासेसा, स. रियाज आदींनी यापूर्वीच केली आहे,

केंद्रात मंत्री असूनही रेल्वे सुरू नाही!

अकोट-अकोला दरम्यानचा संपूर्ण रेल्वेमार्ग अकोला लोकसभा मतदारसंघात येतो. संजय धोत्रे सध्या केंद्रात राज्यमंत्री आहेत. या रेल्वेमार्गाकरिता त्यांचे मोठे योगदान आहे. केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या क्षेत्रात अकोट ते अकोलादरम्यान साधी रेल्वे सुरू करणे कठीण काम नाही. तसेच अकोट येथून रेल्वे सुरू करण्यासाठी आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

चौकट...

प्रवासी रेल्वे एक महिन्यामध्ये सुरू करा : विजय जितकर

दोन वर्षांपासून अकोट-अकोला गेज बदलण्यात आले आहे. चार वर्षांपासून अकोट व त्याच्या आसपासच्या परिसरातील अनेक शेकडो गावे गाड्यांपासून वंचित राहिली आहेत, रोजगार व व्यवसाय ठप्प झाला आहे. आता गेज बदलण्यात आले आहे, त्यामुळे एससीआरने अकोलापर्यंत येणाऱ्या रेल्वेगाड्या अकोटपर्यंत कराव्यात तथा अकोट ते नांदेडला जाण्यासाठी नवीन प्रवासी अशी मागणीसाठी सेवानिवृत्त शिक्षक तथा समाजसेवक विजय जितकर यांनी पुढाकार घेतला आहे. रेल्वेगाडी चालविण्यास एससीआरने सुरुवात करावी. एका महिन्यात ही मागणी पूर्ण न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा विजय जितकर यांनी दिला.

चौकट.....

पावसाळ्यात पूर्णा नदीला पूर आल्यामुळे अकोला-अकोट रोड नेहमी बंद पडतो. शिवाय या रोडचे काम संथगतीने सुरू आहे. या रोडवर अपघाताची मालिका सुरू असून, अनेकांचे जीव जात आहेत. अशा जीवघेणा स्थितीत रेल्वेसेवा सुरू होणे अत्यावश्यक आहे.