शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

आखरी ख्वाईश क्या है; तेल्हाऱ्यातील रस्त्यांची दुरुस्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:21 IST

प्रशांत विखे तेल्हारा : सोशल मीडिया हे आपले प्रश्न मांडण्यासाठी प्रभावी साधन झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची स्तुती, ...

प्रशांत विखे

तेल्हारा : सोशल मीडिया हे आपले प्रश्न मांडण्यासाठी प्रभावी साधन झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची स्तुती, तर अनेकांना ट्रोल केले जाते. तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत निवेदन, लेखी तक्रार, आंदोलने केली; मात्र रस्त्याची अवस्था जैसे थे आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी सोशल मीडियावर एल्गार पुकारला असून, तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न पेटला आहे. सोशल मीडियावर अनेक मॅसेज व्हायरल करून नागरिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाला चांगलाच चिमटा काढीत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर अनेकांचा प्रतिसाद मिळत असल्याने तालुक्यात चर्चा रंगली आहे.

दोन वर्षांपूर्वीपेक्षा जास्त काळ लोटूनही अडसूळ-तेल्हारा-हिवरखेड व वरवट-तेल्हारा-वणी वारुळा रस्त्याचे काम अपूर्णच आहे. संबंधित कंत्राटदाराने रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात रस्ते चिखलमय झाल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. रस्त्यावरील अपघातात अनेकांनी जीव गमावला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. असे असतानाही लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग आली नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी लोकप्रतिनिधी, पालकमंत्री व संबंधित अधिकाऱ्याकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही समस्या निकाली लागत नसल्याने नागरिक हतबल झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर अनेकांना चांगलेच धाऱ्यावर धरल्याचे दिसून येत आहे. मॅसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने आतातरी संबंधित यंत्रणेला जाग येईल अशी माफक अपेक्षा नागरिक ठेवून आहेत.

------------------

रस्ता नाही, तर टॅक्स कसा?

शासन प्रत्येक वाहनधारकाकडून रोड टॅक्सचा भरणा करून घेते; मात्र रोडतर नाहीच, पण ज्या रोडमुळे प्रवाशांची जीवितहानी व वित्तहानी होत असेल, तर टॅक्स कोणी कोणाला द्यावा, असा प्रश्न वाहनधारकांमधून उपस्थित केला जात आहे.

---------------------------------

रस्ते चिखलमय, अपघाताच्या घटना वाढल्या

पावसाळ्याच्या दिवसांत तेल्हाऱ्याला जोडणारे रस्ते चिखलमय झाल्याने वाहने घसरून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. चिखलात वाहने अडकून पडत असल्याने वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत.