शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

आखरी ख्वाईश क्या है; तेल्हाऱ्यातील रस्त्यांची दुरुस्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:21 IST

प्रशांत विखे तेल्हारा : सोशल मीडिया हे आपले प्रश्न मांडण्यासाठी प्रभावी साधन झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची स्तुती, ...

प्रशांत विखे

तेल्हारा : सोशल मीडिया हे आपले प्रश्न मांडण्यासाठी प्रभावी साधन झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची स्तुती, तर अनेकांना ट्रोल केले जाते. तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत निवेदन, लेखी तक्रार, आंदोलने केली; मात्र रस्त्याची अवस्था जैसे थे आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी सोशल मीडियावर एल्गार पुकारला असून, तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न पेटला आहे. सोशल मीडियावर अनेक मॅसेज व्हायरल करून नागरिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाला चांगलाच चिमटा काढीत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर अनेकांचा प्रतिसाद मिळत असल्याने तालुक्यात चर्चा रंगली आहे.

दोन वर्षांपूर्वीपेक्षा जास्त काळ लोटूनही अडसूळ-तेल्हारा-हिवरखेड व वरवट-तेल्हारा-वणी वारुळा रस्त्याचे काम अपूर्णच आहे. संबंधित कंत्राटदाराने रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात रस्ते चिखलमय झाल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. रस्त्यावरील अपघातात अनेकांनी जीव गमावला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. असे असतानाही लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग आली नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी लोकप्रतिनिधी, पालकमंत्री व संबंधित अधिकाऱ्याकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही समस्या निकाली लागत नसल्याने नागरिक हतबल झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर अनेकांना चांगलेच धाऱ्यावर धरल्याचे दिसून येत आहे. मॅसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने आतातरी संबंधित यंत्रणेला जाग येईल अशी माफक अपेक्षा नागरिक ठेवून आहेत.

------------------

रस्ता नाही, तर टॅक्स कसा?

शासन प्रत्येक वाहनधारकाकडून रोड टॅक्सचा भरणा करून घेते; मात्र रोडतर नाहीच, पण ज्या रोडमुळे प्रवाशांची जीवितहानी व वित्तहानी होत असेल, तर टॅक्स कोणी कोणाला द्यावा, असा प्रश्न वाहनधारकांमधून उपस्थित केला जात आहे.

---------------------------------

रस्ते चिखलमय, अपघाताच्या घटना वाढल्या

पावसाळ्याच्या दिवसांत तेल्हाऱ्याला जोडणारे रस्ते चिखलमय झाल्याने वाहने घसरून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. चिखलात वाहने अडकून पडत असल्याने वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत.