शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आखरी ख्वाईश क्या है; तेल्हाऱ्यातील रस्त्यांची दुरुस्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:21 IST

प्रशांत विखे तेल्हारा : सोशल मीडिया हे आपले प्रश्न मांडण्यासाठी प्रभावी साधन झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची स्तुती, ...

प्रशांत विखे

तेल्हारा : सोशल मीडिया हे आपले प्रश्न मांडण्यासाठी प्रभावी साधन झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांची स्तुती, तर अनेकांना ट्रोल केले जाते. तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत निवेदन, लेखी तक्रार, आंदोलने केली; मात्र रस्त्याची अवस्था जैसे थे आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी सोशल मीडियावर एल्गार पुकारला असून, तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न पेटला आहे. सोशल मीडियावर अनेक मॅसेज व्हायरल करून नागरिक लोकप्रतिनिधी, प्रशासनाला चांगलाच चिमटा काढीत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर अनेकांचा प्रतिसाद मिळत असल्याने तालुक्यात चर्चा रंगली आहे.

दोन वर्षांपूर्वीपेक्षा जास्त काळ लोटूनही अडसूळ-तेल्हारा-हिवरखेड व वरवट-तेल्हारा-वणी वारुळा रस्त्याचे काम अपूर्णच आहे. संबंधित कंत्राटदाराने रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात रस्ते चिखलमय झाल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. रस्त्यावरील अपघातात अनेकांनी जीव गमावला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. असे असतानाही लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग आली नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी लोकप्रतिनिधी, पालकमंत्री व संबंधित अधिकाऱ्याकडे दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही समस्या निकाली लागत नसल्याने नागरिक हतबल झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर अनेकांना चांगलेच धाऱ्यावर धरल्याचे दिसून येत आहे. मॅसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने आतातरी संबंधित यंत्रणेला जाग येईल अशी माफक अपेक्षा नागरिक ठेवून आहेत.

------------------

रस्ता नाही, तर टॅक्स कसा?

शासन प्रत्येक वाहनधारकाकडून रोड टॅक्सचा भरणा करून घेते; मात्र रोडतर नाहीच, पण ज्या रोडमुळे प्रवाशांची जीवितहानी व वित्तहानी होत असेल, तर टॅक्स कोणी कोणाला द्यावा, असा प्रश्न वाहनधारकांमधून उपस्थित केला जात आहे.

---------------------------------

रस्ते चिखलमय, अपघाताच्या घटना वाढल्या

पावसाळ्याच्या दिवसांत तेल्हाऱ्याला जोडणारे रस्ते चिखलमय झाल्याने वाहने घसरून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. चिखलात वाहने अडकून पडत असल्याने वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत.