शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने काय केले?

By admin | Updated: October 9, 2015 01:45 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ‘दिलासा’ बैठकीत किशोर तिवारी यांचा सवाल.

अकोला : शेतकर्‍यांमधील नैरश्य कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगत, शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने काय केले, असा सवाल शासनाच्या क.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी येथे उपस्थित केला. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरिता जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ह्यदिलासाह्ण कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, अकोला पंचायत समिती सभापती गंगू धामोळे, आरोग्य उपसंचालक लव्हाळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे, तेल्हारा पंचायत समिती सभापती लिला गावंडे उपस्थित होत्या. शेतकरी आत्महत्या होत असताना, शेतकरी आत्महत्याग्रस्त कोणत्या कुटुंबांच्या घरी कृषी विद्यापीठांचे अधिकारी गेले, असा प्रश्न उपस्थित करित शेतकरी आत्महत्यांशी त्यांचा नसल्याचे जाणवते. शेतकर्‍यांमधील नैराश्येला अनेक कारणे असली तरी, नैराश्यग्रस्त शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असतील तर, त्याला राज्यातील कृषी विद्यापीठे आणि कृषी विभाग जबाबदार असल्याचा इशाराही तिवारी यांनी यावेळी दिला. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात देण्यात येणारा धान्याचा लाभ, राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत लाभार्थ्यांंना दिला जाणारा लाभ यासंदर्भात तिवारी आढावा घेतला. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याकरिता जिल्हा प्रशासनमार्फत राबविण्यात येत असलेल्या ह्यदिलासा ह्ण कार्यक्रमाची माहिती जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी यावेळी दिली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांसह तालुका कृषी अधिकरी व विविध विभागाचे जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.