शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने काय केले?

By admin | Updated: October 9, 2015 01:45 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ‘दिलासा’ बैठकीत किशोर तिवारी यांचा सवाल.

अकोला : शेतकर्‍यांमधील नैरश्य कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगत, शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने काय केले, असा सवाल शासनाच्या क.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी येथे उपस्थित केला. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरिता जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ह्यदिलासाह्ण कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, अकोला पंचायत समिती सभापती गंगू धामोळे, आरोग्य उपसंचालक लव्हाळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे, तेल्हारा पंचायत समिती सभापती लिला गावंडे उपस्थित होत्या. शेतकरी आत्महत्या होत असताना, शेतकरी आत्महत्याग्रस्त कोणत्या कुटुंबांच्या घरी कृषी विद्यापीठांचे अधिकारी गेले, असा प्रश्न उपस्थित करित शेतकरी आत्महत्यांशी त्यांचा नसल्याचे जाणवते. शेतकर्‍यांमधील नैराश्येला अनेक कारणे असली तरी, नैराश्यग्रस्त शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असतील तर, त्याला राज्यातील कृषी विद्यापीठे आणि कृषी विभाग जबाबदार असल्याचा इशाराही तिवारी यांनी यावेळी दिला. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात देण्यात येणारा धान्याचा लाभ, राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत लाभार्थ्यांंना दिला जाणारा लाभ यासंदर्भात तिवारी आढावा घेतला. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याकरिता जिल्हा प्रशासनमार्फत राबविण्यात येत असलेल्या ह्यदिलासा ह्ण कार्यक्रमाची माहिती जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी यावेळी दिली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांसह तालुका कृषी अधिकरी व विविध विभागाचे जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.