शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने काय केले?

By admin | Updated: October 9, 2015 01:45 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ‘दिलासा’ बैठकीत किशोर तिवारी यांचा सवाल.

अकोला : शेतकर्‍यांमधील नैरश्य कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगत, शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने काय केले, असा सवाल शासनाच्या क.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी येथे उपस्थित केला. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरिता जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ह्यदिलासाह्ण कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, अकोला पंचायत समिती सभापती गंगू धामोळे, आरोग्य उपसंचालक लव्हाळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे, तेल्हारा पंचायत समिती सभापती लिला गावंडे उपस्थित होत्या. शेतकरी आत्महत्या होत असताना, शेतकरी आत्महत्याग्रस्त कोणत्या कुटुंबांच्या घरी कृषी विद्यापीठांचे अधिकारी गेले, असा प्रश्न उपस्थित करित शेतकरी आत्महत्यांशी त्यांचा नसल्याचे जाणवते. शेतकर्‍यांमधील नैराश्येला अनेक कारणे असली तरी, नैराश्यग्रस्त शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असतील तर, त्याला राज्यातील कृषी विद्यापीठे आणि कृषी विभाग जबाबदार असल्याचा इशाराही तिवारी यांनी यावेळी दिला. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात देण्यात येणारा धान्याचा लाभ, राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत लाभार्थ्यांंना दिला जाणारा लाभ यासंदर्भात तिवारी आढावा घेतला. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याकरिता जिल्हा प्रशासनमार्फत राबविण्यात येत असलेल्या ह्यदिलासा ह्ण कार्यक्रमाची माहिती जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी यावेळी दिली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांसह तालुका कृषी अधिकरी व विविध विभागाचे जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.