शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

पश्‍चिम विदर्भाच्या नंदनवनाला भाविकांची पसंती!

By admin | Updated: August 3, 2016 00:19 IST

आनंद सागर येथे साडेतीन कोटी पर्यटकांनी घेतला आनंद.

गजानन कलोरे / शेगाव (जि. बुलडाणा)येथील आनंद सागरची ख्याती पश्‍चिम वर्‍हाडासोबतच सर्वदूर पोहोचली आहे. भक्ती, मनशांती आणि पर्यटनाचा आनंद मिळत असल्याने या ठिकाणी येणार्‍यांच्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे. स्वत:शीच स्पर्धा करीत आनंद सागर आपल्या गर्दीचा उच्चांक मोडीत काढत आहे. विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या दर्शनासोबतच भाविकांना आनंद सागरची सहल होते.श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने ८ एप्रिल १९९९ साली आनंद सागरची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. सुरुवातीला १२0 एकराच्या पहिल्या भागातील कामास सुरुवात करण्यात आली, तसेच आनंद सागरच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रासह, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यातील प्रेक्षणीय स्थळांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर आकर्षक देखावे, तसेच समाजासाठी झटलेल्या, जगाचा उद्धार करणार्‍या १८ संतांच्या मूर्तीही येथे विराजमान करण्यात आल्या. आनंद सागरच्या निर्मितीसाठी राजस्थान येथील मार्बल आणि सॅन स्टोनचा वापर करण्यात आला, तसेच दोन लाख २0 हजार वृक्षांची लागवड करून हिरवळ जोपासण्यात आली. त्यानंतर सुमारे तीन वर्षांनंतर १२-१२-२00२ रोजी पहिल्या भागाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर १६ जानेवारी २00३ रोजी तत्कालीन उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांच्याहस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. उद्घाटनानंतर पहिल्यावर्षी महाराष्ट्रासह देश आणि विदेशातील ३0 लाख भाविकांनी आनंद सागरला भेट दिली. तेरा वर्षांच्या कालावधीत ३0 लाखांच्या संख्येने सुमारे साडेतीन कोटी भाविकांनी पर्यटनाचा आनंद लुटला आहे.मान्यवरांच्या भेटी!पश्‍चिम विदर्भाचे नंदनवन असलेल्या आनंद सागरला मान्यवरांसह विविध राजकीय पक्षांचे नेतेही भेट देतात. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनीही भेट दिली आहे.राजस्थानी शैलीचे प्रवेशद्वार!आनंद सागरचे प्रवेशद्वार राजस्थानी शैलीची आठवण करून देणारे असून, आध्यात्मिक मन:शांतीसाठी ध्यान मंडप, मत्स्यालय, झुलता पूल, खुला रंगमंच, संगीताच्या आधारावर जलधारा, आनंद सागरची सैर करणारी रेल्वे आदी आनंद सागरची वैशिष्टे आहेत.