शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

लग्न समारंभ, साेहळ्यात गर्दी; काेचिंग क्लासमध्येच काेराेना हाेताे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:44 IST

काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी मागील दहा महिन्यांपासून विद्यार्थ्यांना माेबाइलद्वारे ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र ...

काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी मागील दहा महिन्यांपासून विद्यार्थ्यांना माेबाइलद्वारे ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र व राज्य शासनाने घेतलेला निर्णय याेग्य असला तरी शासनाने टाळेबंदी शिथिल करीत सर्वच उद्याेग, व्यवसाय सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. टाळेबंदीच्या कालावधीत आर्थिक संकटात सापडलेल्या उद्याेगांना ‘बुस्टर डाेस’ देण्याचे धाेरण अवलंबिले जात आहे. साेशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची अट नमूद करीत ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न, धार्मिक साेहळे, समारंभ साजरे करण्याला परवानगी देण्यात आली आहे. संबंधित कार्यक्रमांमध्ये काेराेनाच्या नियमावलीला पायदळी तुडवीत नागरिक माेठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. लग्नाच्या मिरवणुकीत डीजेच्या तालावर ठेका धरला जात आहे. अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी मुलांना काेराेनाची लागण न हाेता ती केवळ शिकवणी वर्गातच हाेते का, असा संतप्त सवाल पालकवर्गातून उपस्थित केला जात आहे.

ऑनलाइन शिक्षणामुळे सर्वाधिक नुकसान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाेत आहे. माेबाइलवर शिकवणीदरम्यान विद्यार्थी विचलित हाेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ऑफलाइनमध्ये विद्यार्थी शिक्षकांसाेबत सहजतेने संवाद साधू शकतात.

-भालचंद्र सुर्वे संचालक, सिद्धांत काेचिंग क्लासेस

ऑनलाइन शिक्षणामुळे यंदा १० वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान झाले आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नसल्याचे विद्यार्थी सांगतात, तसेच ‘स्क्रीन टाइम’ वाढल्याने त्यांचे आराेग्य धाेक्यात आले असून, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शहरात इतर कार्यक्रम माेठ्या धडाक्यात सुरू असताना ऑफलाइन शिक्षणावरील निर्बंध अनाकलनीय ठरत आहेत.

-वसीम चाैधरी संचालक, चाैधरी काेचिंग क्लासेस

विद्यार्थी घरी मन लावून अभ्यास करीत नाहीत, ऑनलाइन क्लासच्या नावाखाली माेबाइलचा दुरुपयाेग वाढल्याची चिंता पालकांमधून व्यक्त केली जात आहे. शासनाने इयत्ता ९ वी, १० वी व १२ वीचे वर्ग सुरू केले. अशा स्थितीत ऑफलाइन शिकवणीला आडकाठी अपेक्षित नाही. शिकवणी वर्ग सुरू करण्यासाठी पालक आग्रही आहेत.

-विवेक शास्त्रकार संचालक, उत्कर्ष एज्युकेशन

यंदा काेराेनामुळे शासनाने १० वीचा अभ्यासक्रम कमी केला. ८० टक्के विद्यार्थी जेइइ, नीट आदी परीक्षेच्या माध्यमातून भविष्याची पेरणी करीत असतात. अशा परीक्षेसाठी मेहनत व परिश्रमाची गरज असताना ऑनलाइन प्रणालीमुळे यावर पाणी फेरले गेले असून अभ्यासाचा पाया कमजाेर झाला आहे. विद्यार्थ्यांमध्येही गाेंधळाची स्थिती असून ती आपल्याला समजून घ्यावी लागेल. त्यासाठी ऑफलाइन क्लास हाच पर्याय आहे.

- हरणित सिंग संचालक, ब्राइट करिअर एज्युकेशन

...फाेटाे प्रवीण ठाकरे...