महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या आठव्या दिवसापासून निमा अराेरा यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यालगत व्यवसाय करणारे लघु व्यावसायिक व फेरिवाल्यांविराेधात कारवाईचा बडगा उगारला आहे. लघु व्यावसायिकांना खुले नाट्यगृह व भाटेक्लब मागे पर्यायी जागा दिल्यानंतरही याठिकाणी जाण्यास व्यावसायिकांनी पाठ फिरविली आहे. यादरम्यान, भाजीपाला, फळविक्रेता तसेच लघु व्यावसायिकांच्या साहित्याची ताेडफाेड व नासधूस करून त्यांचे साहित्य जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. या मुद्यावर शुक्रवारी सायंकाळी विराेधी पक्षनेता साजीद खान यांनी आयुक्त निमा अराेरा यांची भेट घेउन सविस्तर चर्चा केली. जिल्हा प्रशासनाने सकाळी ९ ते सायंकाळी ५पर्यंत व्यवसाय करण्यास मुभा दिली. यावेळेतही मनपाकडून कारवाई हाेत असेल तर गरीब लघु व्यावसायिकांवर आत्महत्येची वेळ येणार असल्याचे साजीद खान यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, राष्ट्रवादीचे नगरसेवक अब्दुल रहेमान व नगरसेवक उपस्थित हाेते.
गटनेत्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष का ?
काेराेना काळात जीव धाेक्यात घालून आराेग्य सेवा निभावणाऱ्या डाॅ. सय्यद वासीक अली यांना तुम्ही तडकाफडकी सेवेतून कमी केले. काॅंग्रेस व सेनेच्या गटनेत्यांसह अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तुम्हाला कारवाई मागे घेण्याची विनंती केली. उद्या भविष्यात तुमच्याकडूनही प्रशासकीय चूक घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशावेळी शासनाकडे तक्रारी करणे हा पर्याय नाही. गटनेत्यांच्या सूचनांकडे तुम्ही दुर्लक्ष करता,ही बाब याेग्य नसल्याचे साजीद खान म्हणाले.
काेराेनाच्या संकट काळात लघु व्यावसायिकांच्या साहित्याची ताेडफाेड करणे याेग्य नाही. मनपाच्या अतिरेकी कारवाईमुळेच शुक्रवारी स्वस्तिक चहाच्या दुकानासमाेर फळविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यावर आत्महत्येची वेळ ओढवल्याचे समाेर आले आहे. प्रशासनाने संयम ठेवावा, अशी आयुक्तांकडे विनंती केली.
-साजीद खान पठाण, विराेधी पक्षनेता, मनपा