शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वडगाव येथे पाणी टंचाई; नागरिकांची भटकंती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:32 IST

निहिदा: बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजरनजीक असलेले वडगाव येथे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून, नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत ...

निहिदा: बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजरनजीक असलेले वडगाव येथे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून, नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरुळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वडगाव येथे जलस्वराज योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जातो; मात्र येथील कर्मचारी १० ते १२ दिवसानंतर पाणी सोडत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मुबलक पाणी असतानाही काही कारणे पुढे करीत नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप शाहिनाथ बाबर यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार दिली असून, तक्रारीत कर्मचारी हा नियमित पाणी सोडत नसल्याचा आरोप केला आहे. वडगावात ३ हातपंप असून, दोन बंद अवस्थेत आहे. त्यापैकी एकच सुरू असल्याने या हातपंपावर गर्दी निर्माण होत असून, महिलांमध्ये वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन जलस्वराज योजनेंतर्गत पाणी पुरवठा सुरुळीत करावा, अशी मागणी शाहिनाथ वामन बाबर, साईनाथ चव्हाण, कैलास चव्हाण, लीलाबाई शिंदे, अजय सळे दार, अनिकेत निलखंन, मुकुंदा निलखन यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. (फोटो)

-------------

वडगाव येथील नागरिकांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याविरुद्ध पाणी नियमित सोडत नसल्याबाबत तक्रार केली आहे, याबाबत चौकशी करून त्यास नोटीस देऊन कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

-किशोर काळबांडे, गट विकास अधिकारी प. सं. बार्शीटाकळी.