शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव येथे पाणी टंचाई; नागरिकांची भटकंती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:32 IST

निहिदा: बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजरनजीक असलेले वडगाव येथे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून, नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत ...

निहिदा: बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजरनजीक असलेले वडगाव येथे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून, नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरुळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वडगाव येथे जलस्वराज योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जातो; मात्र येथील कर्मचारी १० ते १२ दिवसानंतर पाणी सोडत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मुबलक पाणी असतानाही काही कारणे पुढे करीत नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप शाहिनाथ बाबर यांच्यासह ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार दिली असून, तक्रारीत कर्मचारी हा नियमित पाणी सोडत नसल्याचा आरोप केला आहे. वडगावात ३ हातपंप असून, दोन बंद अवस्थेत आहे. त्यापैकी एकच सुरू असल्याने या हातपंपावर गर्दी निर्माण होत असून, महिलांमध्ये वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन जलस्वराज योजनेंतर्गत पाणी पुरवठा सुरुळीत करावा, अशी मागणी शाहिनाथ वामन बाबर, साईनाथ चव्हाण, कैलास चव्हाण, लीलाबाई शिंदे, अजय सळे दार, अनिकेत निलखंन, मुकुंदा निलखन यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. (फोटो)

-------------

वडगाव येथील नागरिकांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याविरुद्ध पाणी नियमित सोडत नसल्याबाबत तक्रार केली आहे, याबाबत चौकशी करून त्यास नोटीस देऊन कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

-किशोर काळबांडे, गट विकास अधिकारी प. सं. बार्शीटाकळी.