शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
3
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
4
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
5
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
6
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
7
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
8
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
9
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
10
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
11
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
12
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
13
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
14
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
15
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
16
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
17
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
18
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
19
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
20
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही तालुक्यात पाणीटंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:15 IST

तालुक्यातील ग्रामीण भागात १०० गावे असून, यातील काही गावांच्या कडेलाच वाण धरण आहे. तर, या वाण धरणाच्या ...

तालुक्यातील ग्रामीण भागात १०० गावे असून, यातील काही गावांच्या कडेलाच वाण धरण आहे. तर, या वाण धरणाच्या पायथ्याशी सुद्धा अनेक गावे आहेत. मात्र, या गावात अजूनही या धरणाचे पाणी जनतेला पिण्यास मिळाले नसून येथील जनतेचा घसा कोरडाच आहे. तसेच या गावांसह तालुक्याचा दक्षिण भाग हा खारपाणपट्टा समजला जातो. या भागातील पाणी पिण्यायोग्य नसल्याने अनेक गावांत किडनीच्या आजाराने नागरिक त्रस्त आहेत व शेतकऱ्यांच्या शेतीला सुद्धा हे पाणी पूरक नसल्याने या परिसरात नेर-धामना बॅरेज असून, यातील पाणी येथील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता मिळाले नाही. त्यामुळे तालुक्याच्या उत्तर दक्षिण दिशेला पाणी असूनही जनतेला पिण्याचे पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे.

पाणीटंचाई निवारणार्थ १ कोटींचा निधी

शासनस्तरावर दरवर्षी जानेवारी ते जून या महिन्यात ज्या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या जाणवू शकते, त्याकरिता कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यांमध्ये तालुक्यातील ७४ गावांमध्ये पाणीटंचाई दर्शविण्यात आली असून, एप्रिल ते जून या महिन्यात ३६ गावांमध्ये पाणीटंचाई आहे. यामध्ये विहीर अधिग्रहण ६ ठिकाणी असून, एका गावात तात्पुरती नळयोजना आणि ३५ नवीन कूपनलिका अशी योजना याकरिता १ कोटी २ लक्ष रुपये खर्च होणार आहेत.

या गावात आहे पाणीटंचाई

वरूड वडणेर, चितलवाडी, अडसूळ, जस्तगाव, कळमखेड, मालठाना, मालपुरा, खापरखेड, मनात्री बु, चांगलवाडी, पाथर्डी, टाकळी, थार, तळेगाव, तळेगाव, रायखेड, वाकोडी, दापुरा, निंबोळी, राणेगाव, पिवंदल, सांगवी, दानापूर, वारखेड, माळेगाव बाजार, चिचारी, चंदनपूर, नवी तलाई, भिली, बोरव्हा, उमरशेवडी, अंबाबरव्हा, सोमठाना, अडगाव बु, भांबेरी, मनब्दा.

तालुक्यातील पाणी बाहेर

तालुक्यातील पाणी इतर जिल्ह्यांत व जिल्ह्याच्या इतर ठिकाणी पळविण्यात आले. मात्र, या तालुक्यातील जनतेचाच घसा कोरडा ठेवून इतरत्र तालुक्यातील पाणी पळविले जात आहे. लोकप्रतिनिधींनी आतातरी पाठपुरावा करून तातडीने ग्रामीण भागात वाण धरणाची पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित करून जनतेला पाणी द्यावे, हीच अपेक्षा आहे.

पाण्याची पातळी खोल गेल्याचा अहवाल!

शासन कूपनलिकांवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. मात्र, यामध्ये पाण्याची पातळी अनेक ठिकाणी खोल गेली असून, आणि त्यात शासनाने ठरवून दिलेली २०० मीटर खोल सिंचन उपसा क्षमता बघता, बोअरवेलला पाणी न लागता खर्च व्यर्थ जात आहे.

त्यात भूवैज्ञानिक यांनी यापूर्वी इतर तालुक्यांच्या तुलनेत या तालुक्याची पाण्याची पातळी खोल गेल्याची नोंद केली.