शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
18
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
19
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
20
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!

दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही तालुक्यात पाणीटंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:15 IST

तालुक्यातील ग्रामीण भागात १०० गावे असून, यातील काही गावांच्या कडेलाच वाण धरण आहे. तर, या वाण धरणाच्या ...

तालुक्यातील ग्रामीण भागात १०० गावे असून, यातील काही गावांच्या कडेलाच वाण धरण आहे. तर, या वाण धरणाच्या पायथ्याशी सुद्धा अनेक गावे आहेत. मात्र, या गावात अजूनही या धरणाचे पाणी जनतेला पिण्यास मिळाले नसून येथील जनतेचा घसा कोरडाच आहे. तसेच या गावांसह तालुक्याचा दक्षिण भाग हा खारपाणपट्टा समजला जातो. या भागातील पाणी पिण्यायोग्य नसल्याने अनेक गावांत किडनीच्या आजाराने नागरिक त्रस्त आहेत व शेतकऱ्यांच्या शेतीला सुद्धा हे पाणी पूरक नसल्याने या परिसरात नेर-धामना बॅरेज असून, यातील पाणी येथील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता मिळाले नाही. त्यामुळे तालुक्याच्या उत्तर दक्षिण दिशेला पाणी असूनही जनतेला पिण्याचे पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे.

पाणीटंचाई निवारणार्थ १ कोटींचा निधी

शासनस्तरावर दरवर्षी जानेवारी ते जून या महिन्यात ज्या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या जाणवू शकते, त्याकरिता कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यांमध्ये तालुक्यातील ७४ गावांमध्ये पाणीटंचाई दर्शविण्यात आली असून, एप्रिल ते जून या महिन्यात ३६ गावांमध्ये पाणीटंचाई आहे. यामध्ये विहीर अधिग्रहण ६ ठिकाणी असून, एका गावात तात्पुरती नळयोजना आणि ३५ नवीन कूपनलिका अशी योजना याकरिता १ कोटी २ लक्ष रुपये खर्च होणार आहेत.

या गावात आहे पाणीटंचाई

वरूड वडणेर, चितलवाडी, अडसूळ, जस्तगाव, कळमखेड, मालठाना, मालपुरा, खापरखेड, मनात्री बु, चांगलवाडी, पाथर्डी, टाकळी, थार, तळेगाव, तळेगाव, रायखेड, वाकोडी, दापुरा, निंबोळी, राणेगाव, पिवंदल, सांगवी, दानापूर, वारखेड, माळेगाव बाजार, चिचारी, चंदनपूर, नवी तलाई, भिली, बोरव्हा, उमरशेवडी, अंबाबरव्हा, सोमठाना, अडगाव बु, भांबेरी, मनब्दा.

तालुक्यातील पाणी बाहेर

तालुक्यातील पाणी इतर जिल्ह्यांत व जिल्ह्याच्या इतर ठिकाणी पळविण्यात आले. मात्र, या तालुक्यातील जनतेचाच घसा कोरडा ठेवून इतरत्र तालुक्यातील पाणी पळविले जात आहे. लोकप्रतिनिधींनी आतातरी पाठपुरावा करून तातडीने ग्रामीण भागात वाण धरणाची पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित करून जनतेला पाणी द्यावे, हीच अपेक्षा आहे.

पाण्याची पातळी खोल गेल्याचा अहवाल!

शासन कूपनलिकांवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. मात्र, यामध्ये पाण्याची पातळी अनेक ठिकाणी खोल गेली असून, आणि त्यात शासनाने ठरवून दिलेली २०० मीटर खोल सिंचन उपसा क्षमता बघता, बोअरवेलला पाणी न लागता खर्च व्यर्थ जात आहे.

त्यात भूवैज्ञानिक यांनी यापूर्वी इतर तालुक्यांच्या तुलनेत या तालुक्याची पाण्याची पातळी खोल गेल्याची नोंद केली.