शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही तालुक्यात पाणीटंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:15 IST

तालुक्यातील ग्रामीण भागात १०० गावे असून, यातील काही गावांच्या कडेलाच वाण धरण आहे. तर, या वाण धरणाच्या ...

तालुक्यातील ग्रामीण भागात १०० गावे असून, यातील काही गावांच्या कडेलाच वाण धरण आहे. तर, या वाण धरणाच्या पायथ्याशी सुद्धा अनेक गावे आहेत. मात्र, या गावात अजूनही या धरणाचे पाणी जनतेला पिण्यास मिळाले नसून येथील जनतेचा घसा कोरडाच आहे. तसेच या गावांसह तालुक्याचा दक्षिण भाग हा खारपाणपट्टा समजला जातो. या भागातील पाणी पिण्यायोग्य नसल्याने अनेक गावांत किडनीच्या आजाराने नागरिक त्रस्त आहेत व शेतकऱ्यांच्या शेतीला सुद्धा हे पाणी पूरक नसल्याने या परिसरात नेर-धामना बॅरेज असून, यातील पाणी येथील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता मिळाले नाही. त्यामुळे तालुक्याच्या उत्तर दक्षिण दिशेला पाणी असूनही जनतेला पिण्याचे पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे.

पाणीटंचाई निवारणार्थ १ कोटींचा निधी

शासनस्तरावर दरवर्षी जानेवारी ते जून या महिन्यात ज्या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या जाणवू शकते, त्याकरिता कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यांमध्ये तालुक्यातील ७४ गावांमध्ये पाणीटंचाई दर्शविण्यात आली असून, एप्रिल ते जून या महिन्यात ३६ गावांमध्ये पाणीटंचाई आहे. यामध्ये विहीर अधिग्रहण ६ ठिकाणी असून, एका गावात तात्पुरती नळयोजना आणि ३५ नवीन कूपनलिका अशी योजना याकरिता १ कोटी २ लक्ष रुपये खर्च होणार आहेत.

या गावात आहे पाणीटंचाई

वरूड वडणेर, चितलवाडी, अडसूळ, जस्तगाव, कळमखेड, मालठाना, मालपुरा, खापरखेड, मनात्री बु, चांगलवाडी, पाथर्डी, टाकळी, थार, तळेगाव, तळेगाव, रायखेड, वाकोडी, दापुरा, निंबोळी, राणेगाव, पिवंदल, सांगवी, दानापूर, वारखेड, माळेगाव बाजार, चिचारी, चंदनपूर, नवी तलाई, भिली, बोरव्हा, उमरशेवडी, अंबाबरव्हा, सोमठाना, अडगाव बु, भांबेरी, मनब्दा.

तालुक्यातील पाणी बाहेर

तालुक्यातील पाणी इतर जिल्ह्यांत व जिल्ह्याच्या इतर ठिकाणी पळविण्यात आले. मात्र, या तालुक्यातील जनतेचाच घसा कोरडा ठेवून इतरत्र तालुक्यातील पाणी पळविले जात आहे. लोकप्रतिनिधींनी आतातरी पाठपुरावा करून तातडीने ग्रामीण भागात वाण धरणाची पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित करून जनतेला पाणी द्यावे, हीच अपेक्षा आहे.

पाण्याची पातळी खोल गेल्याचा अहवाल!

शासन कूपनलिकांवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. मात्र, यामध्ये पाण्याची पातळी अनेक ठिकाणी खोल गेली असून, आणि त्यात शासनाने ठरवून दिलेली २०० मीटर खोल सिंचन उपसा क्षमता बघता, बोअरवेलला पाणी न लागता खर्च व्यर्थ जात आहे.

त्यात भूवैज्ञानिक यांनी यापूर्वी इतर तालुक्यांच्या तुलनेत या तालुक्याची पाण्याची पातळी खोल गेल्याची नोंद केली.