शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

पाणीटंचाई निवारण आराखडा मंजूर

By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST

जिल्हाधिका-यांनी दिली मंजुरी: १९८ गावांसाठी ११ कोटींच्या २0 उपाययोजना.

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांच्या कृती आराखडयास जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. जिल्ह्यातल्या पाच तालुक्यांतील १९८ गावांसाठी १0 कोटी ९९ लाख ३९ हजार रुपयांच्या २0 उपाययोजना या कृती आराखड्यात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यावर्षी पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, नदी-नाले आटले आहेत. त्यामुळे हिवाळ्यातच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर, ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीकरिता जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत विविध उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी तेल्हारा व पातूर हे दोन तालुके वगळता उर्वरित पाच तालुक्यातील १९८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी विविध २0 उपाययोजनांची कामे करण्यासाठी १0 कोटी ९९ लाख ३९ हजार रुपये खर्चाचा कृती आराखडा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांमार्फत (सीईओ) ३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या या कृती आराखड्यास जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. कृती आराखड्यास जिल्हाधिकार्‍यांकडून मंजुरी मिळाल्याने आराखड्यात प्रस्तावित पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.