शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

तेल्हारा तालुक्यातील ६९ गावांचा पाणी प्रश्न मार्गी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:19 IST

तेल्हारा: गेल्या अनेक दशकांपासून वान धरण तालुक्यात असतानाही तालुक्यातील जनतेला पाणी मिळत नव्हते. पाणी न मिळाल्याने शिवसेनेचे जिल्हा ...

तेल्हारा: गेल्या अनेक दशकांपासून वान धरण तालुक्यात असतानाही तालुक्यातील जनतेला पाणी मिळत नव्हते. पाणी न मिळाल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनी प्रयत्नांची शिकस्त करीत, तालुक्यातील ६९ गावांमध्ये वान धरणाची पाणी पुरवठा योजनेचा देखभाल दुरुस्तीचा ठराव जिल्हा परिषदेच्या सभेत मंजूर करून घेतला. त्यामुळे तालुकावासीयांना वान धरणाचे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

वान धरण ज्या तालुक्यात आहे. त्या तालुक्यातील जनतेला अनेक दशकांपासून धरणाचे पिण्याचे पाणी मिळत नव्हते. याच धरणाचे पाणी राजकारण्यांनी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर नेले. मात्र धरणाच्या खाली वसलेल्या गावांना धरणातील पाणी मिळत नव्हते. तालुक्यातील बराचसा भाग हा खारपाणपट्यात येत असल्याने खारे पाणी जनतेला पिणे भाग पडत होते. त्यामुळे अनेक नागरिक किडनी आजाराने त्रस्त होते. तसेच उन्हाळ्यात पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत होते. जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने शिवसेनेचे बेलखेड सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनी प्रयत्न सुरू केले. सर्वप्रथम पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन समस्या सोडविण्याची मागणी करून पाठपुरावा सुरू केला. जिल्हा परिषदेच्या गुरूवारच्या सभेत देखभाल दुरुस्तीचा ठराव सुद्धा सर्वानुमते मंजूर करून घेतला. त्यामुळे आता तालुक्यातील ज्या गावात वान धरणाचे पिण्याचे पाणी पोहोचले नव्हते. त्या सर्व ६९ गावांमध्ये वान धरणाचे पाणी पोहोचणार असल्याने तालुकावासीयांची तहान मिटणार आहे.

फोटो: