शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

तेल्हारा तालुक्यातील ६९ गावांचा पाणी प्रश्न मार्गी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:19 IST

तेल्हारा: गेल्या अनेक दशकांपासून वान धरण तालुक्यात असतानाही तालुक्यातील जनतेला पाणी मिळत नव्हते. पाणी न मिळाल्याने शिवसेनेचे जिल्हा ...

तेल्हारा: गेल्या अनेक दशकांपासून वान धरण तालुक्यात असतानाही तालुक्यातील जनतेला पाणी मिळत नव्हते. पाणी न मिळाल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनी प्रयत्नांची शिकस्त करीत, तालुक्यातील ६९ गावांमध्ये वान धरणाची पाणी पुरवठा योजनेचा देखभाल दुरुस्तीचा ठराव जिल्हा परिषदेच्या सभेत मंजूर करून घेतला. त्यामुळे तालुकावासीयांना वान धरणाचे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

वान धरण ज्या तालुक्यात आहे. त्या तालुक्यातील जनतेला अनेक दशकांपासून धरणाचे पिण्याचे पाणी मिळत नव्हते. याच धरणाचे पाणी राजकारण्यांनी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर नेले. मात्र धरणाच्या खाली वसलेल्या गावांना धरणातील पाणी मिळत नव्हते. तालुक्यातील बराचसा भाग हा खारपाणपट्यात येत असल्याने खारे पाणी जनतेला पिणे भाग पडत होते. त्यामुळे अनेक नागरिक किडनी आजाराने त्रस्त होते. तसेच उन्हाळ्यात पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत होते. जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने शिवसेनेचे बेलखेड सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनी प्रयत्न सुरू केले. सर्वप्रथम पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन समस्या सोडविण्याची मागणी करून पाठपुरावा सुरू केला. जिल्हा परिषदेच्या गुरूवारच्या सभेत देखभाल दुरुस्तीचा ठराव सुद्धा सर्वानुमते मंजूर करून घेतला. त्यामुळे आता तालुक्यातील ज्या गावात वान धरणाचे पिण्याचे पाणी पोहोचले नव्हते. त्या सर्व ६९ गावांमध्ये वान धरणाचे पाणी पोहोचणार असल्याने तालुकावासीयांची तहान मिटणार आहे.

फोटो: