शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
2
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
3
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
4
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
5
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
6
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
7
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
8
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
9
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
11
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
12
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
13
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
14
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
15
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
16
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
17
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
18
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
19
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
20
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा

पाणी फाऊंडेशनमुळे रेशीम शेती प्रशिक्षण केंद्राचा चेहरा मोहरा बदलणार!

By admin | Updated: April 28, 2017 11:32 IST

गत 16 वर्षापासुन पाण्याअभावी बंद पडलेला कोट्यावधी रुपयांचा केंद्रीय रेशीम बोर्डाचा प्रकल्प पाणी फाऊंडेशनच्या विशेष प्रयत्नानी कार्यान्वीत होणार आहे.

शिर्ला (अकोला) : गत 16 वर्षापासुन पाण्याअभावी बंद पडलेला कोट्यावधी रुपयांचा केंद्रीय रेशीम बोर्डाचा प्रकल्प पाणी फाऊंडेशनच्या विशेष प्रयत्नानी कार्यान्वीत होणार आहे. केंद्र सरकारच्या रेशीम बोर्डाने विदर्भातील शेतकरी पारंपरिक पीक पध्दतीने खचुन गेल्याने नविन शाश्वत ऊत्पन्न स्त्रोताचा रेशीम शेतीचा पर्याय देण्यासाठी अकोला जिल्हय़ातील शिर्ला येथे चीन_भारत आपसी सामंजस्य करारानुसार कोट्यवधी खर्चून रेशीम शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारले. रेशीम शेती विस्ताराची प्रचार प्रसाराची प्रकिया चार वर्षे जोमाने चालली. शेतकरी रेशीम शेतीकडे वळु लागले. मात्र अचानक भुगर्भातील जलसाठा कमी झाला आणी रेशीम प्रकल्प पाणी दुष्काळाच्या कचाट्यात सापडला. अल्पावधीतच प्रकल्पाची वाताहत झाली. अखेर हा प्रकल्प तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी त्यांच्या कार्यकाळात बारामती येथे हलविला. इमारती भग्नावस्थेत गेल्या आणी हे अवशेष राज्य शासनाच्या रेशीम संचालनालयाला करावर चालविण्यास दिले. आधिच पाण्याचे दुर्भिक्ष त्यामुळे ह्यातील शेती क्षेत्र पडिक जमीनीत बहुतांश भाग परावर्तीत झाला. शेतकरी दुर गेला. मात्र गत वर्षी जलयुक्त शिवार योजना आली परीसरात जलसंधारणाची विविध कामे झाली. परिसरात पाणी पातळी वाढण्यास सुरूवात झाली. ह्या वर्षी अमीर खान प्रणीत पाणी फाऊंडेशन आले. शिर्लाच्या युवकांना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षित युवकांनी सोबत घेउन गावातील सचिन कोकाटे.संतोषकुमार गवई ह्यांनी रेशीम फार्म प्रमुख श्री. झलके ह्यांची भेट घेतली. रेशीम शेतीचे वैभव जलसंधारण विविध ऊपचारातुन कसे आणायचे याची शास्त्रशुध्द योजना मांडली. श्री झलकेनी वरिष्ठाकडुन परवानगी मिळवली. पाणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यानी 8 एप्रिलला शुभारंभासाठी अकोला जिल्हाधिकारी जी.श्रीकांत ह्यांना बोलवले. आणि महाश्रमदानाने रेशीम प्रशिक्षण केंद्राचा चेहरा मोहरा बदलायला सुरुवात केली. बघता बघता आता पर्यंत ह्या क्षेत्रावर कंपार्टमेट बंडीग. कंट्रोल बांध. अनघा दगडी बांध. समतल चर.खोल चर.व्हॅट. शेततळे. विहिर पुनर्भरण. आदि. विविध जलसंधारणाचे उपचार ह्या क्षेत्रात करण्यात आले. पाणी फाऊंडेशनच्या प्रशिक्षणामूळे गावकरी हा बदल घडवु शकले. परीणामी हा विदर्भाचा रेशीम प्रकल्प शेतकऱ्याना रेशीम शेतीचा शाश्वत मार्ग दाखवण्यासाठी पुन्हा ऊभा राहु शकला.अमीर खानच्या पाणी फाऊंडेशनच्या चळवळीमुळे.