शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पाण्याचा थेंब अन् थेंब जमिनीत मुरविणे गरजेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 02:40 IST

जलजागृती सप्ताहानिमित्त अकोल्यात ‘वॉटर रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद!

अकोला, दि. १९- पडणार्‍या पावसाचा थेंब अन् थेंब अडवून जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. भविष्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण होणार आहे. यासाठी जलजागृती करणे, जलसंर्वधन करणे तसेच असलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. राज्यात १६ ते २२ मार्च २0१७ दरम्यान जलसंपदा व पाटबंधारे विभागामार्फत पाण्याच्या बचतीचे महत्त्व पटविण्यासाठी जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त रविवार, १९ मार्च रोजी ७ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून एका भव्य वॉटर रनचे आयोजन करण्यात आले. या वॉटर रनचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, अकोला पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई, कार्यकारी अभियंता विजय लोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे यांची प्रमुख उपस्थिती होती. वॉटर रनची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघून अशोक वाटिका- नवीन बसस्थानक- टॉवर चौक ते पुन्हा नवीन बसस्थानक -अशोक वाटिका मार्गे अधीक्षक अभियंता अकोला पाटबंधारे मंडळ येथे समारोप करण्यात आला. या वॉटर रनच्या पुढे जलजागृतीचे संदेश देणारे फलक शेकडोच्या हातात होते. जल है, तो कल है, पाण्याची बचत काळाची गरज, पाणी वाचवा देश वाचवा, यासारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. संपूर्ण शहर जलजागृतीसाठी सज्ज झाल्याचे दिसून येत होते. वॉटर रनमध्ये सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी जलजागृतीचे संदेश देणारे टी शर्ट परिधान केले असल्यामुळे एक वेगळीच छटा रॅलीला दिसत होती. प्रास्ताविक जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई, संचालन अरविंद भोंडे यांनी केले. या वॉटर रनमध्ये पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, जिल्हा प्रशासन जिल्हा माहिती कार्यालय तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.