शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

पाण्याचा थेंब अन् थेंब जमिनीत मुरविणे गरजेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 02:40 IST

जलजागृती सप्ताहानिमित्त अकोल्यात ‘वॉटर रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद!

अकोला, दि. १९- पडणार्‍या पावसाचा थेंब अन् थेंब अडवून जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. भविष्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण होणार आहे. यासाठी जलजागृती करणे, जलसंर्वधन करणे तसेच असलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. राज्यात १६ ते २२ मार्च २0१७ दरम्यान जलसंपदा व पाटबंधारे विभागामार्फत पाण्याच्या बचतीचे महत्त्व पटविण्यासाठी जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त रविवार, १९ मार्च रोजी ७ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून एका भव्य वॉटर रनचे आयोजन करण्यात आले. या वॉटर रनचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, अकोला पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई, कार्यकारी अभियंता विजय लोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे यांची प्रमुख उपस्थिती होती. वॉटर रनची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघून अशोक वाटिका- नवीन बसस्थानक- टॉवर चौक ते पुन्हा नवीन बसस्थानक -अशोक वाटिका मार्गे अधीक्षक अभियंता अकोला पाटबंधारे मंडळ येथे समारोप करण्यात आला. या वॉटर रनच्या पुढे जलजागृतीचे संदेश देणारे फलक शेकडोच्या हातात होते. जल है, तो कल है, पाण्याची बचत काळाची गरज, पाणी वाचवा देश वाचवा, यासारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. संपूर्ण शहर जलजागृतीसाठी सज्ज झाल्याचे दिसून येत होते. वॉटर रनमध्ये सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी जलजागृतीचे संदेश देणारे टी शर्ट परिधान केले असल्यामुळे एक वेगळीच छटा रॅलीला दिसत होती. प्रास्ताविक जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई, संचालन अरविंद भोंडे यांनी केले. या वॉटर रनमध्ये पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, जिल्हा प्रशासन जिल्हा माहिती कार्यालय तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.