शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

वॉटर कप स्पर्धा बनली लोकचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:21 IST

बार्शिटाकळी : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत समृद्ध गाव स्पर्धेत रूपांतर झाले असून यामध्ये अकोला जिल्ह्यातून अकोट ...

बार्शिटाकळी : पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत समृद्ध गाव स्पर्धेत रूपांतर झाले असून यामध्ये अकोला जिल्ह्यातून अकोट व बार्शीटाकळी तालुक्याची निवड करण्यात आली आहे. यापैकी बार्शीटाकळी तालुक्यामध्ये ४१ गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून सहभागी गावातील ग्रामस्थ व वॉटर हिरो या स्पर्धेत टिकण्यासाठी ५ मार्च रोजी रात्री बारा वाजेपर्यंत जागून विविध उपायांबाबतची माहिती ऑनलाईन करण्यासाठी एकत्रित आले. या स्पर्धेत पात्र होण्यासाठी ५ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत १२० गुणांची माहिती ॲपमध्ये भरणे अनिवार्य असल्याने प्रत्येक गावाचे ग्रामस्थ आपण स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ठरवून दिलेल्या गुणांची माहिती अपलोड करण्यात गेल्या आठवड्यापासून मग्न होते. ज्या गावांनी ही माहिती परिपूर्ण भरली तीच गावे या स्पर्धेत पात्र होणार आहेत. प्रशासनाचे कर्मचाऱ्यांनीसुद्धा जागरण केले. समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी बार्शिटाकळी तालुक्यातील ४१ गावांच्या वॉटर हिरो व ग्रामस्थांना आपल्या गावाची खरीप, रब्बी हंगामातील पिकांची माहिती, शेतातील विहिरी व बोअरवेल बाबत सर्वेक्षण करण्यासाठी परिपूर्ण माहिती ॲपमध्ये नोंदविण्यासाठी अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना विभागाचे उपजिल्हाधिकारी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार गजानन हामंद, तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे मार्गदर्शनात तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आदी शासकीय कर्मचाऱ्यांनी गावात येऊन गाव समृद्ध करण्यासाठी सहकार्य केले. प्रशासनाची ग्रामस्थांना साथ मिळत असून तालुका समन्वयक संघपाल वाहुरवाघ, विद्याताई आकोडे हे पाणी फाउंडेशनच्या वतीने काम पाहत आहेत. स्पर्धेत जास्तीत जास्त गावांनी सहभाग घेऊन आपले गाव समृद्ध करण्यासाठी तसेच जलव्यवस्थापन, गावकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, मृदा आणि जलसंधारण, संरक्षित कुरण क्षेत्र तयार करणे, वृक्ष आणि जंगले वाढविणे, माती पुनरुज्जीवित करणे आधी उपायांवर भर देऊन वॉटर हिरो व ग्रामस्थांनी लोक चळवळ यशस्वी करावी असे आवाहन पाणी फाउंडेशनचे विदर्भाचे मास्टर ट्रेनर सुमित गोरले यांनी केले.

फोटो: