शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

व-हाडातील धरणांचा जलसाठा घसरला!

By admin | Updated: February 3, 2015 00:45 IST

अकोला शहराला पाणीपुरवठा करणा-या काटेपूर्णा धरणात २२ दलघमी जलसाठा.

अकोला : पश्‍चिम विदर्भातील धरणांमधील जलसाठय़ात झपाट्याने घट होत आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात केवळ २२ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येणार्‍या दिवसांत पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे एकंदर चित्र आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या चार जिल्ह्यांकडे पावसाने पाठ फिरविल्याने येथील धरणांमध्ये अल्प जलसाठा शिल्लक आहे. यावर्षी हिवाळा लागला, पण थंडीला प्रत्यक्षात एक ते दीड महिन्यांनी सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात तापमानात प्रचंड वाढ झाल्याने जलसाठय़ातील पाण्याचे बाष्पीभवन झाले. डिसेंबरच्या शेवटच्या आणि जानेवारीच्या प्रथम आठवड्यात थंडीला सुरुवात झाली. जानेवरीत ढगाळ वातावरण होते. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग काहीसा कमी झाला होता.आता पुन्हा रात्री थंडी आणि दिवसाच्या तापमानात वाढ झाल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढत आहे. दरम्यान, काटेपूर्णा या मोठय़ा प्रकल्पात आजमितीस केवळ २२ दलघमी म्हणजे २६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या जिवंत जलसाठय़ात आठ ते दहा टक्के गाळ असल्याने शहरापुढे पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. बुलडाणा जिलतील नळगंगा धरणामध्ये २९.१0 दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याच जिलतील ज्ञानगंगा प्रकल्पात ५९ टक्के, मस धरणामध्ये ७४ टक्के, कोराडी ५0 टक्के, पलढग या प्रकल्पात ७२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिलतील मोर्णा धरणात ३५ टक्के, निर्गुणा ६६ टक्के, उमा धरणात १४ टक्के जलसाठा शिल्लक असून, दगडपारवा धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अंभियता विजय लोळे यांनी काटेपूर्णा धरणातून शहर आणि विविध पाणीपुरवठा योजनांना प्रत्येक महिन्याला तीन दशलक्ष घनमीटर पाणी सोडले जात असल्याचे सांगून त्यानुसार येत्या सहा महिन्यांत १८ दलघमी पाणी लागेल. धरणात आजमितीस २२ दलघमी पाणी आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नसली तरी काटकसर व काटेकोर नियोजन करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले.