शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

व-हाडात पाणीटंचाईचे संकट !

By admin | Updated: September 7, 2015 23:32 IST

काटेपूर्णा २७ टक्के ; दगडपारवा शून्य, कोराडीत ४ टक्के जलसाठा.

अकोला : पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ात पुरक पाऊस झाला नसल्याने या विभागात जलसंकट निर्माण आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात केवळ २७ टक्के जलसाठा शिल्लक असून, दगडपारवा शून्यावर, तर बुलडाणा जिल्हय़ातील कोराडी धरणात ४ टक्के जलसाठा आहे. यावर्षी पावसाळा संपायला आला तरी पुरक पाऊस झाला नसल्याने पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ातील मोठे, मध्यम, लघू प्रकल्पात पूरक जलसाठा संकलित झाला नाही. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस २७ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. आता तर पाऊस नाही आणि तापमानात वाढ झाल्याने या धरणाची पातळी झपाट्याने कमी होत आहे. अकोला जिल्हय़ातील मोर्णा या मध्यम प्रकल्पात ३८ टक्के, निगरुणा ४९ टक्के, तर उमा या मध्यम प्रकल्पात २८ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा या प्रकल्पात आजमितीस २४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ज्ञानगंगा प्रकल्प ४३ टक्के, मस २६ टक्के, कोराडी ४ टक्के, तर पलढग या प्रकल्पात ५४ टक्के जलसाठा आहे. यवतमाळ जिल्हय़ातील पूस या मोठय़ा प्रकल्पात ५१ टक्के जलसाठा शिल्लक असून, लोअरपूसमध्ये ८७ टक्के साठा आहे. सायखेडा या प्रकल्पात ९९ टक्के, गोकी ९९ टक्के, वाघाडी ९९ टक्के व बोरगाव या मध्यम प्रकल्पात ८८ टक्के जलसाठा आहे. वाशिम जिल्हय़ातील सोनल व एकबुर्जी प्रकल्प पातळीची अवस्था सुधारण्याची शक्यता आहे. तेल्हारा तालुक्यातील वाण प्रकल्पात ८६ टक्के तर आकोट तालुक्यातील पोपटखेड प्रकल्पात ८६.६४ टक्के जलसाठा आहे. काटेपूर्णा प्रकल्प जलग्रहण क्षेत्रात अद्याप पूरक पाऊस झाला नसल्याने काटेपूर्णा धरणात आजमितीस २७ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे या प्रकल्पात आहे त्या जलसाठय़ाचे काटेकोर व्यवस्थापन करावे लागणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी स्पष्ट केले.

*मध्यम प्रकल्प पडले कोरडे

       अकोला जिल्हय़ातील दगडपारवा या धरणाची पातळी शून्य टक्के असून, बुलडाणा जिल्हय़ातील कोराडी धरणात केवळ ४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. इतर धरणातील पातळी कमी होत आहे.