शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या भीतीने ग्रामस्थ गाव सोडण्याच्या तयारीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:04 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या बारुखेडा व नागरतास या दोन आदिवासीबहुल गावांचे पुनवर्सन वारी हनुमान येथे करण्यात आले; परंतु तेथे या गावांमधील आदिवासी रहिवाशांना गावात आवश्यक असणार्‍या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. परिणामी, वारी हनुमान येथे पुनर्वसन झाल्यापासून या दोन गावातील लहान-मोठय़ा ७७ ग्रामस्थांचे मृत्यू झाल्याने गावात घबराट निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देबारुखेडा, नागरतास गावात पाच वर्षांत ७७ ग्रामस्थांचे मृत्यूपुनर्वसित गावात मूलभूत सुविधांचा अभाव

सदानंद खारोडे । लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या बारुखेडा व नागरतास या दोन आदिवासीबहुल गावांचे पुनवर्सन वारी हनुमान येथे करण्यात आले; परंतु तेथे या गावांमधील आदिवासी रहिवाशांना गावात आवश्यक असणार्‍या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. परिणामी, वारी हनुमान येथे पुनर्वसन झाल्यापासून या दोन गावातील लहान-मोठय़ा ७७ ग्रामस्थांचे मृत्यू झाल्याने गावात घबराट निर्माण झाली आहे.तेल्हारा तालुक्यातील बारुखेडा व नागरतास या दोन गावांचे पुनर्वसन सन २0११ ते २0१५ मध्ये वारी हनुमान येथे करण्यात आले. त्यावेळी वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सदर नागरिकांना पुनर्वसन झालेल्या गावात मूलभूत सोयी व उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्या पुनर्वसित प्रत्येक कुटुंबाला जमीन पाहून नियमाप्रमाणे मदत देण्यात येईल, असे सांगून सदर गावाचे पुनर्वसन केले; पण सध्या बारुखेडा व नागरतास या दोन्ही गावात मूलभूत सुविधा नाहीत.  बारुखेडा येथे दोन कूपनलिका असून, त्याही एक महिन्यापासून बंद आहेत. येथील ग्रामसेवक एक-एक महिना गावात येत नसल्याने आदिवासी नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळत नाही. येथे आरोग्यसेवाही उपलब्ध नाही. येथे कोणतेही कार्यालय नसल्याने येथे महिन्यातून एक वेळा नर्स येते. आजारी असलेल्यांना औषधे, गोळ्या मिळत नाहीत. येथील मुलांना चांगले शिक्षणही मिळत नाही. येथील रहिवासी बुडाबाबा बेढेकर यांची १६ एकर शेती होती. त्यांना केवळ आतापर्यंत केवळ दोन लाख रुपयांची शासकीय मदत मिळाली. अनेकांना घरासाठी अजूनही पैसा मिळाला नाही. येथील मजुरांना पुरेशी मजुरी मिळत नसल्याने अनेकांनी गाव सोडले. येथील रामकली बुडा बेठेकर या एकाच कुटुंबातील रामकली बेठेकर, बुडा बेठेकर, अशोक बुडा बेठेकर, सुकचंद बुडा, खुशी मुन्ना बेठेकर, लखन मुन्ना बेठेकर, अनुस मुन्ना बेठेकर या सात जणांचा अलीकडेच मृत्यू झाला. बारुखेड्यात पाच वर्षांत ६४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नागरतास येथे १३ लोकांचा मृत्यू झाला. सदर प्रकारामुळे दोन्ही गावांमधील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.आम्ही यापूर्वी नदीचे पाणी पित होतो, तेव्हा हा प्रकार नव्हता; मात्र येथे आल्यानंतर कूपनलिकेचे पाणी पित असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे विनायक मंगल काकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यामुळे आम्ही येथे वास्तव्य केल्यास येत्या काही दिवसांत एकही आदिवासी जिवंत राहणार नसल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. आम्हाला तत्कालीन शासकीय अधिकार्‍यांनी वेगवेगळी आमिषे दाखवून गाव सोडण्यास बाध्य केले; परंतु या दोन्ही गावात शासनाने मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या नसल्याने दोन्ही गावातील आदिवासी बांधव पुढील महिन्यात जुन्या गावातच मुक्कामी जाणार असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. 

शासनाने पुनर्वसित गावात आरोग्यसेवा, रोजगार, ग्रामपंचायत व पिण्यास चांगले पाणी उपलब्ध करून दिले नाही. परिणामी, या पुनर्वसित गावामध्ये पाच वर्षांत ६४ आदिवासी ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याने आम्ही पुन्हा जुन्या गावात जाणार आहोत.- तुकाराम मंगल काकडे, आदिवासी, बारुखेडा.