शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

मृत्यूच्या भीतीने ग्रामस्थ गाव सोडण्याच्या तयारीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:04 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या बारुखेडा व नागरतास या दोन आदिवासीबहुल गावांचे पुनवर्सन वारी हनुमान येथे करण्यात आले; परंतु तेथे या गावांमधील आदिवासी रहिवाशांना गावात आवश्यक असणार्‍या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. परिणामी, वारी हनुमान येथे पुनर्वसन झाल्यापासून या दोन गावातील लहान-मोठय़ा ७७ ग्रामस्थांचे मृत्यू झाल्याने गावात घबराट निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देबारुखेडा, नागरतास गावात पाच वर्षांत ७७ ग्रामस्थांचे मृत्यूपुनर्वसित गावात मूलभूत सुविधांचा अभाव

सदानंद खारोडे । लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या बारुखेडा व नागरतास या दोन आदिवासीबहुल गावांचे पुनवर्सन वारी हनुमान येथे करण्यात आले; परंतु तेथे या गावांमधील आदिवासी रहिवाशांना गावात आवश्यक असणार्‍या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. परिणामी, वारी हनुमान येथे पुनर्वसन झाल्यापासून या दोन गावातील लहान-मोठय़ा ७७ ग्रामस्थांचे मृत्यू झाल्याने गावात घबराट निर्माण झाली आहे.तेल्हारा तालुक्यातील बारुखेडा व नागरतास या दोन गावांचे पुनर्वसन सन २0११ ते २0१५ मध्ये वारी हनुमान येथे करण्यात आले. त्यावेळी वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सदर नागरिकांना पुनर्वसन झालेल्या गावात मूलभूत सोयी व उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्या पुनर्वसित प्रत्येक कुटुंबाला जमीन पाहून नियमाप्रमाणे मदत देण्यात येईल, असे सांगून सदर गावाचे पुनर्वसन केले; पण सध्या बारुखेडा व नागरतास या दोन्ही गावात मूलभूत सुविधा नाहीत.  बारुखेडा येथे दोन कूपनलिका असून, त्याही एक महिन्यापासून बंद आहेत. येथील ग्रामसेवक एक-एक महिना गावात येत नसल्याने आदिवासी नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळत नाही. येथे आरोग्यसेवाही उपलब्ध नाही. येथे कोणतेही कार्यालय नसल्याने येथे महिन्यातून एक वेळा नर्स येते. आजारी असलेल्यांना औषधे, गोळ्या मिळत नाहीत. येथील मुलांना चांगले शिक्षणही मिळत नाही. येथील रहिवासी बुडाबाबा बेढेकर यांची १६ एकर शेती होती. त्यांना केवळ आतापर्यंत केवळ दोन लाख रुपयांची शासकीय मदत मिळाली. अनेकांना घरासाठी अजूनही पैसा मिळाला नाही. येथील मजुरांना पुरेशी मजुरी मिळत नसल्याने अनेकांनी गाव सोडले. येथील रामकली बुडा बेठेकर या एकाच कुटुंबातील रामकली बेठेकर, बुडा बेठेकर, अशोक बुडा बेठेकर, सुकचंद बुडा, खुशी मुन्ना बेठेकर, लखन मुन्ना बेठेकर, अनुस मुन्ना बेठेकर या सात जणांचा अलीकडेच मृत्यू झाला. बारुखेड्यात पाच वर्षांत ६४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नागरतास येथे १३ लोकांचा मृत्यू झाला. सदर प्रकारामुळे दोन्ही गावांमधील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.आम्ही यापूर्वी नदीचे पाणी पित होतो, तेव्हा हा प्रकार नव्हता; मात्र येथे आल्यानंतर कूपनलिकेचे पाणी पित असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे विनायक मंगल काकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यामुळे आम्ही येथे वास्तव्य केल्यास येत्या काही दिवसांत एकही आदिवासी जिवंत राहणार नसल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. आम्हाला तत्कालीन शासकीय अधिकार्‍यांनी वेगवेगळी आमिषे दाखवून गाव सोडण्यास बाध्य केले; परंतु या दोन्ही गावात शासनाने मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या नसल्याने दोन्ही गावातील आदिवासी बांधव पुढील महिन्यात जुन्या गावातच मुक्कामी जाणार असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. 

शासनाने पुनर्वसित गावात आरोग्यसेवा, रोजगार, ग्रामपंचायत व पिण्यास चांगले पाणी उपलब्ध करून दिले नाही. परिणामी, या पुनर्वसित गावामध्ये पाच वर्षांत ६४ आदिवासी ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याने आम्ही पुन्हा जुन्या गावात जाणार आहोत.- तुकाराम मंगल काकडे, आदिवासी, बारुखेडा.