शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

VIDEO : शेतकरी बचतगटाने केले २,५०० क्विंटल बिजोत्पादन !

By admin | Updated: October 19, 2016 15:40 IST

दर्जेदार बियाणे निर्मितीसाठी विदर्भातील शेतक-यांनी त्यांच्या शेतावरच ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम घेणे सुरू केले आहे

राजरत्न सिरसाट, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १९ -  दर्जेदार बियाणे निर्मितीसाठी विदर्भातील शेतक-यांनी त्यांच्या शेतावरच ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम घेणे सुरू  केले आहे. वाशिम जिल्हयातील बालखेडा येथील शेतकरी बचत गटाने (शेतकरी कंपनी )विविध पिकांचे २,५०० क्विंटल बियाणे निर्मिती केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित शेतकरी शिवार फेरीत ही बियाणे विक्रीस ठेवण्यात आली आहेत. शेतक-यांचा या बियाणे खरेदीस चांगला प्रतिसाद मिळत आहेत.
  शेतक-यांनी त्यांच्या शेतावरच दर्जेदार बिजोत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मागीलवर्षी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम राबविला होता. विदर्भातील शेतकरी गटांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शेतकरी बचत गटांनी खरीप पिकांचे बियाणे यावर्षी त्यांच्या शेतावरच निर्माण केले आहे. बालखेडा (ता.रिसोड,जि.वाशिम) येथील श्री. बालनाथ शेतकरी कृषी विज्ञान मंडळाने रब्बी हंगामासाठी २ हजार क्विंटल ‘जॅकी’ हरबरा बियाण्यांचे बिजोत्पादन घेतले आहे. यामध्ये १,५०० क्विंटल पायाभूत तर ५०० क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा समावेश आहे. ५०० क्विंटल रब्बी ज्वारी तर ३० क्विंटल  रब्बी गव्हाचे पायाभूत बियाण्याचेही बिजोत्पादन घेण्यात आले आहे.  
 राज्यातील शेतकरी गटाचे संघात रू पांतर करण्यात येत असून, बाजाराभिमुख व्यवस्थापनासाठी शेतकरी गटाच्या कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यासाठी व्यावसायिक विकास आराखड्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी भांडवल उभारणी करण्यासाठीचे पाऊल उचलण्यात आले आहे.जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राज्यात पणन मंडळाकडून राबविण्यात येत आहे. शेतक-यांनी आता बाजाराभिमुख पिके घ्यावीत, यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या कंपन्या स्थापन झाल्या आहेत. त्या कंपन्यांनी या पद्धतीने नियोजन केले असून, खेडे गाव व शहर असे दोन भाग पाडले आहेत. खेडे गावात शेतमाल गोळा करायचा आणि तो शहरात विकायचा, यासाठी दोन वेगवेगळी केंद्रं तयार करण्यात आली आहेत. तसेच कृषी विभाग व कृषी विद्यापीठाच्या समन्वयातून ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत या कार्यक्रमाला आर्थिक पाठबळ उभे केले जात आहे.
 
-  खरीप बिजोत्पादन कार्यक्रमानंत रब्बी पिकांचे बिजोत्पादन घेण्यात आले आहे. रब्बी हंगामात विदर्भात हरबरा पीक अधिक घेतले जात असल्याने दर्जेदार हरबरा बियाणे निर्माण करण्यात आले आहेत.शेतकºयांचा बियाणे खरेदीस चांगला प्रतिसाद आहे.
शे.महमूद, व्यवस्थापक, श्री.बालनाथ कृषी विज्ञान मंडळ, बालखेड, वाशिम.