शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : शेतकरी बचतगटाने केले २,५०० क्विंटल बिजोत्पादन !

By admin | Updated: October 19, 2016 15:40 IST

दर्जेदार बियाणे निर्मितीसाठी विदर्भातील शेतक-यांनी त्यांच्या शेतावरच ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम घेणे सुरू केले आहे

राजरत्न सिरसाट, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १९ -  दर्जेदार बियाणे निर्मितीसाठी विदर्भातील शेतक-यांनी त्यांच्या शेतावरच ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम घेणे सुरू  केले आहे. वाशिम जिल्हयातील बालखेडा येथील शेतकरी बचत गटाने (शेतकरी कंपनी )विविध पिकांचे २,५०० क्विंटल बियाणे निर्मिती केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित शेतकरी शिवार फेरीत ही बियाणे विक्रीस ठेवण्यात आली आहेत. शेतक-यांचा या बियाणे खरेदीस चांगला प्रतिसाद मिळत आहेत.
  शेतक-यांनी त्यांच्या शेतावरच दर्जेदार बिजोत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मागीलवर्षी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम राबविला होता. विदर्भातील शेतकरी गटांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शेतकरी बचत गटांनी खरीप पिकांचे बियाणे यावर्षी त्यांच्या शेतावरच निर्माण केले आहे. बालखेडा (ता.रिसोड,जि.वाशिम) येथील श्री. बालनाथ शेतकरी कृषी विज्ञान मंडळाने रब्बी हंगामासाठी २ हजार क्विंटल ‘जॅकी’ हरबरा बियाण्यांचे बिजोत्पादन घेतले आहे. यामध्ये १,५०० क्विंटल पायाभूत तर ५०० क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा समावेश आहे. ५०० क्विंटल रब्बी ज्वारी तर ३० क्विंटल  रब्बी गव्हाचे पायाभूत बियाण्याचेही बिजोत्पादन घेण्यात आले आहे.  
 राज्यातील शेतकरी गटाचे संघात रू पांतर करण्यात येत असून, बाजाराभिमुख व्यवस्थापनासाठी शेतकरी गटाच्या कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यासाठी व्यावसायिक विकास आराखड्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी भांडवल उभारणी करण्यासाठीचे पाऊल उचलण्यात आले आहे.जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राज्यात पणन मंडळाकडून राबविण्यात येत आहे. शेतक-यांनी आता बाजाराभिमुख पिके घ्यावीत, यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या कंपन्या स्थापन झाल्या आहेत. त्या कंपन्यांनी या पद्धतीने नियोजन केले असून, खेडे गाव व शहर असे दोन भाग पाडले आहेत. खेडे गावात शेतमाल गोळा करायचा आणि तो शहरात विकायचा, यासाठी दोन वेगवेगळी केंद्रं तयार करण्यात आली आहेत. तसेच कृषी विभाग व कृषी विद्यापीठाच्या समन्वयातून ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत या कार्यक्रमाला आर्थिक पाठबळ उभे केले जात आहे.
 
-  खरीप बिजोत्पादन कार्यक्रमानंत रब्बी पिकांचे बिजोत्पादन घेण्यात आले आहे. रब्बी हंगामात विदर्भात हरबरा पीक अधिक घेतले जात असल्याने दर्जेदार हरबरा बियाणे निर्माण करण्यात आले आहेत.शेतकºयांचा बियाणे खरेदीस चांगला प्रतिसाद आहे.
शे.महमूद, व्यवस्थापक, श्री.बालनाथ कृषी विज्ञान मंडळ, बालखेड, वाशिम.