शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : शेतकरी बचतगटाने केले २,५०० क्विंटल बिजोत्पादन !

By admin | Updated: October 19, 2016 15:40 IST

दर्जेदार बियाणे निर्मितीसाठी विदर्भातील शेतक-यांनी त्यांच्या शेतावरच ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम घेणे सुरू केले आहे

राजरत्न सिरसाट, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १९ -  दर्जेदार बियाणे निर्मितीसाठी विदर्भातील शेतक-यांनी त्यांच्या शेतावरच ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम घेणे सुरू  केले आहे. वाशिम जिल्हयातील बालखेडा येथील शेतकरी बचत गटाने (शेतकरी कंपनी )विविध पिकांचे २,५०० क्विंटल बियाणे निर्मिती केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित शेतकरी शिवार फेरीत ही बियाणे विक्रीस ठेवण्यात आली आहेत. शेतक-यांचा या बियाणे खरेदीस चांगला प्रतिसाद मिळत आहेत.
  शेतक-यांनी त्यांच्या शेतावरच दर्जेदार बिजोत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मागीलवर्षी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम राबविला होता. विदर्भातील शेतकरी गटांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शेतकरी बचत गटांनी खरीप पिकांचे बियाणे यावर्षी त्यांच्या शेतावरच निर्माण केले आहे. बालखेडा (ता.रिसोड,जि.वाशिम) येथील श्री. बालनाथ शेतकरी कृषी विज्ञान मंडळाने रब्बी हंगामासाठी २ हजार क्विंटल ‘जॅकी’ हरबरा बियाण्यांचे बिजोत्पादन घेतले आहे. यामध्ये १,५०० क्विंटल पायाभूत तर ५०० क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा समावेश आहे. ५०० क्विंटल रब्बी ज्वारी तर ३० क्विंटल  रब्बी गव्हाचे पायाभूत बियाण्याचेही बिजोत्पादन घेण्यात आले आहे.  
 राज्यातील शेतकरी गटाचे संघात रू पांतर करण्यात येत असून, बाजाराभिमुख व्यवस्थापनासाठी शेतकरी गटाच्या कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यासाठी व्यावसायिक विकास आराखड्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी भांडवल उभारणी करण्यासाठीचे पाऊल उचलण्यात आले आहे.जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राज्यात पणन मंडळाकडून राबविण्यात येत आहे. शेतक-यांनी आता बाजाराभिमुख पिके घ्यावीत, यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या कंपन्या स्थापन झाल्या आहेत. त्या कंपन्यांनी या पद्धतीने नियोजन केले असून, खेडे गाव व शहर असे दोन भाग पाडले आहेत. खेडे गावात शेतमाल गोळा करायचा आणि तो शहरात विकायचा, यासाठी दोन वेगवेगळी केंद्रं तयार करण्यात आली आहेत. तसेच कृषी विभाग व कृषी विद्यापीठाच्या समन्वयातून ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत या कार्यक्रमाला आर्थिक पाठबळ उभे केले जात आहे.
 
-  खरीप बिजोत्पादन कार्यक्रमानंत रब्बी पिकांचे बिजोत्पादन घेण्यात आले आहे. रब्बी हंगामात विदर्भात हरबरा पीक अधिक घेतले जात असल्याने दर्जेदार हरबरा बियाणे निर्माण करण्यात आले आहेत.शेतकºयांचा बियाणे खरेदीस चांगला प्रतिसाद आहे.
शे.महमूद, व्यवस्थापक, श्री.बालनाथ कृषी विज्ञान मंडळ, बालखेड, वाशिम.