शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

विदर्भात लागले पहिले ‘गार रोधक’ यंत्र

By admin | Updated: March 24, 2015 00:31 IST

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास मिळणार बळ; खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील कास्तकाराचा प्रयोग.

अनिल गवई / खामगाव (जि. बुलडाणा): नैसर्गिक आपत्तीमुळे शेती उत्पादनात वारंवार घट होत असल्याने खामगाव तालुक्यातील प्रगतीशील कास्तकार दादाराव हटकर यांनी आपल्या शेतात ह्यगार रोधकह्ण यंत्र (स्केलर वेव्ह जनरेटर) बसविले आहे. गारांचे पावसात रुपांतर झाल्याने या यंत्रामुळे २८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान आलेल्या नैसर्गिक आपत्तीपासून या शेतकर्‍याच्या शेतीतील शेकडो एकरावरील पिकांचे नुकसान टळले आहे. विदर्भातील शेतीत प्रथमच हा प्रयोग करण्यात आला आहे. स्कॅलर वेव्ह जनरेटर या यंत्रणेत स्कॅलर लहरी आकाशात सोडल्या जातात. गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीच्यावेळी या यंत्राची ढगाच्या दिशेने सेटींग केल्यास गारा तयार होण्याची प्रक्रीया थांबविता येते. तसेच या यंत्रामुळे संत्र्याच्या आकारातील गारांचे अतिशय लहान गारांमध्ये रुपांतर होते. याशिवाय पावसाच्या वेगावर नियंत्रण मिळविता येणे शक्य होते. या बहुपयोगी यंत्राबाबत माहिती मिळाल्यानंतर दादाराव हटकर यांनी पुणे येथील शास्त्रज्ञांकडून ड्रिझलर (स्कॅलर वेव्ह जनरेटर) यंत्राबाबत बोलणी करुन गत महिन्यातच हे यंत्र आपल्या हिवरखेड शिवारातील शेतात बसविले. या यंत्रामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या गारपिटीवर नियंत्रण मिळविल्याचा अनुभव आपण घेतला असल्याचे दादाराव हटकर यांचे बंधू रमेश हटकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.*यंत्राला विजेची आवश्यकता नाहीस्कॅलर वेव्ह जनरेटर या यंत्रात तांबे, अँल्युमिनियम, लोखंड यासारख्या धातुंचा वापर केला आहे. हे यंत्र धातू विश्‍वातील स्कॅलर एनर्जी शोषून घेतात. या यंत्रासाठी विजेची आवश्यकता नाही. यंत्रांची वायर जमिनीला जोडली असता यंत्र सुरू होते. वजन ५0 किलोपर्यंत असल्यामुळे हे यंत्र हलविण्यास सोपे आहे. लहरी निघणार्‍या सर्व दिशेने पाईप फिरविता येत असल्याने हाताळण्यास हे यंत्र अतिशय सुलभ आहे.*गारांवर नियंत्रण मिळविता येतेहे यंत्र चालू केल्यानंतर ढगांची दिशा, वेग याचा अंदाज घेवून यंत्राची दिशा ठरवता येते. यंत्राच्या नळीतून स्कॅलर लहरी निघून आकाशात जातात. तेथे ढगांबरोबर अभिक्रिया झाल्यानंतर छोटे ढग विरघळतात व मोठय़ा ढगांचा भाग होवून जातात. त्यामुळे मोठय़ा ढगांचा आकार वाढतो. ढगांचा विद्युत भार वाढतो. गारा पडणार्‍या दिशेने यंत्र केल्यास ढग विरळ होतो. त्यामुळे गारांवर नियंत्रण मिळविता येते.