शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

विदर्भात तुरळक पावसाची शक्यता !

By admin | Updated: September 22, 2014 00:20 IST

परतीच्या पावसाला वातावरण अनुकूल.

अकोला : महाराष्ट्राच्या पूर्व भागात वार्‍याची दिशा बदलून, वायव्येकडून होत आहे. त्यामुळे परतीच्या पावसासाठी वातावरण अनुकूल होत आहे. सध्या राजस्थानमध्ये पाऊस परतीला सुरुवात झाली असल्याचे वातावरण आहे. असे असले तरी येत्या २४ तासांत विदर्भात तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.शनिवारी सकाळी ८.३0 वाजेपर्यंत वायव्य बंगालचा उपसागर आणि ओडिशाच्या किनार्‍यालगत असलेल्या पश्‍चिम -मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून, ते आता वायव्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या गंगेय पश्‍चिम बंगाल, ओडिशा, दक्षिण आंध्र प्रदेशच्या तटीय किनारपट्टी व पश्‍चिम मध्य बंगालच्या उपसागरावर आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत कोकण-गोवा व मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.दरम्यान, शनिवार सकाळी ८.३0 वाजता विदर्भातील भामरागड व एटापल्ली येथे प्रत्येकी ४ सेंमी पावसाची नोंद झाली आहे. देवरी येथे ३ सेंमी, मुलचेरा २ सेंमी, अहिरी, कोरची, धानोरा, गोंडपिंपरी, मोताळा, चंद्रपूर व खांरग येथे प्रत्येकी १ सेंमी पावसाची नोंद झाली आहे. उत्तर भारताच्या पश्‍चिम भागात म्हणजेच राजस्थानच्या भागातून प्रथम मान्सून बाहेर पडणार असून, दक्षिण दिशेकडून येण्यास सुरुवात होईल. त्यामुळे राजस्थानातील पाऊस थांबेल आणि पुढे सरकेल. सध्या राजस्थानच्या बर्‍याच भागातील पावसाचे वातावरण मोकळे झाले आहे. हेच परतीच्या पावसाचे लक्षण असल्याचे जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगीतले.