शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम विदर्भात वृक्षसंवर्धनाचे प्रमाण घटले

By admin | Updated: August 21, 2015 22:59 IST

तीन वर्षात जिवंत झाडांचे घटते प्रमाण चिंताजनक.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा) : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी राज्यामध्ये २0१२-१३ पासून शासनाने ५00 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्यानुसार वृक्ष लागवडीचे उदिष्ट साध्य करण्यासाठी राज्यभर प्रयत्नही होत आहेत; परंतू पश्‍चिम विदर्भात जिवंत वृक्षांचे प्रमाण वर्षाकाठी २0 ते २५ लाखाने घसरत असून, वृक्षसंवर्धनाचे घटते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. राज्यात वनाच्छादीत क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २0 टक्क्यांच्या जवळपास आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी हे प्रमाण कमीत कमी ३३ टक्क्यांपर्यंत असणे गरजेचे आहे; परंतु दिवसेंदिवस अवैध वृक्षतोड वाढत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. परिणामी पावसाची अनियमीतता, ग्रामीण व शहरी भागात वायू, ध्वनी व जलप्रदूषणाची तिव्रता वाढणे यासारखी भयावह संकटं उभी ठाकली आहेत. अशा संकटांना आळा घालण्यासाठी, तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी शासनाने २0१२-१३ पासून पाच वर्षांकरीता ५00 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय २0११ साली घेतला होता. त्यानुसार राज्यातील प्रत्येक विभागास वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही देण्यात आले होते, ते उद्दिष्ट साध्य करताना वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्षच होत गेले. वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत पश्‍चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांमध्ये सन २0१२-१३ मध्ये ८७ लाख झाडे जिवंत होती. सन २0१३-१४ मध्ये जिवंत झाडांचे प्रमाण सुमारे २७ लाखांनी कमी झाले. २0१४-१५ मध्ये पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण २३ लाखांनी घटले. सलग तीन वर्षे जिवंत झाडांचे प्रमाण घटल्याने, वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष संवर्धनही काळाची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.

*वृक्ष लागवडीचे प्रमाणही कमीच!

        विभागीय महसूल आयुक्तांच्या अहवालानुसार वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत अमरावती विभागात २0१२-१३ मध्ये १ कोटी ४४ लाख वृक्ष लागवड करण्यात आली होती. सन २0१३-१४ मध्ये १ कोटी १७ लाख वृक्ष लागवड झाली. २0१४-१५ मध्ये केवळ ५१ लाख वृक्ष लागवड करण्यात आली. त्यामुळे वृक्षसंवर्धनाबरोबरच वृक्षलागवडीचे प्रमाणही पश्‍चिम विदर्भात दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.