शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पश्‍चिम विदर्भात वृक्षसंवर्धनाचे प्रमाण घटले

By admin | Updated: August 21, 2015 22:59 IST

तीन वर्षात जिवंत झाडांचे घटते प्रमाण चिंताजनक.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा) : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी राज्यामध्ये २0१२-१३ पासून शासनाने ५00 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्यानुसार वृक्ष लागवडीचे उदिष्ट साध्य करण्यासाठी राज्यभर प्रयत्नही होत आहेत; परंतू पश्‍चिम विदर्भात जिवंत वृक्षांचे प्रमाण वर्षाकाठी २0 ते २५ लाखाने घसरत असून, वृक्षसंवर्धनाचे घटते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. राज्यात वनाच्छादीत क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २0 टक्क्यांच्या जवळपास आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी हे प्रमाण कमीत कमी ३३ टक्क्यांपर्यंत असणे गरजेचे आहे; परंतु दिवसेंदिवस अवैध वृक्षतोड वाढत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. परिणामी पावसाची अनियमीतता, ग्रामीण व शहरी भागात वायू, ध्वनी व जलप्रदूषणाची तिव्रता वाढणे यासारखी भयावह संकटं उभी ठाकली आहेत. अशा संकटांना आळा घालण्यासाठी, तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी शासनाने २0१२-१३ पासून पाच वर्षांकरीता ५00 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय २0११ साली घेतला होता. त्यानुसार राज्यातील प्रत्येक विभागास वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही देण्यात आले होते, ते उद्दिष्ट साध्य करताना वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्षच होत गेले. वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत पश्‍चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांमध्ये सन २0१२-१३ मध्ये ८७ लाख झाडे जिवंत होती. सन २0१३-१४ मध्ये जिवंत झाडांचे प्रमाण सुमारे २७ लाखांनी कमी झाले. २0१४-१५ मध्ये पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण २३ लाखांनी घटले. सलग तीन वर्षे जिवंत झाडांचे प्रमाण घटल्याने, वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष संवर्धनही काळाची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.

*वृक्ष लागवडीचे प्रमाणही कमीच!

        विभागीय महसूल आयुक्तांच्या अहवालानुसार वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत अमरावती विभागात २0१२-१३ मध्ये १ कोटी ४४ लाख वृक्ष लागवड करण्यात आली होती. सन २0१३-१४ मध्ये १ कोटी १७ लाख वृक्ष लागवड झाली. २0१४-१५ मध्ये केवळ ५१ लाख वृक्ष लागवड करण्यात आली. त्यामुळे वृक्षसंवर्धनाबरोबरच वृक्षलागवडीचे प्रमाणही पश्‍चिम विदर्भात दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.