शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

पश्‍चिम विदर्भात वृक्षसंवर्धनाचे प्रमाण घटले

By admin | Updated: August 21, 2015 22:59 IST

तीन वर्षात जिवंत झाडांचे घटते प्रमाण चिंताजनक.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा) : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी राज्यामध्ये २0१२-१३ पासून शासनाने ५00 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. त्यानुसार वृक्ष लागवडीचे उदिष्ट साध्य करण्यासाठी राज्यभर प्रयत्नही होत आहेत; परंतू पश्‍चिम विदर्भात जिवंत वृक्षांचे प्रमाण वर्षाकाठी २0 ते २५ लाखाने घसरत असून, वृक्षसंवर्धनाचे घटते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. राज्यात वनाच्छादीत क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २0 टक्क्यांच्या जवळपास आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी हे प्रमाण कमीत कमी ३३ टक्क्यांपर्यंत असणे गरजेचे आहे; परंतु दिवसेंदिवस अवैध वृक्षतोड वाढत असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. परिणामी पावसाची अनियमीतता, ग्रामीण व शहरी भागात वायू, ध्वनी व जलप्रदूषणाची तिव्रता वाढणे यासारखी भयावह संकटं उभी ठाकली आहेत. अशा संकटांना आळा घालण्यासाठी, तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी शासनाने २0१२-१३ पासून पाच वर्षांकरीता ५00 कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय २0११ साली घेतला होता. त्यानुसार राज्यातील प्रत्येक विभागास वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही देण्यात आले होते, ते उद्दिष्ट साध्य करताना वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्षच होत गेले. वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत पश्‍चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यांमध्ये सन २0१२-१३ मध्ये ८७ लाख झाडे जिवंत होती. सन २0१३-१४ मध्ये जिवंत झाडांचे प्रमाण सुमारे २७ लाखांनी कमी झाले. २0१४-१५ मध्ये पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण २३ लाखांनी घटले. सलग तीन वर्षे जिवंत झाडांचे प्रमाण घटल्याने, वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष संवर्धनही काळाची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.

*वृक्ष लागवडीचे प्रमाणही कमीच!

        विभागीय महसूल आयुक्तांच्या अहवालानुसार वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत अमरावती विभागात २0१२-१३ मध्ये १ कोटी ४४ लाख वृक्ष लागवड करण्यात आली होती. सन २0१३-१४ मध्ये १ कोटी १७ लाख वृक्ष लागवड झाली. २0१४-१५ मध्ये केवळ ५१ लाख वृक्ष लागवड करण्यात आली. त्यामुळे वृक्षसंवर्धनाबरोबरच वृक्षलागवडीचे प्रमाणही पश्‍चिम विदर्भात दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.