शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील शेतक-यांना मिळणार सघन सिंचन योजनेचा लाभ!

By admin | Updated: September 10, 2015 01:49 IST

केंद्र सरकारने ३२00 कोटी रुपयांची पाच वर्षांसाठी तरतूद.

अकोला : विदर्भात विदर्भ सघन सिंचन विकास प्रकल्प (व्हीआयआयडीपी) योजना राबविण्यात येत असून, या योजनेला राबविण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षी ३२00 कोटी रुपयांची पाच वर्षांसाठी तरतूद केली आहे. विदर्भातील शेतकर्‍यांना याचा लाभ घेता यावा, यासाठी उर्वरित महाराष्ट्र व विदर्भ असे योजनेचे स्वरू प करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत मूलस्थानी जलसंधारण कॅनॉल बनवणे व देखभाल याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. पिकांना संरक्षित ओलित करण्यासाठी, केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत संरक्षित ओलित करण्यासाठी ठिबक, तुषार संचाची खरेदी करण्यासाठी गेल्या सात-आठ वर्षांपासून शेतकर्‍यांना अनुदान दिले जात आहे. या योजेनचा शेतकर्‍यांना चांगला लाभ होत असून, पाण्याचा वापर कमी होत असल्याने पाण्याची बचत होत आहे. सुरुवातीला संपूर्ण राज्यात ही योजना राबविण्यात येत होती. तथापि विदर्भातील शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ होण्यासाठी तीन वर्षांपासून ही योजना विभागण्यात आली आहे. विदर्भात विदर्भ सघन सिंचन विकास प्रकल्प या नावाने, तर उर्वरित राज्यासाठी राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन चळवळ (एनएमएमआय) या नावाने ही योजना राबविली जात आहे. विदर्भात ही योजना सुरू झाली; परंतु शेतकर्‍यांना त्यांचे मंजूर अनुदान वेळेवर मिळत नसल्याने विदर्भातील शेतकरी त्रस्त आहे. उर्वरित महाराष्ट्रातील एनएमएएमआय योजनेचे अनुदान वेळेवर उपलब्ध होत असल्याने विदर्भाला स्वतंत्र योजना देऊन फायदा काय, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. सलग पाच वर्षांंपासून पावसाच्या अनियमिततेचा फटका विदर्भातील शेतकरी सहन करीत आहे. पाऊसच नसल्याने पीक उत्पादन घटले आहे. काही शेतकर्‍यांनी शेततळे व पॉड आदी माध्यमातून पाणी संकलित केले आहे. परंतु, हे पाणी पिकांना देण्यासाठी संचाची व्यवस्था नाही आणि बाजारातून ठिबक, तुषार संच खरेदी करण्याची ऐपत नसल्याने शेतकर्‍यांना पाणी असून, पिकांना देता येत नसल्याचे चित्र आहे.