शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

दोनशेवर संगणक परिचालक संपावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:50 IST

लाखपुरी : मागील सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील दोनशेच्या वर संगणक परिचालक संपावर गेले आहेत. हे कर्मचारी ‘आपले सरकार’च्यामार्फत ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना ऑनलाइन सेवा देतात; परंतु सध्या हे कर्मचारी संपावर गेल्याने ग्रामपंचायत हद्दीतील ऑनलाइन कामे खोळंबली आहे. दरम्यान, याबाबत राज्य संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश मातळे यांनी जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन समस्या मांडल्या.

ठळक मुद्देजाचक अटींचा ठपका ऑनलाइन सेवा ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कलाखपुरी : मागील सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील दोनशेच्या वर संगणक परिचालक संपावर गेले आहेत. हे कर्मचारी ‘आपले सरकार’च्यामार्फत ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना ऑनलाइन सेवा देतात; परंतु सध्या हे कर्मचारी संपावर गेल्याने ग्रामपंचायत हद्दीतील ऑनलाइन कामे खोळंबली आहे. दरम्यान, याबाबत राज्य संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश मातळे यांनी जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन समस्या मांडल्या.राज्यातील ग्रामपंचायती ऑनलाइन करण्याच्या हेतूने आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ऑनलाइन सेवा कार्यरत करण्यात आली. ग्रामपंचायतमधील ‘संग्राम’ सॉफ्टवेअर बदलून ‘ई-ग्राम’ सॉफ्टवेअर कार्यान्वित केले. त्यामुळे नव्या सॉफ्टवेअरद्वारे हे संगणक कर्मचारी काम करीत होते. ‘संग्राम’ प्रकल्प संपल्यामुळे संग्राममधील सर्व संगणक परिचालकांना आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात सामावून घेण्यासंदर्भात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आश्‍वासने दिली होती; परंतु गेल्या सहा ते सात महिन्यांपासून राज्यातील २३ हजार संगणक ऑपरेटर कर्मचार्‍यांना मात्र वेतन मिळाले नसल्यामुळे त्यांची उपासमार सुरू आहे. याच संगणक परिचालकांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरून दिले आहेत. या संगणक परिचालकांसाठी ग्रामविकास विभागाने ‘टास्क कन्फर्मेशन’ ही जाचक अट तसेच अन्य अटी लागू केल्या असल्यामुळे या कर्मचार्‍यांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. त्यामुळे ‘टास्क कन्फर्मेशन’ची जाटक अट रद्द करून राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे कर्मचार्‍यांना निश्‍चित सहा हजार रुपये वेतन देण्यात यावे, प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वेतन द्यावे, संग्राम प्रकल्पामध्ये कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद पातळीवरील सर्व संगणक परिचालकांना सामावून घेण्यात यावे, नागिरकांना देण्यात येणार्‍या दाखल्यांमागे प्रोत्साहनपर ६0 टक्के कमिशन द्यावे, महाऑनलाइनकडील डिसेंबर २0१५ पासून थकीत मानधन मिळावे, अशा विविध मागण्या या निवेदनात आहेत.

राहिलेल्या संगणक परिचालकांना शासनाने तत्काळ नियुक्ती द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू.अविनाश मातळे,जिल्हाध्यक्ष, संगणक परिचालक संघटना, अकोला.-