शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

कामाच्या व्यस्ततेत मिळेल तेवढा वेळ कुटुंबीयांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:17 IST

अकोला : जिल्हा परिषदेंतर्गत प्रशासकीय कामकाजासोबतच ग्रामीण भागातील अडचणींचे निवारण आणि कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजाणी कामाच्या ...

अकोला : जिल्हा परिषदेंतर्गत प्रशासकीय कामकाजासोबतच ग्रामीण भागातील अडचणींचे निवारण आणि कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजाणी कामाच्या व्यस्ततेत कुटुंबीयांसोबत राहण्यासाठी वेळ अपुरा पडत असला, तरी कामाला प्राधान्य देऊन मिळेल तेवढा वेळ कुटुंबीयांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न असतो, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सौरभ कटियार यांनी व्यक्त केले.

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील मूळचे रहिवासी असलेले सौरभ कटियार गतवर्षी जुलैमध्ये अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले. जिल्हा परिषदेंतर्गत दैनंदिन प्रशासकीय कामकाज, शासनाच्या विविध निर्णय, आदेश आणि निर्देशांची अंमलबजावणी, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि विभागप्रमुख अधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवत जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध योजना आणि विकासकामांची अंमलबजावणी व नियंत्रण ठेवण्याचे काम मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करावे लागते. यासोबतच कोरोना काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी, ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या आणि अडचणींचे निवारण करणे, जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी करणे, आढावा बैठका, कोरोना विषयक मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी आदी प्रकारची कामे करतानाच जनतेच्या भेटीसाठी वेळ द्यावा लागतो. कार्यालयातील काम आटोपल्यानंतर महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी, तातडीच्या कामांच्या फाइल्स निकाली काढणे आदी प्रकारची कामे रात्रीच्या वेळी घरीच हाताळाव्या लागत आहेत. कोरोना काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध समस्या आणि अडचणी निवारणासाठी रात्रीच्या वेळीदेखील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना काम करावे लागत आहे. त्यानुषंगाने कामाच्या व्यस्ततेत कुटुंबीयांना पाहिजे तेवढा वेळ देणे शक्य होत नाही. मात्र, आवश्यक असलेली कामे पूर्ण केल्यानंतर मिळेल तेवढा वेळ कुटुंबीयांसोबत आनंदाने घालविण्याचा प्रयत्न सुरू असतो. कर्तव्य पूर्ण करून मिळालेला वेळ शेअर केल्याचे कुटुंबीयांनाही समाधान असते, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना कोरोना काळात सौरभ कटियार कामात व्यस्त असतात. ग्रामीण भागातील अडचणी निवारणासंदर्भात त्यांचे रात्रंदिवस काम सुरू असते. वेगवेगळ्या समस्या, नवनवीन अडचणी निकाली काढण्याचे कर्तव्य पूर्ण करण्याच्या व्यस्ततेतूनही मिळालेला वेळ ते आमच्याशी आनंदाने शेअर करतात याचे आम्हाला समाधान आहे.

-डाॅ. माेनिका सौरभ कटियार (पत्नी)

आइ- वडिलांची भेट वर्षातून दोनदाच!

कोरोना काळात कामाची व्यस्तता वाढल्याच्या पार्श्वभूमीवर लखनऊ येथे राहणाऱ्या आई- वडिलांची गेल्या वर्षभरात दोनदाच भेट होऊ शकली. दोन- तीन दिवसांआड भ्रमणध्वनीद्वारे त्यांच्याशी संवाद साधून विचारपूस करीत असतो, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी सौरभ कटियार यांनी सांगितले.

....................फोटो...........................