शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
5
धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
6
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
7
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
8
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
9
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
10
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
12
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
13
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
14
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
15
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
16
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
17
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
18
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
19
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
20
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात

भरधाव ट्रकने विद्यार्थिनीस चिरडले

By admin | Updated: November 21, 2015 01:50 IST

अकोला रेल्वे मालधक्क्यासमोरील घटना, ट्रक जप्त, चालक फरार.

अकोला: रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या मालधक्क्यासमोरून जात असलेल्या एका भरधाव ट्रकने शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीस चिरडले. या अपघातात १९ वर्षीय विद्यार्थिनीचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेनंतर काही क्षणातच ट्रकचालक फरार झाला. रामदासपेठ पोलिसांनी ट्रकसह अपघाताग्रस्त दोन्ही वाहने जप्त केली. गोरक्षण रोडवरील सहकारनगरमधील रहिवासी आरती ईश्‍वरसिंह ठाकूर (१९) ही शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ती शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास एमएच ३0 एसी ८३९९ क्रमांकाच्या दुचाकीने रेल्वे स्टेशनसमोरील मालधक्का परिसरातून जात असताना पाठीमागून येणार्‍या, आकोट येथे संत्री भरण्यासाठी जात असलेल्या जीजे १९ व्ही ७२४४ क्रमांकाच्या ट्रकने तिला जबर धडक दिली. या धडकेने विद्यार्थिनी दुचाकीसह खाली कोसळली. त्यानंतर भरधाव ट्रक विद्यार्थिनीच्या अंगावरून गेला. यामध्ये विद्यार्थिनीचा जागेवरच मृत्यू झाला. दीड महिन्याच्या कालावधीत भरधाव ट्रकमुळे झालेला हा दुसरा अपघात आहे. घटनेनंतर ट्रकचालक ट्रक सोडून घटनास्थळावरून फरार झाला. रामदासपेठ पोलिसांनी ट्रक व विद्यार्थिनीची दुचाकी जप्त करून हरीशचंद्र विक्रमसिंह कुशवाह यांच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम २७९, ३0४ नुसार गुन्हा दाखल केला. वाहतूक शाखेची खाबुगिरीही जबाबदार दीड महिन्यापूर्वी मध्यवर्ती बसस्थानकासमोर एका महिलेला भरधाव ट्रकने अशाच प्रकारे चिरडले होते. त्यानंतर शुक्रवारी आणखी एका विद्यार्थिनीस भरधाव ट्रकने चिरडले. शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरून बहुतांश ट्रक भरधाव जातात; मात्र त्याकडे जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचारी व अधिकारी ह्यअर्थह्णपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी केला. एका पॉइंटवरून ट्रक सोडण्यासाठी २00 ते ३00 रुपये वाहतूक पोलीस घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वाहतूक पोलिसांच्या खाबुगिरीसाठी शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचा येत असल्याचेही या घटनेवरून समोर आले आहे. मालधक्का तातडीने बंद करणार- जिल्हाधिकारी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का येथे जड वाहनांची मोठय़ा प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे अपघाताच्या घटना होतात. या पृष्ठभूमीवर मालधक्का बोरगाव किंवा शिवणी येथे स्थानांतरित करण्याच्या सूचना मध्य रेल्वेच्या विभागीय प्रबंधकांना महिनाभरापूर्वी देण्यात आल्या होत्या; मात्र अद्यापही मालधक्का हलविण्यात आला नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का तातडीने बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी शुक्रवारी सांगितले.