शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने विद्यार्थिनीस चिरडले

By admin | Updated: November 21, 2015 01:50 IST

अकोला रेल्वे मालधक्क्यासमोरील घटना, ट्रक जप्त, चालक फरार.

अकोला: रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या मालधक्क्यासमोरून जात असलेल्या एका भरधाव ट्रकने शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीस चिरडले. या अपघातात १९ वर्षीय विद्यार्थिनीचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेनंतर काही क्षणातच ट्रकचालक फरार झाला. रामदासपेठ पोलिसांनी ट्रकसह अपघाताग्रस्त दोन्ही वाहने जप्त केली. गोरक्षण रोडवरील सहकारनगरमधील रहिवासी आरती ईश्‍वरसिंह ठाकूर (१९) ही शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ती शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास एमएच ३0 एसी ८३९९ क्रमांकाच्या दुचाकीने रेल्वे स्टेशनसमोरील मालधक्का परिसरातून जात असताना पाठीमागून येणार्‍या, आकोट येथे संत्री भरण्यासाठी जात असलेल्या जीजे १९ व्ही ७२४४ क्रमांकाच्या ट्रकने तिला जबर धडक दिली. या धडकेने विद्यार्थिनी दुचाकीसह खाली कोसळली. त्यानंतर भरधाव ट्रक विद्यार्थिनीच्या अंगावरून गेला. यामध्ये विद्यार्थिनीचा जागेवरच मृत्यू झाला. दीड महिन्याच्या कालावधीत भरधाव ट्रकमुळे झालेला हा दुसरा अपघात आहे. घटनेनंतर ट्रकचालक ट्रक सोडून घटनास्थळावरून फरार झाला. रामदासपेठ पोलिसांनी ट्रक व विद्यार्थिनीची दुचाकी जप्त करून हरीशचंद्र विक्रमसिंह कुशवाह यांच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम २७९, ३0४ नुसार गुन्हा दाखल केला. वाहतूक शाखेची खाबुगिरीही जबाबदार दीड महिन्यापूर्वी मध्यवर्ती बसस्थानकासमोर एका महिलेला भरधाव ट्रकने अशाच प्रकारे चिरडले होते. त्यानंतर शुक्रवारी आणखी एका विद्यार्थिनीस भरधाव ट्रकने चिरडले. शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरून बहुतांश ट्रक भरधाव जातात; मात्र त्याकडे जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचारी व अधिकारी ह्यअर्थह्णपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी केला. एका पॉइंटवरून ट्रक सोडण्यासाठी २00 ते ३00 रुपये वाहतूक पोलीस घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वाहतूक पोलिसांच्या खाबुगिरीसाठी शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचा येत असल्याचेही या घटनेवरून समोर आले आहे. मालधक्का तातडीने बंद करणार- जिल्हाधिकारी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का येथे जड वाहनांची मोठय़ा प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे अपघाताच्या घटना होतात. या पृष्ठभूमीवर मालधक्का बोरगाव किंवा शिवणी येथे स्थानांतरित करण्याच्या सूचना मध्य रेल्वेच्या विभागीय प्रबंधकांना महिनाभरापूर्वी देण्यात आल्या होत्या; मात्र अद्यापही मालधक्का हलविण्यात आला नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का तातडीने बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी शुक्रवारी सांगितले.