शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने विद्यार्थिनीस चिरडले

By admin | Updated: November 21, 2015 01:50 IST

अकोला रेल्वे मालधक्क्यासमोरील घटना, ट्रक जप्त, चालक फरार.

अकोला: रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या मालधक्क्यासमोरून जात असलेल्या एका भरधाव ट्रकने शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीस चिरडले. या अपघातात १९ वर्षीय विद्यार्थिनीचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेनंतर काही क्षणातच ट्रकचालक फरार झाला. रामदासपेठ पोलिसांनी ट्रकसह अपघाताग्रस्त दोन्ही वाहने जप्त केली. गोरक्षण रोडवरील सहकारनगरमधील रहिवासी आरती ईश्‍वरसिंह ठाकूर (१९) ही शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ती शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास एमएच ३0 एसी ८३९९ क्रमांकाच्या दुचाकीने रेल्वे स्टेशनसमोरील मालधक्का परिसरातून जात असताना पाठीमागून येणार्‍या, आकोट येथे संत्री भरण्यासाठी जात असलेल्या जीजे १९ व्ही ७२४४ क्रमांकाच्या ट्रकने तिला जबर धडक दिली. या धडकेने विद्यार्थिनी दुचाकीसह खाली कोसळली. त्यानंतर भरधाव ट्रक विद्यार्थिनीच्या अंगावरून गेला. यामध्ये विद्यार्थिनीचा जागेवरच मृत्यू झाला. दीड महिन्याच्या कालावधीत भरधाव ट्रकमुळे झालेला हा दुसरा अपघात आहे. घटनेनंतर ट्रकचालक ट्रक सोडून घटनास्थळावरून फरार झाला. रामदासपेठ पोलिसांनी ट्रक व विद्यार्थिनीची दुचाकी जप्त करून हरीशचंद्र विक्रमसिंह कुशवाह यांच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम २७९, ३0४ नुसार गुन्हा दाखल केला. वाहतूक शाखेची खाबुगिरीही जबाबदार दीड महिन्यापूर्वी मध्यवर्ती बसस्थानकासमोर एका महिलेला भरधाव ट्रकने अशाच प्रकारे चिरडले होते. त्यानंतर शुक्रवारी आणखी एका विद्यार्थिनीस भरधाव ट्रकने चिरडले. शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरून बहुतांश ट्रक भरधाव जातात; मात्र त्याकडे जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचारी व अधिकारी ह्यअर्थह्णपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी केला. एका पॉइंटवरून ट्रक सोडण्यासाठी २00 ते ३00 रुपये वाहतूक पोलीस घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. वाहतूक पोलिसांच्या खाबुगिरीसाठी शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचा येत असल्याचेही या घटनेवरून समोर आले आहे. मालधक्का तातडीने बंद करणार- जिल्हाधिकारी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का येथे जड वाहनांची मोठय़ा प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे अपघाताच्या घटना होतात. या पृष्ठभूमीवर मालधक्का बोरगाव किंवा शिवणी येथे स्थानांतरित करण्याच्या सूचना मध्य रेल्वेच्या विभागीय प्रबंधकांना महिनाभरापूर्वी देण्यात आल्या होत्या; मात्र अद्यापही मालधक्का हलविण्यात आला नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का तातडीने बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी शुक्रवारी सांगितले.