शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
3
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
4
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
5
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
6
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
7
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
8
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
9
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
10
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
11
CSK स्टार मुरली विजयी दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
12
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
13
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
14
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
15
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
16
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
17
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
18
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
19
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
20
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!

कारवाईसाठी टोलवाटोलवी!

By admin | Updated: February 20, 2016 02:34 IST

केळीचे बियाणे वांझोटे निघाल्याचे प्रकरण; प्रशासनाकडून खच्चीकरणाचा शेतक-यांचा आरोप.

आकोट: केळीचे निकृष्ट व बोगस बियाणे देऊन फसवणूक झाल्याची तक्रार करूनही कृषी व पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करीत नसून, मानसिक खच्चीकरण करीत असल्याचा आरोप शेतकर्‍यांची केला आहे. शुक्रवारी ग्रामीणच्या ठाणेदारांनी शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. फसवणूक झाल्याची तक्रार आंबोडा येथील १२ शेतकर्‍यांनी ८ फेब्रुवारी रोजी आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली होती. पणज येथील रमेश आकोटकर यांच्यासह दोघांनी फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही अद्याप पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तक्रारीच्या अनुषंगाने १0 फेब्रुवारी रोजी केळी उत्पादक शेतकर्‍यांना आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये बोलाविण्यात आले. यावेळी ठाणेदार किशोर शेळके व तालुका कृषी अधिकारी मंगेश ठाकरे यांनी शेतकर्‍यांसोबत चर्चा केली. यावेळी शेतकरी समक्ष उपविभागीय कृषी अधिकारी यांना या प्रकरणाचा पीक पाहणी व बोगस बियाण्याबाबतचा तज्ज्ञ समितीचा अहवाल मागविण्याचे पत्र देण्यात आले. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडणार असल्याचे सांगण्यात आले होते. अहवाल प्राप्त झाल्यानंतरही पोलीस कारवाई का करीत नाहीत, असा सवाल शेतकर्‍यांमधून उपस्थित करण्यात येत आहे. कारवाईसाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.