शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

कारवाईसाठी टोलवाटोलवी!

By admin | Updated: February 20, 2016 02:34 IST

केळीचे बियाणे वांझोटे निघाल्याचे प्रकरण; प्रशासनाकडून खच्चीकरणाचा शेतक-यांचा आरोप.

आकोट: केळीचे निकृष्ट व बोगस बियाणे देऊन फसवणूक झाल्याची तक्रार करूनही कृषी व पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करीत नसून, मानसिक खच्चीकरण करीत असल्याचा आरोप शेतकर्‍यांची केला आहे. शुक्रवारी ग्रामीणच्या ठाणेदारांनी शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. फसवणूक झाल्याची तक्रार आंबोडा येथील १२ शेतकर्‍यांनी ८ फेब्रुवारी रोजी आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली होती. पणज येथील रमेश आकोटकर यांच्यासह दोघांनी फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही अद्याप पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तक्रारीच्या अनुषंगाने १0 फेब्रुवारी रोजी केळी उत्पादक शेतकर्‍यांना आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये बोलाविण्यात आले. यावेळी ठाणेदार किशोर शेळके व तालुका कृषी अधिकारी मंगेश ठाकरे यांनी शेतकर्‍यांसोबत चर्चा केली. यावेळी शेतकरी समक्ष उपविभागीय कृषी अधिकारी यांना या प्रकरणाचा पीक पाहणी व बोगस बियाण्याबाबतचा तज्ज्ञ समितीचा अहवाल मागविण्याचे पत्र देण्यात आले. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडणार असल्याचे सांगण्यात आले होते. अहवाल प्राप्त झाल्यानंतरही पोलीस कारवाई का करीत नाहीत, असा सवाल शेतकर्‍यांमधून उपस्थित करण्यात येत आहे. कारवाईसाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.