शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘अमृत’च्या माध्यमातून भूमिगत गटार योजनेवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: August 21, 2015 01:18 IST

शासनाचा निर्णय; ‘भूमिगत’चे ८२ कोटी ‘अमृत’मध्ये वळविले!

अकोला: शहरासाठी २00७-0८ मध्ये मंजूर झालेल्या भूमिगत गटार योजनेचा रखडलेला मार्ग 'अमृत'योजनेच्या माध्यमातून निकाली काढण्यावर गुरूवारी शासन दरबारी शिक्कामोर्तब झाले. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत भूमिगतचे ८२ कोटी रुपये ह्यअमृतह्णयोजनेत वळते करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेंतर्गत मनपाला केवळ ५ टक्के रकमेचा उर्वरित हिस्सा जमा करावा लागणार आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपाची एकहाती सत्ता आहे. शहर विकासाची रखडलेली कामे युती सरकारने तातडीने निकाली काढण्याची अकोलेकरांची अपेक्षा आहे. मनपात भाजप-सेना युतीच्या सत्ता स्थापनेला दहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी ठोस विकास कामांना अद्याप सुरुवातही झाली नसल्याचे चित्र आहे. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यातील ४0 शहरांचा 'अमृत'योजनेत समावेश केला. यामध्ये अकोला शहराचा समावेश असल्याने अकोलेकरांच्या आशा पल्लवित झाल्या. २00७-0८ मध्ये भूमिगत गटार योजनेसाठी मनपाला ५४ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यावेळी एकूण रकमेच्या १0 टक्के लोकवर्गणी मनपाने जमा करण्याची अट होती. ५४ कोटींचे व्याजाच्या रकमेसह ८२ कोटी रुपये मनपाकडे जमा आहेत. मध्यंतरी ह्यअमृतह्ण योजनेमध्ये ह्यभूमिगतह्णचा निधी वळती करण्याचा विचार शासनाने केला होता; परंतु ह्यअमृतह्णचे निकष आणि कालावधी लक्षात घेता, विशेष बाब म्हणून भूमिगत गटार योजनेलाच मंजुरी देण्यावर मनपातील सत्ताधार्‍यांनी एकमत केले होते; परंतु आता भूमिगत गटार योजनेचे ८२ कोटी रुपये 'अमृत'मध्ये वळते करून ही योजना पूर्णत्वास नेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेंतर्गत एकूण रकमेच्या ७५ टक्के रक्कम केंद्र शासनाकडून मिळणार आहे, तर राज्य शासन २0 टक्के रक्कम जमा करणार आहे. उर्वरित केवळ ५ टक्के हिस्सा मनपा प्रशासनाला जमा करावा लागणार आहे. बैठकीला प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, मजीप्राचे सचिव, आयुक्त सोमनाथ शेटे उपस्थित होते.