शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

‘स्वॅब’ देण्यासाठी व्यापाऱ्यांची उसळली गर्दी; टेस्टिंग किट संपल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:18 IST

शहरासह जिल्ह्यात काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे प्रशासकीय यंत्रणांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काेराेनाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २३ फेब्रुवारी ...

शहरासह जिल्ह्यात काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे प्रशासकीय यंत्रणांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काेराेनाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २३ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत लाॅकडाऊनचा आदेश जारी केला. त्यानंतर पुन्हा ८ मार्चपर्यंतचे आदेश निगर्मित करण्यात आले. यादरम्यान, नियमांचे पालन करण्याच्या अटीवर व्यापाऱ्यांना ठराविक मुदतीत व्यवसाय करण्याची मुभा द्यावी, असा रेटा व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे लावून धरला हाेता. ही बाब ध्यानात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी ५ मार्चपासून सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत दुकाने खुली करण्यासाेबतच व्यापारी व दुकानातील कामगारांना काेविड चाचणी बंधनकारक केली.

अहवाल मिळण्यास विलंब तरीही कारवाई

‘आरटीपीसीआर’च्या तुलनेत रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचा अहवाल सायंकाळपर्यंत प्राप्त हाेताे. परंतु चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने या अहवालास विलंब हाेत आहे. असे असतानाही मनपा व संयुक्त पथकांकडून दुकाने बंद करण्याची कारवाई केली जात असल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

आधी एक्सल शिट आता एसएमएस ग्राह्य

रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करणाऱ्या व्यापाऱ्यांना काही ठिकाणी एक्सल शिट देण्यात आली. परंतु हा कागद मनपा मान्य करणार नसल्याचा मुद्दा व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे उपस्थित केल्यानंतर चाचणी केल्यास एसएमएस ग्राह्य धरण्यावर जिल्हा प्रशासनाने संमती दिल्याची माहिती आहे.

संघटित व्यापारी वेठीस!

शहरातील संघटित व्यापाऱ्यांना काेराेना चाचणी अनिवार्य केली जात असतानाच दुसरीकडे रस्त्यालगत व्यवसाय करणारे लघु व्यावसायिक, फेरीवाल्यांना प्रशासनाने दुर्लक्षित केल्याचे चित्र आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्रीपासून ते साेमवारी सकाळपर्यंत संचारबंदीचा निर्णय लागू केला. व्यापाऱ्यांना शुक्रवारपासून दुकाने खुली करण्याची परवानगी दिल्यानंतर सकाळपासूनच दुकानांना सील लावण्याच्या कारवाईला प्रारंभ करण्यात आला. मनपा व महसूल प्रशासन साेमवारपर्यंत तग धरू शकले नसते का, यावर विचार करण्याची गरज आहे.

-किशाेर मांगटे पाटील, सचिव न्यू क्लाॅथ मार्केट असाेसिएशन

चाचणी केल्यानंतर अहवाल विलंबाने प्राप्त हाेत असल्याने व्यापाऱ्यांना माेबाईलद्वारे प्राप्त झालेला एसएमएस मनपाने ग्राह्य धरावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असता त्यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.

-नितीन खंडेलवाल, अध्यक्ष, विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्स, अकाेला

आम्ही २२ फेब्रुवारीपासून व्यापाऱ्यांना चाचणीसाठी वारंचार सूचना केल्या. चाचणी केल्यानंतर व्यापाऱ्यांना उद्या शनिवारपासून ताबडताेब कागदाेपत्री अहवाल देण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत.

-जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, अकाेला