वाशिम : पुसद येथून अपहरण झालेले तीन मुले स्थानिक रेल्वे स्टेशनवर गुरूवार सायंकाळी ४.३0 वाजता आढळूनआली. अपहृत मुलं व पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी शहरात अपहरण करणारी टोळी सक्रिय झाल्याची शंका व्यक्त होत आहे. पुसद तालुक्यातील आमदरी व धवसर या गावातील १२ ते १३ वर्षे वयोगटातील वैष्णव ज्ञानेश्वर गव्हाणे, अंगद गजानन भिसे व सतिष राजाराम खोकले या तीन मुलांचे बुधवारी अपहरण झाले होते. तिघांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सकाळी शाळेत जात असताना १0 वाजताच्या सुमारास एक मारोती व्हॅनमधील चालकांने त्यांना पुसदचा रस्ता विचारला. दरम्यान गाडीतील अज्ञात व्यक्तींनी त्या तिघांनापकडून त्यांचे हातपाय बांधले व गाडी सुसाट वेगाने पळविली. मात्र रात्रभर फिरुन फिरुन गाडी थांबल्यानंतर गाडीतले तिघेजण खाली उतरल्याची संधी साधून त्यांनी गाडीतून पळ काढला. गाडीतील तिघा जणांची चर्चेवरुन मुलांच्या किडण्या काढून त्यांना फेकून द्यायचा त्यांचा कट असल्याचे लक्षत आल्याचे मुलांनी सांगीतले. संबंधित मुलांचा पालकांना बोलावून घेवून त्यांच्या ताब्यात मुलांना देण्यात आले. आपली मुले सुखरुप मिळाल्यामुळे आपणास तक्रार द्यावयाची नाही असे संबंधित मुलांच्या पालकांनी सांगितल्यामुळे या प्रकरणी अद्याप तरी कोणतीच पोलीस कारवाई करण्यात आली नाही .
अपहृत तीन मुले वाशिम रेल्वेस्थानकावर आढळली!
By admin | Updated: September 4, 2015 00:25 IST