शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

तीन एकरांतील कपाशी जळाली; शेतकऱ्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:21 IST

खेट्री : पातूर तालुक्यातील चांगेफळ शिवारातील तीन एकरांतील कपाशी जळाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी चिंतित असताना ...

खेट्री : पातूर तालुक्यातील चांगेफळ शिवारातील तीन एकरांतील कपाशी जळाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी चिंतित असताना कृषी विभागाकडून घटनेचा पंचनामा करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप अल्पभूधारक शेतकरी मो. आसीम यांनी केला आहे.

अल्पभूधारक शेतकरी मो. आसीम यांनी चांगेफळ शिवारात शेत सर्वे नंबर ४८/ १, ६२ आर, असे तीन एकरांत कपाशी पिकाची लागवड केली होती; परंतु गेल्या २० दिवसांपूर्वी अज्ञात रोगामुळे तीन एकरांतील कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. याबाबत शेतकरी मो. आसीम यांनी कृषी विभागाला माहिती दिली, कृषी विभागाकडून पंचनामा करून पंचनाम्यवर शेतकऱ्याची सही देऊन अहवाल कृषी कार्यालयात सादर करणे अपेक्षित असताना, कृषी विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांनी शेतात भेट देऊन शेतकऱ्यासोबत फक्त फोटो काढला. त्यानंतर शेतकऱ्याने कृषी विभागाकडे वारंवार पंचनामा करण्याची मागणी केली; तरीही याची दखल घेतली गेली नाही. कृषी विभागाकडून शेतकऱ्याला मार्गदर्शन करून समाधानकारक उत्तर देणे गरजेचे होते; परंतु शेतकऱ्याला समाधानकारक उत्तर किंवा मार्गदर्शन केला नसल्याचा आरोप शेतकरी मो. आसीम यांनी केला आहे.

पंचनाम्यासाठी गेल्या २० दिवसांपासून शेतकरी प्रतीक्षेत आहे. शेतकरी मो. आसीम यांनी १६ सप्टेंबर रोजी पातूरचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे पंचनामा करण्याची मागणी केली आहे.

-----------------------

तहसील विभागाला त्या शेतकऱ्याने केलेला अर्ज प्राप्त झाला असून, सदर अर्जाची प्रत विद्यापीठात पाठवून विद्यापीठाच्या तज्ज्ञांसोबत पंचनामा करण्यात येईल, तसेच प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे.

-संजय अटक, कृषी मंडळ अधिकारी, चान्नी

---------------

तीन एकर कपाशीवर रोग आल्याबाबतची माहिती कृषी विभागाला दिली, तसेच लेखी निवेदनसुद्धा संबंधितांना दिले. कपाशीवर रोग आला तेव्हापासून जवळपास महिना उलटूनही पंचनामा केला नाही, तसेच कृषी विभागाकडून कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले नाही.

- मो. आसीम शेतकरी, चांगेफळ

210921\2011img-20210908-wa0143_1.jpg

????